तिने कित्ती सुंदर दिसावं........

तिने कित्ती सुंदर दिसावं..
जसं गुलाबाचं फूल उमलावं..
कोणाच्याही नजरेत भरावं..
तासन तास पाहत रहावं..!!!!

तिने कित्ती गोड बोलावं..
ऐकणाऱ्याने विरघळून जावं..
हरवूनच जावं ..
सोबत तिच्या..!!!!

तिने कित्ती साधं रहावं ..
त्यातही रूप तिचं खुलावं..
कोणीही फिदा व्हाव ..
अदांवर तिच्या..!!!!

तिचं उदास होणं..
कसं हृदयाला भिडावं..
कोणालाही वाईट वाटावं..
अश्रूंनी तिच्या..!!!!

तिचं हसणं ..
कोणालाही सुखवावं..
कोणीही घसरून पडावं..
गालावरल्या खळीत तिच्या..!!!!

तिच्या नजरेने मलाच शोधावं..
अचानक नजरेने नजरेला भिडावं ..
मग तिने लगेच दुसरीकडे पहावं..
लाजेने चूर चूर व्हावं..!!!!

ती समोर असताना ...
मी सारं काही विसरावं..
तिने इश्य करत लाजावं..
मी 'हाय हाय' करत घायाळ व्हावं ..!!!!

तिने फक्त माझंच रहावं..
मीही फक्त तिच्यासाठीच जगावं..
साथ देऊ जन्मोजन्मी ..
विरहाचं दुख कधीही न यावं..
कधीही न अनुभवावं..!!!!

बाप

बापावर एक कविता लिहतो
माझ्या मनात विचार आला
माझाच बाप नजरेसमोर
कधी नव्हे तो मी धरला
माझा बापच नेहमी मला
माझा कट्टर शत्रु वाटला
म्हणून त्याच्या स्तुतीत एकही
शब्द कधी सहज नाही लिहला
माझा बापच इतरांच्याही
बापांचाही एक आदर्श ठरला
बाप असावा तसाच माझा
बाप नजरेत माझ्या झाला
बाप फक्त बाप सदाच असतो
म्हणून आपण कमी लेखला
आई पुढेच महानतेला
त्याच्या आपण कमी तोलला
बापच सदैव उपेक्षित तो
साहित्यातही कसा राहिला
झालेळ्यांना बाप कदाचित
बापच अजुन नाही कळला

आयुष्य सुंदर आहे

आयुष्य सुंदर आहे
मित्रा,
खरंच आयुष्य सुंदर आहे

सुर्य जेव्हा आकाशात
तळपत असतो रागाने ,
इवलसं फ़ुल सांगतं त्याला
"पहा पण प्रेमाने !"

ढग जेव्हा दु:खी होतात
आणि बरसू लागतात धारा!
ढगाच्या दु:खावर तेव्हा
फ़ुंकर घालतो वारा !

चंद्र एकटाच पडतो आकाशात
दर्दभरी गात गाणी !
चांदण्या चमकत सोबत करतात
उत्साहाची भरुन वाणी!!

पानं, फ़ुलं, झाडं सारी
तुझ्यासाठीचं गात आहेत,
ओढे, नद्या, नाले, सागर
तुझ्यासाठीच वहात आहेत !

खरंच आयुष्य सुंदर आहे,
बघ जरा डोळे उघडून !
बघ एकदा तरीही
आनंदाचं गाणं गाऊन !!

मी जसा आहे, तसा आहे

सिंह भासे मी कुणा केंव्हा
श्वानही बोले कुणी केंव्हा
बोलती कोणी ससा आहे
मी जसा आहे, तसा आहे

जे कुणा बोलायचे बोलो
जे कुणा वाटायचे वाटो
(मोकळा त्यांचा घसा आहे!)
मी जसा आहे, तसा आहे

रोखली माझी मुळे त्यांनी
तोडल्या फांद्या जरी त्यांनी
अंबरी माझा ठसा आहे!
मी जसा आहे, तसा आहे

कोष मी फोडेन दंभाचा
गर्भ मी जाणेन सत्याचा
घेतला हाती वसा आहे
मी जसा आहे, तसा आहे
खरंच आयुष्य सुंदर आहे..!!!!! ...............

ती आली online की.....

सारंच Zing Zang होतं
ती आली online की
माझा पीसी Hang होतो
मनात कससंच होवून
सारंच Zing Zang होतं

कितीही Alt+Ctrl+Delete केले
तरी Task manager येत नाही
हैराण होतो Refresh करून
Restart चं नावच घेत नाही

Hard disk चा वेग वाढतो
कसले कसले आवाज काढतो
writer सारखा eject होतो
Pen drive पण reject होतो

काय सांगू तुम्हाला
सारी system fail होते
Virus घुसतो अचानक
त्याची आपली रेलचेल होते

काय म्हणता तुम्ही,
मी online येणे बंद करायचं....?
अहो मग मी.....
तिच्या शिवाय कसं जगायचं....??

अहो Hang च होतोय ना
काय फरक पडतो.....?
तिच्यामुळेच तर माझ्या
PC चा ह्रदय धडधडतो

chatting काही होत नाही
वाटतं आपलंच Ram कमी होतं
मनात कससंच होवून
सारंच Zing Zang होतं.........सारंच Zing Zang होतं.......!!

जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते…………

जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते
मन चांदण्यात न्हावुन निघते
आशेच्या पावासाळी सरीने
डोळ्यातले स्वप्न मग चिंब भिजते
माझ्या मनातल्या कोरया कॅनवास वर
तुझं चित्र मग आपोआपच उमटते

जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते
जणु श्रावणातली पहीली सर बरसते
तुझ्या आठवणींच्या सरीने
कोमेजलेल्या या मनाच्या रोपाला
मग नवी पालवी फ़ुटते
रात्रीच्या गर्द काळोखी आभाळातली
शांत चांदणी जणु पुन्हा चमकते
माझी नजर मग
त्या चांदण्यातही तुलाच शोधिते

कधी कधी तर वाटते की जाऊदे
तु नाही तर तुझी आठवण तरी येते
कमीत कमी माझं उदास मन थोडंतरी हसते

स्वप्न आणि सत्य

एकदा स्वप्न आणि सत्य यांचे जोरदार भांडण झाले. विषय होता भविष्य घडविण्यात सर्वाधिक सहभाग कोणाचा. दोघे ही खुप भांडले, झगडले पण निर्णय काही होईना. शेवटी या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ते आपल्या मानसपित्याकडे- ब्र्म्हदेवाकडे गेले. ब्र्म्हदेवाने त्यांना सांगितले, "ज्या कोणाचे हात आभाळाला टेकतील आणि तरीही ज्याचे पाय जमिनीवर आसतील, त्याचा भविष्या घडविण्यात निर्णायक सहभाग असतो". दोघेही परत आले. स्वप्नाने आधी प्रयत्न केला. एकच उडीत त्याचे हात आभाळाला टेकले, पण त्याचे पाय जमिनीपसुन केंव्हाच उचलले गेले होते. सत्याने नंतर प्रयत्न केला. त्याचे पाय कायम जमिनीवर होते, पण त्याचे हात आभाळापर्यंत कधीच पोचु शकले नाहीत. दोघांनीही खुप प्रयत्न केले, पण दोघांपैकी कोणीच यशस्वी होउ शकले नाही. थकुन परत एकदा ते ब्रम्हदेवाकडे गेले, आणि या वेळेस ब्रम्हदेवाने त्यांना सांगितले, "भविष्य घडविण्यात सत्य, आणि स्वप्न या दोघांचाही सहभाग तितकाच मोलाचा असअतो. खर्‍या अर्थाने यशस्वी भविष्य घडवायचे असेल, तर स्वप्नाला सत्याच्या खांद्यावर उभे रहयला हवे!."

क्षण...

क्षण...
कधी हसरे, बोलके
कधी अजाण, दु:खी
कधी अवखळ, निर्मळ
तर कधी धीरगंभीर शांत

क्षण...
कधी रुसलेले
कधी फसलेले
काही गमावलेले
काही निसटलेले

क्षण...
आनंदाने नाचणारे,
स्वत:शीच गुणगुणणारे
हातात हात धरून
फेर धरायला लावणारे

क्षण...
कशी स्वत:ला हरवून टाकणारे
आजूबाजूच्या जगाला विसरायला लावणारे
हटके अश्या जगात नेणारे
त्या जगातूनच आपलं व्यक्तिमत्त्व घडवणारे

क्षण...
आईच्या मायेत भिजलेले
भावंडांच्या भांडणांत गुंतलेले
मित्रांसोबत धम्माल-मस्ती करण्याचे
प्रियकराच्या प्रेमात चिंब न्हाऊन निघण्याचे

क्षण...
बालपणीच्या निरागसतेचे
शाळेतल्या खोडकरपणाचे
कॉलेजकट्ट्यावरच्या गप्पांचे
तारुण्यातल्या चैतन्याचे

क्षण...
काही आयुष्याला नवीन वळण देणारे
तर काही आयुष्याची वाट लावणारे
कधीही न हरवण्यासारखे
कधीही न विसरण्यासारखे

क्षण...
आठवणींच्या कुपीत जपून ठेवावे असे
पुन्हा पुन्हा जगावेसे वाटणारे
कुणाच्या तरी आठवणीने रात्र रात्र जागवणारे
मनात गडद काळोख दाटवणारे

क्षण...
अनेक...असंख्य...अमर्याद...अजरामर
आपल्याला आयुष्यातून उठवणारेसुद्धा
फक्त न फक्त क्षणच...

असं प्रेम करावं ...

असं प्रेम करावं
थोडं सांगावं थोडं लपवावं,
असं प्रेम करावं
थोडं रुसावं थोडं हसावं,
असं प्रेम करावं
गुपचुप फोन वर बोलावं,
कोणाची नाज़र पडताच पटकन "अगं" चा "अरे" करावं
असं प्रेम करावं

जग पुढे चाललं असलं
तरी आपण मात्र थोडं मागेचं रहावं,
फोन, SMS, आणि E-MAILS च्या जगात ही,
आपण मात्र पत्र लिहुन मांडावं,
असं प्रेम करावं

कुठे भेटायला बोलवावं,
पण आपण मात्र उशिरा जावं
मग आपणच जाऊन sorry म्हणावं,
असं प्रेम करावं

वर वर तिच्या भोळसट पनाची,
खूप चेष्टा करावी,
पण तरीही ती तुम्हाला किती आवडते, हे जरूर सांगावं,
असं प्रेम करावं

प्रेम ही एक सुंदर भावना,
हे ज़रूर जाणावं,
पुन त्या बरोबर येणार्‍या वेदनांना ही सामोरं जावं
असं प्रेम करावं

विरह येतील, संकट ओढवतील,
प्रेमाच्या अनेक परीक्षा होतील,
पण आपण मात्र खंबीर रहावं,
असं प्रेम करावं

एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं,
म्हणूनच जीवापाड जपावं,
असं प्रेम करावं ... असं प्रेम करावं

आयुष्याच्या या गर्दित हात माझा धरशील का?

तुझे प्रत्येक दुखः मला देऊन
सुखात माझ्या येशील का?
आयुष्याच्या या गर्दित हात माझा धरशील का?

एकांत भासेल जेव्हा तुला
बोलावून मला घेशील का?
थरथरनारया तुझ्या श्वासाने
ह्रदय माझे जपशील का?
आयुष्याच्या या गर्दित हात माझा धरशील का?

तुझ्या हृदयातील प्रत्येक गोष्ट
तुझ्या कोवळया ओठांवर आणशील का?
प्रत्येक वेळेस डोळ्यातून बोलण्याएवजी
आता तरी हो म्हणशील का?
आयुष्याच्या या गर्दित हात माझा धरशील का?

स्वप्नातल्या राजकुमार बरोबर
रील्पेस मला करशील का?
आणी ह्या वेडयाच्या आयुष्यात
स्वप्नपरी म्हणून अवतरशील का?
आयुष्याच्या या गर्दित हात माझा धरशील का?

असं प्रेम करावं ...

असं प्रेम करावं

थोडं सांगावं थोडं लपवावं,
असं प्रेम करावं

थोडं रुसावं थोडं हसावं,
असं प्रेम करावं

गुपचुप फोन वर बोलावं,
कोणाची नाज़र पडताच पटकन "अरे" चा "अगं" करावं
असं प्रेम करावं


जग पुढे चाललं असलं
तरी आपण मात्र थोडं मागेचं रहावं,
फोन, SMS, आणि E-MAILS च्या जगात ही,
आपण मात्र पत्र लिहुन मांडावं,
असं प्रेम करावं

कुठे भेटायला बोलवावं,
पण आपण मात्र उशिरा जावं
मग आपणच जाऊन sorry म्हणावं,
असं प्रेम करावं

वर वर तिच्या भोळसट पनाची,
खूप चेष्टा करावी,
पण तरीही ती तुम्हाला किती आवडते, हे जरूर सांगावं,
असं प्रेम करावं

प्रेम ही एक सुंदर भावना,
हे ज़रूर जाणावं,
पुन त्या बरोबर येणार्‍या वेदनांना ही सामोरं जावं
असं प्रेम करावं

विरह येतील, संकट ओढवतील,
प्रेमाच्या अनेक परीक्षा होतील,
पण आपण मात्र खंबीर रहावं,
असं प्रेम करावं

एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं,
म्हणूनच जीवापाड जपावं,
असं प्रेम करावं ... असं प्रेम करावं ...

मी विचारही केला नव्हता की ...

मी विचारही केला नव्हता की असे काही घडेल,
सर्वकाही विसरून, मी तिच्यावर प्रेम करेल,
तो काळच तसा होता, ती वेळच तशी होती,
ह प्रसंग आहे तेव्हाचा, जेव्हा ‘ती’ माझी नव्हती,

ध्येय नव्हते जीवनाला, कुठला ध्यासही नव्हता,
नव्हती चिंता उद्याची, स्वतःवर विश्वासही नव्हता,
अशातच जेव्हा मी पहिल्यांदा तिला पाहिले,
विद्युत् वेगाने माझे काळीज धडधड्ले,

तिचं लाजन, तिचं हासन, आणि बोलके डोळे,
काळजाच्या कप्प्यात साठवले सगळे,
मग तिची आठवण होताच मला पड़े भ्रांत,
बोलायचे म्हटले तर, तिचा स्वाभाव शांत,

काय कराव तेच कळत नव्हते,
कसही करून तिचे मन जिंकायचे होते,
हिम्मत करून शेवटी तिला प्रेमपत्र लिहिले,
विचार करण्यास मुदत म्हणुन काही दिवस दिले,

महिना होउन सुद्धा तिचा होकर नाही आला,
होकाराच्या प्रतिक्षेत माझा जिव व्याकुळ झाला,
समजुन चुकले मी, हा नक्कीच तिचा नकार आहे,
तिला विसरने हाच एकमात्र उपाय आहे,

शेवटी करायला नको ते धाडस मी केले,
होकर आहे की नकार थेट तिलाच विचारले,
मग माझे पत्र दाखवत ती म्हणाली, हे काय आहे..?,
‘तुझ्या एव्हडेच माझे तुझ्यावर्ती प्रेम आहे,

एकून तिचे उत्तर, ‘मन’ बेभान होउन नाचले,
अतिआनंदाने डोळ्यात पानी साचले,
ध्येय मिळाले जीवनाला, ध्यासही गावला,
माझ्यावरचा विश्वास मी तिच्या डोळ्यात पहिला,

आता दीवसही माझा तिच्या नावाने उगतो,
स्वप्नातला चंद्रही तिच्यासाठी झुरतो,
रक्तासारखी माझ्यात ती सामावली सर्वांगी,
साधी, भोळी, अल्लड माझी प्रेयसी...

खर प्रेम ....

पहिल्या सरीचा पहिला थेंब
म्हणजे प्रेम

मनात पेटलेला गारवा
म्हणजे प्रेम

सावरता आवरता येत नाही
ते म्हणजे प्रेम

एखाद्यच्या नावाच कपाळावरच
कुंकू म्हणजे प्रेम

कुणाच्या नावावर आयुष्य लिहून
स्वतःचा पत्ता विसरायला लावत
ते म्हणजे प्रेम

त्याच नुसत सोबत असण
हे आधार वाटण म्हणजे प्रेम

जीवनातली नवी पहाट
म्हणजे प्रेम

जगण्यातला खरा अर्थ
म्हणजे प्रेम

फक्त एकदा होत
ते म्हणजे प्रेम

आणि शेवट्च्य श्वासपर्यंत
जे प्रामाणिक असत
ते म्हणजे प्रेम
खर प्रेम

साभार - कवी: प्रिया उमप

मराठी भाषेची ताकद खालील २ लेखात पहा

मराठी भाषेची ताकद खालील २ लेखात पहा. प्रत्येक शब्द 'क' आणि 'प' पासून सुरु करुन येवढा मोठा परिच्छेद लिहिला आहे. जगातल्या कोणत्या इतर भाषेत अशी ताकद असेल ?

------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------

केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर
कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत
कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये '
कजरारे-कजरारे' कवितेवर कोळीनृत्य केले.
काकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कळवळले. काकांनीही कमालच केली. काकांनी काकूंचे काळे
कुळकुळीत केस कात्रीने कराकरा कापले. काका काय करताहेत काकूंना कळेनाच! काकूंनी कर्कश्श
किंचाळून कलकलाट केला.
काका काकूंची कसली काळजी करणार! काकांना कामाची काळजी. काकूंच्या कर्णकर्कश्श
कोलाहलातही, केशवाने कचऱ्यात कोंबलेले कागदाचे कपटेन कपटे काढून काकांनी कचेरीकडे कूच केले.
कचेरीच्या कामासाठी काकांनी कंबर कसली. कागदाच्या कापलेल्या कपट्यांचे काकांनी 'कोलाज'
करून कामकाज कार्यान्वयित केले. केशवाचे कारनामे कळताच काकांनी काट्यानेच काटा काढला.
काकांनी केशवालाच कोलाजचे काम करण्यासाठी कुथवला. कपटी केशवने काकांवरच कामचुकारपणाचा
कांगावा करून कामाचा कंटाळा केला. काकांनी कठोरपणे केशवाला कामावरून काढले.
कासावीस काकूंनी कालच्या कडू कारल्याची कोशिंबीर कटाप करून काकांसाठी कच्च्या कैरीचे कोय
काढून कालवण केले. काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले.
केळकरांच्या कोकणस्थ कुटुंबात कर्तव्यापुढे कर्मकांड केव्हाही कनिष्ठच. कर्तव्यदक्ष काकांच्या
कार्यकाळात कचेरीने कर्मरूपी किल्ल्याचे कीर्तिशिखर काबीज केले.
कामावरून काढलेल्या केशवाने कितीतरी काबाडकष्ट काढल्यावर कोल्हापूरच्या कॉम्रेड कणेकर
कॉलेजने केशवाला कबड्डीचा कर्णधार केला. क्रिडापटू केशवाने कबड्डीतच करियर केले. कालच्या
कागाळीखोर केशवाला काळानेच केला 'कबड्डीतल्या किचकट कसरतींचा कर्ता'!
कथासार
-
क्रियेविण करिता कथन, किंवा कोरडेची कीर्तन,
कितीक किताब कष्टाविण, काय कामाचे

------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------

परवा पुराण-प्रसिद्ध पखवाज पंडित पुरोहित पंतांची पिवळी पगडी पुरंदरच्या पंधराशेव्या
पायरीवरून पुण्यात पर्वतीच्या पाचव्या पायरीपाशी पर्णकुटीपासून पंधरा पावलांवर पहुडलेल्या
पंकजच्या पोटावर पटकन पडली. पगडी पडलेली पाहताच पंत पुरंदरच्या पायथ्याशी पोलिसठाण्यात
पळाले. पुरंदरच्या पोलिसांनी पंतांना पुण्याच्या पोलिसांकडे पाठवले.

पंत पुण्यात पोहोचताच पोलिसांवर पेटले. पंत पेटल्यामुळे पोलिस पटकन पर्वतीकडे पळाले. पांढर्‍या
पोषाखातल्या पोलिसांना पाहून पंकज पर्वतीच्या पलिकडे पळाला. पोलिसांनी पंकजचा पिच्छा
पुरवला.

पळता पळता पंकज पाण्याच्या पाँडमध्ये पडला. पंतांनीच पाण्यात पोहून पंकजला पकडले. पिवळी
पगडी पण पकडली. पोलिसांनी पंकजला पोलिसठाण्याकडे पिटाळले. पकडणारा पोलिस पदपथावर
पाय पसरून पडला. पोलिस पडलेला पाहून पंकज पाठीवर पांघरूण पांघरून पळाला.

पंतांनी पुरंदरला पोहोचताच पगडीत पंकजचे पैशांचे पाकिट पाहिले. पाकिटातले पुष्कळ पैसे पंतांनी
पनवेलला पुत्राला पोस्टाने पाठवले. पंतांच्या पाजी पुत्राने पैशांच्या प्राप्तीतून पोटात पंजाबी
पदार्थ पचवले.

पंतांना परमेश्वरच पावला!
पंकजला पकडण्यासाठी पंतांसोबत पुण्यात पोहोचलेली पंतांची पोरगी प्राची पंकजला पहिल्यांदा
पाहताच पंकजच्या प्रेमात पडली. प्राचीने पंकज, पोलिसांची पकडा पकडी पाहिली. पंकजचा
पदपथावरून पोबाराही पाहिला. पानशेतच्या पुराच्या पाण्यामुळे पुनर्वसित पंकज परत पर्णकुटीत
पोहोचला.

पित्यासमवेत प्राची पुरंदरला परतली, पण पंतांनी पंकजच्या पाकिटातल्या पैशांबाबत पंक्ति-प्रपंच
पाळला. पुष्कळ पैसे पुत्राला पाठवले. पंतांच्या पुन्हा पुन्हा पिडणार्‍या पुराणांच्या पोपटपंचीमुळे
प्राची पेटली.

पंकजच्या प्रेमाखातर प्राची पुण्यास परतली. प्राचीनेच पंकजवरच्या पोलिसांच्या पंचनाम्याला
पाने पुसली. पंकजला पहायला प्राची परत पर्णकुटीपाशी पोहोचली. पण पर्णकुटीत पहुडलेल्या
पंकजचे पाय पळून पळून पांढरे पडलेले! प्राचीने पंकजच्या पायावर पिवळे पुरळही पाहिले.

पंकजची परिस्थिती पाहून प्राण पिळवटलेल्या प्राचीने पदर पाण्यात पिळून पंकजचे पाय पुसले.
प्राचीचा प्रथमोपचार पाहून पंकजला पोरगी पसंत पडली. पंकजने प्राचीला पर्णकुटीतच पटवले.

पर्णकुटीतील प्रेम-प्रकरण पाहून पर्णकुटीच्या पायर्‍यांवर पत्ते पिसणारी पोरे पूर्व-पश्चिमेला
पांगली. प्राचीने पंकजच

वेडात मराठे वीर दौडले सात !!!!

वेडात मराठे वीर दौडले सात ॥ धृ. ॥

“श्रुती धन्य जाहल्या, श्रवुनी अपुली वार्ता
रण सोडूनी सेनासागर अमुचे पळता
अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता
भर दिवसा आम्हा, दिसू लागली रात”

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ १ ॥

ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील
“माघारी वळणे नाही मराठी शील
विसरला महाशय काय लावता जात!”

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ २ ॥

वर भिवयी चढली, दात दाबिती ओठ
छातीवर तुटली पटबंधाची गाठ
डोळ्यांत उठे काहूर, ओलवे काठ
म्यानातून उसळे तलवारीची पात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ३ ॥

“जरी काल दाविली प्रभू, गनिमांना पाठ
जरी काल विसरलो जरा मराठी जात
हा असा धावतो आज अरि-शिबिरात
तव मानकरी हा घेऊनी शिर करांत”

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ४ ॥

ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
सरदार सहा, सरसावूनी उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषांत

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ५ ॥

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पूनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात, दर्यात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ६ ॥

खालून आग, वर आग, आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ७ ॥
दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा
अद्याप विराणि कुणी वाऱ्यावर गात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ८ ॥

- कुसुमाग्रज

मैत्री म्हणजे सुंदर पहाट ...

मैत्री म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी दोस्तीची वाट..

आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..

फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं
कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं

आठवडयातून ऊगवणारी रविवारची सकाळ
हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..

मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
अन् जणू दरवळणारा मारवा

अंगावर घ्यावा असा राघवशेला
एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला...

ऍकत रहावी अशी हरीची बासरी
अस्मानीची असावी जशी एक परी...

मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी
दु:खावरची हळुवार जादूची झप्पी

मी तिच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती

मी तिच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती
तीची नव्हती कधी पण माझी साथ होती

मी आजवर कंदिलाच्या उजेडात जगलो
ती चमकणा-या ता-यांच्या प्रकाशात होती

तीचा प्रवास होता मोठ्या महामार्गावरचा
माझी ती बिचारी लहान पायवाट होती

तिच्या स्वप्नांना दोरखडं जखडलेले नेहमी
माझी कधीही सुटणारी निसरति गाठ होती

तीच सुखांशी नेहमी अजोड नातं गुफ़लेल
माझ्या वाट्याला दुःखंच भरमसाठ होती.

नेहमी साखर झोपेची तिची पहाट रोजची
मी डोळे मिटले नाही माझी सदा पहाट होती.

तिच्या ओठी नेहमी हसु उमलायच सुखाच
माझ्या डोळ्यानां नेहमी आसवांची साथ होती

तिने कधी हात जोडले नाहीत कशासाठी देवापुढे
तीच्यासाठी देवळात नेहमी माझीच वरात होती

आज म्हणतेय मी चुकली पण काय फ़ायदा
खरच फ़ार उशीरा तीची ही साद होती.

मी स्मशांन वाटेवर असताना तिला कळाल
आज म्हणे ती दिवसभर देवळात होती

''संस्कार''

का कळत नाही पण हली मन थोड कठोर झाल आहे
प्रेम या शब्दातला जिव्हाळा थोडा कमी झाला आहे प्रेम प्रेम प्रेम बस झाल आता,
अरे एखादी गोष्ट आपली होणारच नाही. मग त्या गोष्टीचा विचार कराव का ?
तिला हि माहिती आहे कि ती माझी होऊ शकत नाही. मला हि माहिती आहे कि मी तिचा होऊ शकत नाही.
दोघांची गत अशी झालेली आहे.


जसा आळवाच पान आणि त्यावर पाण्याचा थेंब. स्पर्श होऊ शकेल पण एकजीव उभ्या जन्मात नाही.

माझ्या मनातल्या भावना तिच्या मनात कधीच पोहचल्या आहेत.आणि तिच्या मनातल्या हि भावना माझ्या मनात पोहोचल्या आहेत. दोघांच्या हि भावनेत प्रेम आहे. हे दोघांना माहिती आहे . आणि या भावना स्पष्ट का होत नाही. नाही ते कधीच होणार नाही. त्या मागे एकाच कारण असाव

दोघानाही एकाच बंधनात जखडून ठेवलं आहे. ते म्हणजे..... .
''संस्कार''...................!!!!!.

तुला परत यायचं असेल तर

महात्म्या, तुला परत यायचं असेल तर,

तुझी ती अहिंसा तेथेच ठेवुन ये.
कारण आज तिला आमच्याकडे काहीच किंमत नाही
आज अहिंसेला आम्ही अडगळी शेजारी जागा दिलीय,
कारण अहिंसा म्हणजे आज फक्त गांधीवाद्यांची झालीय...

अहो गांधीवादी तरी कसले ते...?
नुसते गांधीवादी म्हणवुन घेणारे,
आणि अंधारात सत्तेसाठी...
सत्त्यासाठी नव्हे महात्म्या, सत्येसाठी!
अंधारात सत्तेसाठी पाठीत खंजर मारणारे,
आणि डळमळत्या खुर्चीला...
पडण्याआधी तारणारे.
हे आजचे अहिंसावादी...
हे आजचे गांधीवादी.
म्हणुन अहिंसा नको.

आणि हो, तो सत्याग्रह तरी कशाला आणतोस?
कुणाचे ग्रह हलणार आहेत त्यानं?
कुणाचे विचार बदलणार आहेत त्याने?
महात्म्या, ते प्रेम ही नकोस आनू
दोन दिवसात पार बो-या वाजेल त्याचा,
आजच्या स्पर्धेच्या युगात.
कारण, आज आम्ही धावण्याची शर्यत...
प्रेमाने नाही तर पायात पाय घालुनच जिंकतो...
आणि हो, आम्ही कुणाचं भलं करु...
अशी आशाही आमच्याकडुन करु नकोस,
कारण तिथच तर आम्ही शिंकतो
म्हणुन प्रेम ही नको.

आणि महात्म्या ती, करुणा आणि शांती,
ती तर नकोच नको.
गांधीवादाचे पुरस्कर्ते म्हणुन ठेवली होती...
हीच नावे आम्ही आमच्या मुलींची
पण तीही त्यांनी कधीच बदललीत,
आजच्या आधुनीक युगात 'सुटेबल'
होत नाहीत म्हणुन

तेंव्हा आता यायचं असेल तर,
सत्त्यासोबत असत्त्यालाही घेऊन ये.
आता चरखा नकोय ...
एखादी गन घेऊन ये,
महात्म्या तु जरुर ये.... पण येताना,
आमच्या सारखंच पांढरपेशी मनही घेवुन ये!

प्रतिज्ञा -- भारत माझा देश आहे।

भारत माझा देश आहे।
सारे भारतीय माझे बांधव आहेत।
माझ्या देशावर माझे प्रेम आहे।
माझ्या देशातल्या समृद्ध आणिविविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान
आहे।
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रतामाझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव
प्रयत्न करीन।
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचाआणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीनआणि
प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।
माझा देश आणि माझे देशबांधवयांच्याशी निष्ठा राखण्याचीमी प्रतिज्ञा करीत
आहे।
त्यांचे कल्याण आणित्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे।

घरापासून दूर

मी घरी कीतीही दिवसभर दंगा केला
तरी मला आई थोपताल्याशिवय कधीच झोपली नाही
घरापासून दूर म्हणुनच आता कदाचित
शांत झोप कधी लागलीच नाही.

कुणी वीचारते "तुला घरी जाऊस वाटत नाही"?
कसा सांगू त्यांना घरातून निघताना
आईला मारलेली मीठी सोडवत नाही.

आई तू सांगायची गरज नाही
तुला माझी आठवण येते
आता माझ्यासाठी डब्बा करायचा नसतो
तरीही तू सहा वाजताच उठतेस.

तुझ्या हातचा चहा तुझ्या हातची पोली
तुझ्या हातची माझी न आवडती भाजी खायला
आजही जीभ आसुसली.

घरापासून दूर .......
आई जग खुप वेगले आहे
तुझ्या सावलीत अगदी बिनधास्त होतो
आता रानागानत उन आहे

तू आपल्या पील्लान साठी
सगला केलस एक दीवस पिल्लं म्हणाली
आई आता आम्हाला जायचय
आंनी तू त्यांना जाऊ दीलस
आई तू इथे नाहीस
बाकी माझ्याकडे सगळे आहे
घरापासून दूर
जग खुप वेगले आहे.

मैत्री म्हणजे काय असतं?

मैत्री म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी दोस्तीची वाट..

आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..

फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं
कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं

आठवडयातून ऊगवणारी रविवारची सकाळ
हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..

मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
अन् जणू दरवळणारा मारवा

अंगावर घ्यावा असा राघवशेला
एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला...

ऍकत रहावी अशी हरीची बासरी
अस्मानीची असावी जशी एक परी...

मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी
दु:खावरची हळुवार जादूची झप्पी

मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात
नेहमीकरता असणारी तुझीचं साथ.....

सोबत रहा तू फक्त.. इतकंचं एक मागणं आहे...
तू असल्यावर अवघं जीवन देखील गाणं आहे

बाप्पा

परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला
दोन क्षण दम खातो म्हणून माझ्या घरी टेकला
उंदीर कुठे पार्क करू? लॉट नाही सापडला
मी म्हंटलं सोडून दे, आराम करू दे त्याला
तू पण ना देवा, कुठल्या जगात राहतोस?
मर्सिडिसच्या जमान्यात उंदरावरून फिरतोस

मर्सिडिस नाही निदान नॅनो तरी घेऊन टाक
तमाम देव मंडळींमधे भाव खाऊन टाक
इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो
भक्तांना खूष करेपर्यंत माझा जीव दमतो
काय करू आता सारं मॅनेज होत नाही
पूर्वीसारखी थोडक्यात माणसं खूषही होत नाहीत

इमिग्रेशनच्या रिक्वेस्ट्सने सिस्टिम झालीय हँग
तरीदेखील संपत नाही भक्तांची रांग
चारआठ आणे मोदक देऊन काय काय मागतात
माझ्याकडच्या फाइल्स नुसत्या वाढतच जातात
माझं ऐक तू, कर थोडं थोडं डेलिगेशन
मॅनेजमेंटच्या थिअरीमधे मिळेल सोल्यूशन
एमबीएचे फंडे तू शिकला नाहीस का रे?
डेलिगेशन ऑफ ऑथॉरिटी ऐकलं नाहीस का रे?

असं कर बाप्पा एक लॅपटॉप घेउन टाक
तुझ्या सार्या दूतांना कनेक्टिव्हिटी देऊन टाक
म्हणजे बसल्याजागी काम होईल धावपळ नको
परत येऊन मला दमलो म्हणायला नको
माझ्या सार्या युक्त्यांनी बाप्पा झाला खूष
माग म्हणाला हवं ते, एक वर देतो बक्षीस
सीईओची पोझिशन, टाऊनहाऊसची ओनरशिप
इमिग्रेशनदेखील होईल लवकर मग ड्युअल सिटिझनशिप

मी हसलो उगाच, म्हंटलं, देशील ते मला हवं
म्हणाला मागून तर बघ, बोल तुला काय हवं?
‘पारिजातकाच्या सड्यात हरवलेलं अंगण हवं'
‘सोडून जाता येणार नाही अस एक बंधन हवं’
‘हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव’
‘प्रत्येकाच्या मनाच्या कोपर्यात थोडासा शिरकाव’
‘देशील आणून परत माझी हरवलेली नाती’
‘नेशील मला परत जिथे आहे माझी माती’
‘इंग्रजाळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं’
‘आईबापाचं कधीही न फिटणारं देणं’
‘कर्कश्श वाटला तरी हवा आहे ढोलताशांचा गजर’
‘भांडणारा असला तरी चालेल पण हवा आहे शेजार’
‘यंत्रवत होत चाललेल्या मानवाला थोडं आयुष्याचं भान’
देशील का रे बाप्पा माझ्या पदरात एवढं दान?

“तथास्तु” म्हणाला नाही, सोंडेमागून नुसता हसला
सारं हाताबाहेर गेलंय पोरा, “सुखी रहा” म्हणाला

प्रेम आणी computer वेड

वर्गात नेहमी खुन्नस देता देता
दिलीस एकदा सुन्दर smile
उघडशील का माझ्या "pritee"ची
एक एक Backup File.

जेव्हा तुला पहातो तेव्हा
hang होते माझी hard Disk
माझी OS ही सांगते मला
घेतली आहेस मोठी Risk.

Risk Management क़ेलेय मी
Estimate ही काढला आहे.
थोडे Reengineering करावे लागेल
तुझा माझा समेट एवढा एकच पर्याय आहे.

फक्त एकदाच पहायचे आहे
तुझ्या ह्रुदयात Login करुन
Delete करायचेत सगळे Folder
फक्त माझ्या नावाचा Folder राखुन.

Antivirus बनेन तुझ्यासाठी
वाचवेन तुला Spam पासुन
एकच mail कर माझ्या mailवर
वाट बघतोय कधीपासुन.

म्हणणे फक्त एवढेच आहे
आशा करतो तुझी इच्छा ही असावी
कोणी visit द्यायचे म्हटले
तर तुझी माझी URL एकच असावी.......

आयुष्यात....

आयुष्यात इच्छा असतात अनेक ,
प्रत्यक्षात पूरी होते ती फ़क्त एक .

आयुष्यात असंख्य स्वप्न असतात सजलेली ,
प्रत्यक्षात असतो फ़क्त अंधार दाटलेला .

आयुष्यात असंख्य नाती डोळ्यासमोर हवीशी वाटतात ,
प्रत्यक्षात तो जगतो फ़क्त एकाकी जीवन .

आयुष्यात चालायला असंख्य मार्ग मिळतात ,
प्रत्यक्षात धड एक मार्ग सुचत नाही .

आयुष्यात असंख्य माणसे भेटतात ,
प्रत्यक्षात कोणाचाच सहवास नसतो .

आयुष्यात खूप जीव लावावासा वाटतो ,
प्रत्यक्षात जवलपास कोणीच नसतो .

आयुष्यात आपण फ़क्त दुसर्यांसाठी जगत असतो ,
प्रत्यक्षात आपल्यासाठी कोणीच जगत नसतो .

आयुष्यात एकदा दीर्घायुष्य लाभावस वाटत ,
प्रत्यक्षात रोजच्या त्रासाने जगण सोडावस वाटत .

आयुष्यात सुखाने पुर्या इच्छासह मरायच असत ,
प्रत्यक्षात अपुर्या इच्छा , तलमलत मरण येत .

आयुष्यात खूप काही करायच असत ,
प्रत्यक्षात ते करायला आयुष्यच उरत नाही .

दारोळ्या (माझ्याही!)

प्यायला लागल्यावर चढायचीच
केंव्हा चढते ते कळत नाही
एकदा चढलेली उतरायचीच
उतरणं काही टळत नाही

दारु पिताना एक तत्व पाळावं
सोसेल तेवढीच प्यावी
सगळी संपवायला थोडीच हवी ?
उरली , तर घरी न्यावी!
एक एक पेग कसा
चवी चवीनं प्यायचा
किती पेग झाले याचा
हिशेब असतो द्यायचा

दारू पिऊन झाल्यानंतर
एक लढाई लढायची असते
पार्टीनंतर घरामधली
साफसफाई करायची असते
पिऊन थोडी चढणार असेल
तरच पिण्याला अर्थ आहे
एवढी ढोसून चढणार नसेल
तर आख्खा खंबा व्यर्थ आहे

मी तसा श्रध्दावान
श्रावण नेहमी पाळतो
श्रावणात फक्त दारू पितो
नॉनव्हेज मात्र टाळतो
ज्याची जागा त्याला द्यावी
भलती चूक करू नये
पिताना फक्त पीत रहावं
चकण्यानं पोट भरू नये

वेळच्यावेळी आपण ओळखावी
आपली आपली आणिबाणी
लाज सगळी सोडुन देऊन
ग्लासात घ्यावं लिंबुपाणी
पिऊन तर्र झाल्यानंतर
काय खातोय ते कळत नाही
खाल्ल्यानंतर बिलामधली
टोटल कधी जुळत नाही

आपला ग्लास आपण सांभाळावा
दुसऱ्याला घेऊ देऊ नये
दुसऱ्याचा ग्लास उचलण्याची
वेळ आपल्यावर येऊ नये
अशीही वेळ असते जेंव्हा
कोणीच आपला नसतो
म्हणून आपण प्यायला जातो
तर नेमका ड्राय डे असतो

आपला पेग आपण भरावा
दुसऱ्यावर विश्वास ठेवू नये
आपला ग्लास , आपली बाटली
दुसऱ्यांच्या हातात देऊ नये
असं उगीच लोकांना वाटतं
की दुःख दारूत बुडून जातं
दुःख असतं हलकं हलकं
अल्कोहोलसोबत उडून जातं!

एकदा प्यायला बसल्यानंतर
तुझं-माझं करू नये
तुझी काय , माझी काय
नशा कधी सरू नये
तुला जायचंच असेल तर निघून जा ,
जाण्यासाठी भांडू नकोस
प्यायची नसेल तर पिऊ नको ,
पण दारू अशी सांडू नकोस

आपला आवाज दणकयात हवा
उगाच लाऊडस्पीकर कशाला ?
पिऊन प्यायची तर देशी प्यायची
उगाच फॉरीन लिकर कशाला ?
फॉरीन लिकर कितीही प्यावी
काही केल्या चढत नाही
देशी आपली थोडीशीच प्यावी
दोन दोन दिवस उतरत नाही

घरी बसून दारू प्यायचे
खूप सारे फायदे असतात
हॉटेलमधे , बिल भरायचे
काटेकोर कायदे असतात
आम्ही कधीच दारूमधे
दुःख आमचं बुडवत नाही
दारू नेहमी शुध्दच ठेवतो
भेसळ आम्हाला आवडत नाही

हवा तसा मी चालतो आहे
कोण म्हणतंय ' जातोय तोल ?'
माझ्या मित्रा , माझ्या इतकी
पचवून दाखव , नंतर बोल!
प्रत्येक पार्टीत आपण बोलवावे
काही ' न ' पिणारे मित्र
पार्टीनंतर आपल्याला आपल्या
घरी नेणारे मित्र

पिणाऱ्यांनी समाजाचा
कुठलाच कायदा पाळू नये
जेंव्हा , जिथे , जशी वाटेल
प्यायचा मोह टाळू नये
प्रत्येकानंच आपला आपला
जसा घ्यायचा असतो श्वास
तसा प्रत्येकानं आपला आपला
सांभाळायचा असतो ग्लास

पण दुःख अमर आहे!

जिद्दीस पेटला; हट्ट नको तो केला
पाहिली सुखाची वाट; शेवटी मेला
तो जाता जाता हेच सांगुनी गेला -
`...मरतात माणसे; पण दुःख अमर आहे!`

सारखा सुखाच्या धावधावला मागे
चडफडला, चिडला, रडला, भरला रागे
शेवटी म्हणाला सर्व विसरुनी त्रागे -
`...मरतात माणसे; पण दुःख अमर आहे!`

जगण्याच्या नावाखाली क्रूर कुचेष्टा
ही विटंबना; या अविरत हाल-अपेष्टा
कोकले कुणी तो दूर सुखाचा द्वेष्टा -
`...मरतात माणसे; पण दुःख अमर आहे...!`

ही व्यर्थ, निरर्थक इथली नातीगोती
जी परस्परांच्या दुःखां कारण होती
अन् गलका होतो अंती हाच सभोती -
`...मरतात माणसे; पण दुःख अमर आहे...!`

हा उरला आता शेवटचाच शिपाई
संपेल तरी का मग असमान लढाई ?
मेलाच पहा तो, बोले घाई घाई -
`...मरतात माणसे; पण दुःख अमर आहे...!`

विश्वात आज या कुणीच उरले नाही
दाटून राहिले दुःख दिशांना दाही
ललकारी आता घुमेल हीच उद्याही -
`...मरतात माणसे; पण दुःख अमर आहे...!`

माणूस क्षुद्र; त्याची ही क्षुद्र कहाणी
संघर्षानंतर उरली काय निशाणी ?
बोलेल कुणाच्या डोळ्यांमधले पाणी ? -
`...मरतात माणसे; पण दुःख अमर आहे...!`

***
मी कधीच त्याच्या नाही पडलो हाती
मी कधी न झालो का त्याचा सांगाती ?
सुख रडते; म्हणते, पिटून आता छाती -
`...मरतात माणसे; पण दुःख अमर आहे...!`

आई, असं का ग केलंस?

आई, असं का ग केलंस?
(मनाला स्पर्शून गेलेले आईला लिहिलेले एक पत्र..)


उरिया भाषेतील लेखक...श्रीकांत पारिजा यांनी एकदा एक हत्या झालेला स्त्री गर्भ पाहिला. त्या क्षणी त्यांचा पोटात ढवळून आलं. काय करावं ते सुचेना.
त्यानंतरचे कित्येक दिवस त्यांच्या मनातून ते दृश्य आणि त्या अकाली फेकून दिलेल्या चिमुकलीविषयीचे विचार पुसले जात नव्हते. मग त्यांनी लेखणी उचलली आणि
त्या आईलाच एक पत्र लिहिलं......उरिया भाषेत प्रसिद्ध झालेल्या त्या पत्राचा अनुवाद केला आहे कटक येथे राहणाऱ्या "राधा जोगळेकर" यांनी.
( सकाळ च्या सप्तरंग पुरवणीतून आज हे पत्र इथे पोस्ट करतांना फक्त हीच विनंती आहे कि हे पत्र कॉपी करून शक्य तितक्या लोकांपर्यंत email करून पोचवा....
हे वाचून एक जोडप्याचे जरी विचार बदलले तरी "सार्थक" झाले असे मी समजेन.....हे पत्र पोस्ट करायची हि जागा आहे का नाही मला माहित नाही...चुकल्यास क्षमा
असावी.
आणि पुन्हा एकदा हे पत्र शक्य तितक्या लोकांपर्यंत पोचवा हि विनंती. )


आई, असं का ग केलंस?
का ग, तुला माझी थोडीशीही आठवण येत नाही का? तू असं का केलंस?
मी तुला पाहण्यासाठी किती आशा लावून बसले होते; पण तू मला मारूनच टाकलस.
तुला माहित आहे का आई, मी फक्त तुलाच ओळखत होते. आणखी कोणाचा स्पर्शही नव्हता झाला मला.
माझ्या आयुष्यातल्या त्या चार महिन्यात मी जे काही अनुभवलं, ते फक्त तुझ्याचमुळे ग.
आई तुला आठवत का? माझा भाऊ राजा जेव्हा रडायचा, तेव्हा तू त्याला समजवायचीस, कि रडू नकोस.
आता तुला थोड्याच दिवसात तुझ्याशी खेळायला आणखी एक भाऊ येईल.
तेव्हा मी तुझ्या पोटात खळखळून हसायचे आणि म्हणायचे, 'आई भाऊ नाही.
राजाभाईची छोटी बहिण येणार आहे.
तू राजाभाईला कुशीत घेऊन झोपी जायचीस; पण मला मात्र रात्रभर झोप यायची नाही.
भाईबरोबर दंगामस्ती करण्याची, खेळण्याची मला खूप इच्छा व्हायची. मग पोटात असूनही मी त्याला
हळूच पायाने ढकलून द्यायचे. तोही झोपेतून जागा झाल्यावर तुझ्या पोटाला हाताने ढकलत असे. मला लागायचं.
तरीही खूप आनंद व्हायचा. का माहिती आहे? कारण बहिण-भावातल्या खेळाची मजा वेगळीच असते!
कधीतरी भाईला बर नसायचं, तेव्हा तू म्हणायचीस, 'हे माँ, माझ्या मुलांना सुखी ठेव.
ते ऐकून माझ्या लहान लहान डोळ्यात पाणी दाटून येई. वाटे, माझी आई किती चांगली आहे.
मुलांवर तिची किती माया आहे. तुझ्यामुळे मला समजल, कि आणखी एक मोठी आई, "माँ" आहे,
जी माझ्या आईला शक्ती देते. सामर्थ्य देते.
माझे हे चार महिने फक्त तुझा विचार करण्यात गेले. मनात सतत एकाच विचार असायचा, तुला बघण्याचा!
एकदा तू राजाभाईला म्हणत होतीस. माझ्या बाळा तुझ्यासाठी दहा महिने मी त्रास सोसल्यावर तुझा जन्म झाला.
मोठा झालास, की आईचं नाव उज्वल कर, वगैरे वगैरे.....
त्या दिवशी मला रडूच आलं. तू राजाभाईचे लाड करत होतीस म्हणून नाही, तर माझ्या आईला बघण्यासाठी मला अजून
सहा महिने वाट पहावी लागेल म्हणून.....
मग एक दिवशी तू आणि ते पप्पा नावाचे कोणीतरी डॉक्टरांकडे जाण्यासाठी बाहेर पडलात.
रस्त्यांमध्ये असताना मला खूप जोरात धक्का बसला. आतल्या आत बराच मार बसला. मग तू पप्पांना
गाडी हळू हळू चालवायला सांगितलस. बाळाला त्रास होईल म्हणालीस. तुला माझी किती काळजी वाटते,
हे पाहून मला किती बर वाटल होत.
दवाखान्यात तू झोपलीस, तेव्हा मी तुझ्या पोटात खेळत होते. तुझ्या पोटावर काहीतरी लावून डॉक्टर जेव्हा तपासात होते,
तेव्हा मला खोडसाळपण करण्याची खूप इच्छा झाली होती. मी पोटातल्या पोटात पटापट फिरत राहिले. म्हणून डॉक्टर म्हणाले,
"मुल खूप हालचाल करत आहे, त्यामुळे काही समजत नाही."
थोड्या वेळाने ते म्हणाले, की मुलगी आहे. त्यानंतर एकदम शांतता पसरली. मग तो पप्पा नावाचा माणूस म्हणाला,........
"सर, अबोर्शन करा..."
डॉक्टर म्हणाले "उद्या सकाळी या."
मी पोटामध्ये खिदळत होते.
दुसर्या दिवशी सकाळी देवाची पूजा करताना आई तू म्हणालीस, हे माँ, मला नीटपणे जाऊन सुखरूप घरी येऊ दे."
मला वाटल, की तुझी तब्येत बिघडली असावी, मी पण पाणावलेल्या डोळ्यांनी त्या मोठ्या आईला म्हणाले,
की माझ्या आईला लवकर बर कर....
नंतर.....नंतरच तुला माहीतच आहे....
आई, का ग मारलस मला? आई, तुला बघायचं होत ग डोळेभरून.
मी तुला पाहिल्यानंतर मला मारून टाकलं असतस तरी चालल असत मला.
आई मला पुन्हा एकदा तुझ्या गर्भात जागा दे. मला हे जग बघायचं आहे. मलाही शाळेत जायचं आहे.
राजाभाईसारखा " हेप्पी बर्थ डे" करायचा आहे. हसत खिदळत तुझ्यामागे धावायचं आहे.
आई, फक्त एकदाच मला कुशीत घेऊन माझे लाड कर ना ग....आणि फक्त एकदाच माझ्या कानाशी म्हण....
'झोप ग माझ्या लाडक्या बाळा, तुझी आई आहे ना जवळ...मग कशाला घाबरतेस....'
............ ....आई एकदाच...........फक्त एकदाच.........

महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय

महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय

महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय , जय जय राष्ट्र महान
महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय , माझे राष्ट्र महान
कोटी कोटी प्राणांत उसळतो एक तुझा अभिमान

बलिदाने इतिहास रंगला तुझाच पानोपान
तूच ठेविले स्वातंत्र्याचे फडकत उंच निशाण
तू संतांची , मतिमंतांची , बलवंतांची खाण
तूच ठेविला कर्मयोगमय जागृत यज्ञ महान

मातीच्या चित्रात ओतले विजयवंत तू प्राण
मराठमोळी वाणी वर्णी वेदांताचे ज्ञान
पंढरीत नांदले अखंडित भक्तीचे जयगान
ब्रीद न सुटले झुंझारांचे रणी होता निर्वाण

वज्रापुढती अभंग ठरले तुझेच ना पाषाण !
काळालाही जिंकून गेले इथले प्रज्ञावान
मानवतेचे समतेचे तू एकच आशास्थान
पराक्रमावर तुझ्या विसंबे अखंड हिंदुस्थान

* कवी - चकोर आजगावकर * संगीतकार - श्रीनिवास खळे
* मूळ गायक -शाहीर साबळे व समूह

कट्टा ...

आमचा कट्टा म्हणजे
आमचा जिवकी प्राण
तिथे गेलो कि विसरतो
दिवसभरचा त्राण!!

कट्ट्यावर बसून आम्ही
चव्हाट्या मारत बसतो
पोरीना पाहण्याशिवाय
आम्हाला दुसरा धंदा नसतो!!

दिसलीच छान दिसणारी
नझर सगळ्यांची तिकडेच वळणार
ती जास्तोपर्यंत २ मिनिट
वातावरणात एकदम शांतता पसरणार!!

एकमेकांना चिडवण्यातच
आमची संध्याकाळ होते
पार्टीच नाव काढताच
पैशाची जमवाजमव होऊ लागते!!

कुठे लफडा व्हायची खोटी
कट्ट्यावर सगळी पोर हझर
फटकवयाचा ठरवलं तर
ठेवलीच त्याच्यावर नझर!!

मग तर कुणाच्या बापालापण
आम्ही जुमानत नाही
आमदाराच्या पार्टीऑफिसची पण
मग मुलाहिजा बाळगत नाही!!

कसलीपण मदत असो
आम्ही मिळून करत असतो
पैशाची अडचण, शब्दांचा आधार
एकमेकांना पुरवत असतो!!

गणेशोत्सव असो वा होळी
कट्ट्याशिवाय पान गळत नाही
कसल्यापण एरियातला भाई असो
आमच्या सेक्टर मध्ये वळत नाही!!

तरी आमचेच पालक कट्ट्याला
शिव्या घालत बसतात
गेलो थोडा वेळ तरी
आमच्या नावाने खडे फोडतात!!

मैत्री ..

जीवन म्हणजे अलुच्या पानावरील दवबिंदु
टिकला तर मोती नाहीतर माती
तुझ जीवन नेहमी मोती असू दे
आणि हा मोती सदैव आपल्या
आठवनिच्या आणि मैत्रीच्या शिम्प्ल्यात वसु दे.....

रक्ताची नाती जन्माने मिळतात
मानलेली नाती मनाने जुळतात
पण नाती नसतानाही जे बांध जुळतात
त्या बंधाना "मैत्री" म्हणतात

पावसातून जेवढा ओलावा मिळत नाही
तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो
मैत्रिमधल्या सावलीचा अर्थ
कधीतरी उन्हातुन गेल्यावर कळतो

माणुस सर्वश्रेष्ठ प्राणी आहे;
परन्तु तो गवताहून दुर्बल आहे
आपण सारेच भंगलेल्या मूर्तीचे अवशेष आहोत
तरी परस्पर विश्वासाच्या चिवट धाग्यांनी
मैत्रीचे जरतारी वस्त्र विणले आहे
एखादा धागा जरी जरासा उसवला तर
जगण्यातील स्वारस्य निघून जाते....

मंगल देशा , पवित्रा देशा , महाराष्ट्र देशा

मंगल देशा , पवित्रा देशा , महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा

राकट देशा , कणखर देशा , दगडांच्या देशा
नाजुक देशा , कोमल देशा , फुलांच्याहि देशा
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा
भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा
शाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा
ध्येय जे तुझ्या अंतरी , निशाणावरी , नाचते करी ;
जोडी इह पर लोकांसी , व्यवहारा परमार्थासी ,
वैभवासि , वैराग्यासी
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥१॥

अपार सिंधुच्या भव्य बांधवा , महाराष्ट्र देशा
सह्याद्रीच्या सख्या , जिवलगा , महाराष्ट्र देशा
पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा
गोदा , कृष्णा , भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा
तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची
मंगल वसती जनस्थानिंची श्रीरघुनाथांची
ध्येय जे तुझ्या अंतरी ..... ॥२॥

कवी -गोविंदाग्रज
संगीतकार - वसंत देसाई
मूळ गायक - जयवंत कुलकर्णी व समूह

वाढदिवस….

वाढदिवसांची कैक अर्थानं उपयूक्तता असते
ज्याचा जास्त साजरा झाला तितका माणूस
अधिक वर्ष जगला असं गणित सांगते
सुर्यप्रदक्षिणेच्या सहलीचा पहिला दिवस,
तसं म्हणायला ३६५ दिवसांची वारी असते

आतापर्यंत सरलेल्या संपूर्ण आयूष्याचा
ताळेबंद जमाखर्च मांडण्यातच रात्र सरते
नकळत निसटलेले सुख-दुःखाचे क्षण
वेचता वेचता अगदी पुरेवाट होत असते
आयूष्याचा प्याला अर्धा रिकामा म्हणावा
कि भरलेला अशी संभ्रमावस्था असते.

जीवनाची पोथी खूप वाचून झालेली असते
आता थोडीशीच राहिली, विचार मनी येताच
दोन्हीही डोळ्यांची कडा ओली झालेली असते
आपल्या नजरेत आणखी वयं वाढलेले असते
नियती मात्र राहिलेली वर्ष कमी करत असते

एखाद्या चोरासारखी हळूच डेरेदार वृक्षाची
एकेक बहरलेली फ़ांदी तोडून नेत असते
आयूष्याच्या ग्रंथाला कडू-गोड अनुभवांचे
आणखी एक सोनेरी पान जोडलेले असते

विनाकारण मग पोक्तपणाची भावना बळावत असते
ललाटीचे प्राक्तन जसे आनंदावरचे विरजण असते
अशावेळी आजच्या वयाला दोनानं भागायचे असते
म्हणजे एकाच वेळी दोन लहान मुलं अन एका मोठ्या
व्यक्तीसारखं बिनदिक्कत वागायला काहीच अडचण नसते

हात सुटले तरी मैत्रीची कास सोडायची नसते.
गेलंच सोडून कूणी, हृदय अवजड करायचे नसते ———–

बहु असोत सुंदर संपन्न की महा

बहु असोत सुंदर संपन्न की महा

बहु असोत सुंदर संपन्न की महा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ॥ धृ ॥

गगनभेदी गिरिविण अणू न च जिथे उणे
आकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे
अटकेवर जेथील तुरंगी जल पिणे
तेथ अडे काय जलाशया ना दावीणे
पौरुष्यासी अटक गमे जेथ दुःसहा ॥ १ ॥

विलम वैराग्य एक जागी नारती ??
जरी पटका भगवा झेंडाही डोलती
धर्म राजकारण एक समवेत चालती
शक्ति युक्ति एकवटुनी कार्य साधती
पसरे या कीर्ति अशी विस्मया वहा ॥ २ ॥

गीत मराठ्यांचे श्रवणी , मुखी असो
स्फूर्ति रिती धृति ही देत अंतरी ठसो
वचनी लेखनी ही मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो
देह पडॊ सकारणी ही असे स्पृहा ॥ ३ ॥

कवि - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
संगीत - शंकरराव व्यास

दुःख

मलाच माहित नसलेल एक दुःख
मनात आहे साठून,
बरेचदा मी विचार करतो कि नक्की हे
उगवत तरी कोठून,
मग एक नवा खेळ होतो सुरु,
मी म्हणतो मनाला
"चल ह्या चोराचा पाठलाग करु"
मागे मागे मी आणि पुढे पुढे मन धावत,
शेवटी काही वेगळ नाही
तुझ्याच दाराशी जाउन थांबत...

शेवटची निघून जाताना

तू निघून चाललीयेस कायमची हे कळल्यावर
अचानक लक्षात येतंय
तुझ्यावर लिहिणार होतो मी एक प्रेमकविता
तुझ्या नुस्त्या आसपास असण्यादिसण्यानेच जणू
आपोआप उमटत जातील ओळी कुठल्यातरी कागदावर
इतके माझे डोळे तुझे झाले होते
पण मधल्या काळात या शहराने
कुठलं तरी ट्रॅफिक जॅम , कुठलं तरी प्रदूषण ,
कुठला तरी कल्लोळ सोडला होता आपल्या दोघांमधे आता
तुला शेवटचं पाहताना बघ कशी स्लोमोशन झालीये गदीर्
तुझ्या हसण्याच्या उंच पुलावरून दिसतायत मला खाली
तरंगत चाललेली हजारो माणसं
डोक्यावर चंपाचमेलीमोगरागुलाब उगवलेली
साऱ्या मोटारी उडू लागल्यात फुलपाखरं होऊन
स्कुटरी गुणगुणू लागल्यात भुंग्यांसारख्या
सायकली चाल्ताहेत आपोआप
कुणीतरी अदृश्य माणूस नुक्ताच सायकल शिकल्यासारख्या
रस्त्याच्या फांद्यांना रिक्शा लटकल्यात मधमाशांच्या पोळ्यांसारख्या
रेल्वेगाड्या यार्डातल्या वारुळांतून
कात टाकून बाहेर पडल्यात लखलख
आपण धावत सुटलो आहोत एका वेगळ्याच प्रवासाला
हे ठाऊक असल्यागत बसेस थांबून राहिल्यात सिग्नल्सवर

आपलीच वाट पाहात
आपण कफल्लक झालो आहोत पुरते हे कळल्यासारखे
वाटेवरचे सारे भिकारी
उधळत सुटलेत ओंजळींनी हवेत त्यांचे सारे सुटे पैसे
आणि नाण्यांच्या त्या अलगद पावसातून
आपण निघालो आहोत एकमेकांना बिलगून
बेफिकिरीच्या एकाच छत्रीखालून
आपल्याला खात्रीच आहे
जणू कंडक्टर आपल्याला सोडेल फुकट कुठवरही
आणि आता निर्वाणीच्या या क्षणी
तू भिजून उभी आहेस माझ्यात चिंब
आणि माझ्या डोळ्यात तुझंच प्रतिबिंब
एकमेकांचा हात सोडून
आपण आयुष्याच्या या सर्वात उंच कड्यावर उभे आहोत
झोकून द्यायला संपवायला सगळंच तुझ्यामाझ्यातलं
पण
एक तुझ्या लक्षात येतंय का... ?
झोकून देण्याआधीच
आपण ' पुन्हा ' तरंगायला लागलो आहोत
- सौमित्र

कॉलेज

कॉलेज
Syllybus जरा जास्तच आहे
दर वर्षी वाटतो...
Chapters पाहून Passing चा
Problem मनात दाटतो...

तरी lectures चालू राहतात
डोक्यात काही घुसत नहीं....
चित्र-विचित्र figures शिवाय
Board वर काहीच दिसत नाही....

तितक्यात कुठून तरी Function ची
Date जवळ येते...
Sem मधले काही दिवस
नकळत चोरून नेते...

नंतर lecturers Extra घेउन
भरभरा शिकवत राहतात...
Problems Example Theory सांगून
Syllybus लवकर संपवू पाहतात...

पुन्हा हात चालू लागतात...
मन चालत नाही....
सरांशिवाय वर्गामध्ये
कुणीच बोलत नाही...

Lectures संपून Submission चा
सुरु होतो पुन्हा खेळ..
journal Complete करण्यामध्ये
फार फार जातो वेळ...

चक्क डोळ्यांसमोर Syllybus
चुटकी सरशी sampun जातो..
'PL's मध्ये वाचून सुद्धा
Paper काबर सो...सो..च जातो?????

काँलेज

काँलेज म्हणजे तरुणाइचं
गाव असत...
प्रत्येक तरुणांच्या मनात
कोरलेलं एक नाव असत...

हेच गाव कधीतरी
जाग होत..
आठवणीँच्या हिदोँळ्यावर
झेपु पाहत..

काँलेजच्या कट्यावरुन रोज
हिरवळ जायची..
ती पाहण्यासाठी पोरांची
चंगळ मग उडायची..

लायब्ररीमध्ये अभ्यास करायची
फक्त एक ट्रीक होती..
शांततेत नजर मिळवीण्याची ती
एक टेकनीक होती..

Phy. चे सर शिकवायचे
Law न्युटनचे..
इकडे मुलांचे
खेळ.., फुल्ली गोट्यांचे...!

केमिट्रीच्या प्राकटीकलला
मुलीँचाच Basis...
कोण करतय मग
Qualitative analesis...!

I.T शिकवायला एक
मिस होती..
सर म्हणायचे आमच्या
काँलेजमध्ये तीच एक पिस होती..

ENG. च्या मँडमची होती
वेगळीच अदा..
आणि PHY. शिक्षक तीच्या
भुगोलावर फिदा...

वर्गात असली 40 कार्टी
तरी हजेरी 80 ची लागयची..
मित्रांची मित्रता यातुनच
तर दिसुन यायची..!

EXAM hall l ची सेटिँग
आम्हीच करायचो..
त्यातुनच तर मार्काँची,
बेरीज आम्ही करायचो...

काँलेच्या आठवणिँना
शब्द अपुरे पडतात..
पण त्याच आठवणीँनी
आता.., डोळे मात्र पाणवतात...!

मित्रांनो

मित्रांनो ,

मी इ - मेल करतो ,
याचा अर्थ असा नाही ,
मला काही काम नाही ;
कामात फोन करुन
व्यत्यय टाळण्यासाठी ,
इ - मेलसारखे दुसरे साधन नाही

मी हसत असतो
याचा अर्थ असा नाही ,
माझं डोकं जाग्यावर नाही ;
दु : खाचे प्रदर्शन करुन ,
सांत्वनाचे शब्द मिळवण्यापेक्षा ,
हसत राहणे वाईट नाही


मी सुखात असतो
याचा अर्थ असा नाही ,
दु : खात मी होरपळलो नाही ;
दुसऱ्याला दु : खात खेचण्यापेक्षा ,
एकट्याने होरपळणे चुकीचे नाही

सर्वांची खिल्ली उडवतो ,
याचा अर्थ असा नाही ,
मला त्यांच्या भावनांची कदर नहीं ;
खोटी समजूत घालून ,
मर्जीत राहण्यापेक्षा ,
खिल्ली उडवणे वाईट नाही


कट्ट्यावर टपोरिगिरी करतो ,
याचा अर्थ असा नाही ,
की प्रेम मला समजत नाही ;
प्रेम करुन कुणाला फसवण्यापेक्षा ,
कट्ट्यावर शिट्ट्या मारणं ,
टपोरिगिरीचे लक्षण नाही


पीजे मारून हसवतो ,
याचा अर्थ असा नाही ,
की मला परिस्थितीचे गांभीर्य नाही ;
तणाव निर्माण करण्यापेक्षा ,
पीजे मारून हसवण्यात ..
काही गैर नाही ....

याचा अर्थ असा नाही
की मला काही काम नाही ..
-

ह्रदयाच्या पुस्तकात......

ह्रदयाच्या पुस्तकात......
किती पटकन तू बोललीस विचार कर तुला सारे सोडून का गेले
तुला ठऊक होते सारे तरी तुला बोलावेसे असे का वाटले
माणसांच्या गर्दीत तुझा किती विश्वास मला वाटला
तुझ्या मनाची जागा हा मला विसाव्याचा कट्टा वाटला

पण क्षणात तू मला परकेपणाची जाणीव करून दिली
मैत्रीच्या रेशीम धाग्यात पहिलीच गाठ परकेपणाची बांधली

रंग मला हवे होते पण कधीही मी हिसकावून नाही घेतले
आनंदाच्या झाडाची फुलेही मी कधीच मजसाठी ओरबाडून नाही घेतली

सहज जी झाडावरून पडली तिच फुले मी वेचली
ह्रदयाच्या पुस्तकात जपून सारी ठेवली

पण तू ती फुले ही जाता जाता घेऊन गेलीस
ह्रदयाच पुस्तक तुझ्यासाठी रिकाम झाल खरं
पण तुझ्या बोटांचे ठसे तुझ्याही नकळ्त
तू कायमचे माझ्या ह्रदयाच्या पुस्तकात कायमचे ठेऊन गेलीस..............

जिवलग मित्र...

हाच तर जिवलग मित्र असतो...
कोल्ड ड्रिंक मधे दारू मिसळवतो
टाईट झाल्यावर उशिरा रात्री घरी सुखरूप सोडतो
१ दिवस फोन नहीं केला तर रागवतो
फोन केला तरीही शिव्या घालतो
समोरून एखादी फाकडू पोरगी जात असेल तर
तिच्या समोर मस्त पोपट करतो
कॉलेज ला आल्यावर पहिला कॉल आपल्याला करतो
कुठे आहेस म्हणुन विचारतो
पिकनिक ला जाताना
आई बाबांना हाच तर मस्का लावायला कामी येतो
बाइक वरून पडलो की सगळे हसत असताना
धावत येउन उचलतो
आपण विसरलो तरीही
वाढदिवशी १२ वाजता बरोबर मेसेज करतो
परिक्षेच्या वेळी
सुपरवायज़रला घाल चुलीत म्हणुन सप्प्लिमेंट हातात देतो
काही चुकले तर ओरडतो
गरज असेल तर कान पीळतो
इतर मित्रांच्या तुलनेत
आपली जास्त काळजी घेत असतो
हाच असतो जो
आपल्या कली रूपी आयुष्याला फुलवत नेत असतो
हाच असतो जो
आपल्या कृष्ण-धवल आयुष्यात रंगांची उधलन करत असतो
दुखात असताना.. जवळ येउन काय झाल..? म्हणुन विचारतो
आपण नजर खाली करून काही नाही म्हणुन त्याला टाळतो
आपल्या डोळ्यात बघून
काय रे एवढा परका झालो का..? असा उलट प्रश्न करतो
सुखात हक्काने पार्टी मागणारा
आणि दुखात रडायला खांदा देणारा हाच तर जिवलग मित्र

स्वामी तिन्ही जगाचा...

स्वामी तिन्ही जगाचा...
’आई !’ म्हणोनी कोणी । आईस हाक मारी
ती हाक येइ कानी । मज होय शोककारी
नोहेच हाक माते । मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी ? । आई घरी न दारी !
ही न्यूनता सुखाची । चित्ता सदा विदारी
स्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी.

चारा मुखी पिलांच्या । चिमणी हळूच देई
गोठ्यात वासरांना । या चाटतात गाई
वात्सल्य हे पशूंचे । मी रोज रोज पाही
पाहून अंतरात्मा । व्याकूळ मात्र होई !
वात्सल्य माउलीचे । आम्हा जगात नाही
दुर्भाग्य याविना का ? । आम्हास नाही आई

शाळेतुनी घराला । येता धरील पोटी
काढून ठेवलेला । घालील घास ओठी
उष्ट्या तशा मुखाच्या । धावेल चुंबना ती
कोणी तुझ्याविना गे । का ह्या करील गोष्टी ?
तूझ्याविना न कोणी । लावील सांजवाती
सांगेल ना म्हणाया । आम्हा ’शुभं करोति’

ताईस या कशाची । जाणीव काही नाही
त्या सान बालिकेला । समजे न यात काही
पाणी तरारताना । नेत्रात बावरे ही
ऐकूनि घे परंतू । ’आम्हास नाहि आई’
सांगे तसे मुलीना । ’आम्हास नाहि आई’
ते बोल येति कानी । ’आम्हास नाहि आई’

आई ! तुझ्याच ठायी । सामर्थ्य नंदिनीचे
माहेर मंगलाचे । अद्वैत तापसांचे
गांभीर्य सागराचे । औदार्य या धरेचे
नेत्रात तेज नाचे । त्या शांत चंद्रिकेचे
वात्सल्य गाढ पोटी । त्या मेघमंडळाचे
वात्सल्य या गुणांचे । आई तुझ्यात साचे

गुंफूनि पूर्वजांच्या । मी गाइले गुणाला
साऱ्या सभाजनांनी । या वानिले कृतीला
आई ! करावया तू । नाहीस कौतुकाला
या न्यूनतेमुळे ही । मज त्याज्य पुष्पमाला
पंचारती जनांची । ना तोषवी मनाला
परि जीव बालकाचा । तव कौतुका भुकेला

येशील तू घराला । परतून केधवा गे !
दवडू नको घडीला । ये ये निघून वेगे
हे गुंतले जिवाचे । पायी तुझ्याच धागे
कर्तव्य माउलीचे । करण्यास येइ वेगे
रुसणार मी न आता । जरि बोलशील रागे
ये रागवावयाही । परि येइ येइ वेगे

अदा...

(त्याला झालाय उशीर.. मनवतोय तिला कसाबसा…)

तोः तु मृगनयनी असे,तु मनमोहिनी
का वेडविशी तु मला तु स्वप्नी येवुनि ?
तीः मी ना तुला पाहिले,ना भेटले येवुनी
मग कोण विचारे कुट तु, तु मला अडवुनी?

तोः जे भेटले सहज तुला सहज जे भेटले
सोडीशी का सहज ते,सहज भेटले म्हनुनी?
तीः मी ना अशी वागले,वागते ना अशी
वागले जरी तरी कोण तु विचारीशी?

तोः ना विचारु मी तुला , ना स्मरे धागे जी गुंफली?
वद विसरलिस माला शपथ शिरी घेवुनी…
तीः(जरा गोंधळुन)मी ना शपथ घेणार का शपथ घेवु मी?
सर्व स्मरते मला ,विना शपथ घेवुनी.

तोः(जरा विचार करुन)वाटते अदा मला तुझी अदाच वाटते
का कुट विचारुन तु हासे ओठ् दाबुनी?
तीः(लटक्या रागाने)थकले आज् थांबुनी,थकले वाट पाहुनी
मग का पिडू ना तुला ,कुट हे विचारुनी?

तोःक्शन दोन थांबलीस जरा,थांबली क्शन घेवुनी ,
काय नभ बरसले इथे अन् गेले तुज् भिजवुनी?
तीः ना नभ बरसले इथे ,ना गेले मला भिजवुनी
घायाळ मी घायाळ रे इथल्या हरएक नजरांनी !

तोः(गुढघ्यावर…कान पकडुन्..)
पुन्हा आज झुकतो नमतो पुन्हा आज मी..
चल विहरण्यास चल,ना आढेवेढे घेवुनी

देता का थोडेसे शब्द उसने !!

सांगायला माझ्या जिवाचे दुखणे
देता का थोडेसे शब्द उसने !!

मी शब्द जपून वापरले
कधीच केले नाहीत वायफळ खर्च
तरीही आज मागावं लागतय कर्ज

मी शब्दांची केली पूजा
पण जेव्हा आला परतफेड करायचा मोका
तेव्हाच नेमका दिला यांनी मला धोका

आवडत नाही मला शब्दांचे रूसणे
देता का थोडेसे शब्द उसने !!

सुखात शब्द साथ देतात
प्रेमातही बरोबर असतात
आज दु:खातच शब्द तोटके पडले
आज माझे मन एकटेच रडले

गायला हे रडगाणे
देता का थोडेसे शब्द उसने !!

परत करीन मी तुम्हाला हे शब्द
शब्द फुटत नाहीत, रडूच फुटतय
शब्द गेल्यामुळे जीव तीळ-तीळ तुटतोय

आज शब्दबध्द करायला रडणे
देता का थोडेसे शब्द उसने !!

उमेद

हिमालयाची उत्तुंग शिखरेही
सतत खुणवायची तेव्हा,
आता, लिफ्टशिवाय
तिसरा मजलाही पर्वत वटतोय..

मोकळ्या रानावरचा सोसाट्याचा वाराही
अंग-प्रत्यंग फुलवून टाकायचा तेव्हा,
आता, लपेटलेल्या शालीतून
पंख्याचं वारं ही झोम्बतेय..

उधाणलेल्या समुद्राचा तळही
सहज गवसायचा तेव्हा,
आता, ‘थंड पाण्याने आंघोळ’
हा विचारही हुडहुडी भरवतोय..

आभाळाला गवसणी घालणारीही
स्वप्नं होती या डोळ्यात,
आता, जीवनाचे ध्येयही
अन्न-वस्त्र-निवार्‍यापुरतेच उरलेय..

तेव्हा, तरुण होतो मी
आता, म्हातारा झालोय मी
पण नक्की कशाने
वयाने की मनाने??

सांगू?? काय काय व्हायचंय मला

खोवशील ना मला माझ्याही नकळत
तुझ्या वेणीतलं मोगर्‍याचं फ़ुल व्हायचंय मला

भिजशील ना माझ्या अंगणात मनसोक्त
तुला आवडणारी सुखद श्रावणसर व्हायचंय मला

झेलशील ना मला हळूवार अलगद
तुझ्या अळवावरचा टपोरा थेंब व्हायचंय मला

देशील ना मला प्रेमानं आलिंगन
तुझ्या कुशीतली कापसाची ऊशी व्हायचंय मला

सावरशील ना मला नेहमी भरकटताना
तुझ्या साडीचा ढळणारा पदर व्हायचंय मला

शोधशील ना मला नितळ सागरकिनारी
तुला सापडणार्‍या शिंपल्यातला मोती व्हायचंय मला

पुसशील ना मला तुझ्या रुमालाने
तुझ्या गालावरुन ओघळणारा अश्रू व्हायचंय मला

घालशील ना हळुवार प्रेमाची फ़ुंकर
तुझ्या नाजूक तळहातावरला फ़ोड व्हायचंय मला

कॉलेजमध्ये असताना

एक मुलगी मला आवडली
तुम्हाला सांगतो ती इतकी आवडली ना
कि चोहिकडे मला फक्त तिच दिसू लागली..

वेळ वाया जात आहे किती
तिला मनातले सांगेनच ह्याची नाही शाश्वती
पण मनात होती भीती म्हणाली असती
मित्रा, हे तर होतय फारच अति

कॉलेज संपले
नोकरी सुरू झाली
तसा थोडा तिचा विसर पडला
अन अहो भाग्य!! आज ति चक्क समोर आली

आली होती माझ्या कंपनीमध्ये
मुलाखत देण्यास
आणि मि होतो तिथे
तिची मुलाखत घेण्यास

मुलाखत सोडली
आणि गेलो कॉफी प्यायला
विचारले तिला आहेस एकटी
कि आहे कोणी तुझा दादला..?

तिचा बोलका चेहरा सर्व काही सांगून गेला
जणू चातकाचा कौल पावसाने स्विकारला
तो चेहरा माझी ओढ अजुनच वाढवून गेला
आणि माझ्या मनाचा मोर पिसारा फुलवून तिथेच नाचू लागला.

मनाने पुढाकार घेतला
आणि वाणिने त्यास प्रतिसाद दिला
एकदा सांगितले तिला माझ्या मनातले
आणि केले इतक्या वर्षाचे अस्वस्थ मन मोकळे..

ति हलकेच लाजली आणि तिच्या गालावरील खळी
माझ्या अंतर्मनाने ओळखली
ति म्हणाली किती वेळ लावलास तु...?
कॉलेजमध्ये असताना मला पण आवडत होतास तु...

अरे नशिबा कसला हा खेळ खेळलास
युगान युग दुर ठेवून शेवटी आम्हास मिळवलास

तुमचं काही…माझं काही

मी वेगळ्या लहरीत कविता करतो
तुम्ही वेगळ्याच लहरीत कविता वाचता
मी माझे विचार कवितेत भरतो
तुम्ही तुमच्या जिवनाशी संदर्भ शोधता
मी माझ्या स्वार्थासाठी कविता करतो
तुम्ही कवितेला तुमचा अर्थ देता

म्हणूनच म्हणतो की,

मी एकांतात कविता करतो
तुम्ही एकांतातच वाचाव्या
एकांतात वाचता वाचता
वेग-वेगळ्या अंगाने पहाव्या

माझ्या कविता आहेत,
विचारांकडे जाण्याचे विमान….यात बसाल का?
या आहेत,
न संपणारी दलदल….यात फसाल का?

आहेत कविता दुरध्वनिसारख्या,
आवाज ऐकू येतो पण
विचार कळतातच असे नाही
शब्द हलके-जड कळतात
भावनांचा उतार-चढाव कळतोच असे नाही

शेवटी काय….भाषा सोडा,
विचारांकडे तेवढे लक्ष द्या
मला तसे कमीच समजते
तुम्ही मात्र समजून घ्या!

जा जा जा दिले दिले मन तुला

जा जा जा दिले दिले मन तुला
कर त्याचे तू काही..काही… दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही…॥धृ॥

फुल मनाचे खुडून…दिले तुझिया हातात
ठेव ओंजळीत किंवा सोड काळाच्या नदीत
देठ पिकल्या फुलांना..देठ पिकल्या फुलांना…
भय निर्माल्याचे नाही
दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही… ॥१॥

जा जा जा दिले दिले मन तुला
कर त्याचे तू काही..काही… दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही…

तुला द्यावे मन.. असे काही कारण नव्हते…
एवढेच म्हणू आता, तुझ्या नशिबात होते..
पडे त्याच्या हाती दिवा..पडे त्याच्या हाती दिवा..
ज्याला दिसतच नाही
दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही… ॥२॥

जा जा जा दिले दिले मन तुला
कर त्याचे तू काही..काही… दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही…

मनाविण जगताना, वाटे मलाही बरेच
आता दुःख-बिख नाही..वाटे आश्चर्य सखेद
मला एक मन भारी..मला एक मन भारी..
तुला दोन्ही जड नाही..
दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही… ॥३॥

जा जा जा दिले दिले मन तुला
कर त्याचे तू काही..काही… दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही…

- संदिप खरे, आयुष्यावर बोलु काही

जीवन म्हनजे हे असचं असतं

कुनाचं बरोबर कुनाचं चुक
सर्वांना इथे प्रेमाचीच भुक
प्रेमाच्या अडीच शब्दामधुन
उभ्या जन्माचं नातं जुळत असतं
कारन जीवन म्हनजे हे असचं असतं

दु:खाशी नातं येथे जन्मताच जुळते
सु:खाची भेट मात्र क्वचितच घडते
तरिही क्वचितच्या या भेटीसाठी
मनं सतत झुरत बसतं
कारन जीवन म्हनजे हे असचं असतं

अपयशाचे कडु घाव मनं कित्येकदा झेलत असतं
आयुष्यातल्या खाचा-खळग्यात पडुन ते ठेचत असतं
तारि आशेच्या मागे वेडं मनं सतत धावत फ़िरतं
कारन जीवन म्हनजे हे असचं असतं

व्यवहारी या दुणियेत मानसं
मानुसकी विसरुन जगतात
मुखवट्यांच्या गर्दिमधे
भावनांचा लिलाव मांडतात
तरि मायेच्या कनभर ओलाव्यासाठी काळिज तडपत असतं
कारन जीवन म्हनजे हे असचं असतं

दोन तत्वज्ञानी आणि प्रेम……..

इथे एवढंच सांगण्याचा निरपेक्ष प्रयत्न आहे की दोन तत्वज्ञानी लोकांची तत्वंच कशी काय त्यांच्या प्रेमाआड उभी राहतात..आणि मग प्रेमाविन ते संपुन गेल्यावर फ़क्त तत्वंच शिल्लक राहतात……….

दोन तत्वज्ञानी आणि प्रेम……..

अतोड तटबंदी भेदुन,
एका झुळुकेचं येणं झालं
वाडा चिरेबंदी पाहुन
सर्वत्र फ़िरण्याचं मन झालं,

गावासाठी तो होता
एक महाल आलिशान
पण आतुन फक्त तो होता
एक खंगलेलं रान

एक कस्तुरकुपी तिथली
हळुच तिने लकटली
सुगंधात मुग्ध न्हाली
वाड्यात इतरत्र फ़िरु लागली

वाडाही आता बहरुन
आनंदविभोर झाला होता
काळाच्या झोपेतुन उठुन
नंदकिशोर बागडला होता

तटबंदीने आजपर्यंत
बरीच प्रलयं रोख़ली होती
पण आज एका लहरीपुढे
ती नतमस्तक झाली होती

झुळुक विचार करु लागली
वाड्याला वेडा ठरवु लागली
स्वत:च्या भानात हरवु लागली
त्याला स्वाभिमान नाही हिणवु लागली

माहीत नव्हते बिचारीला
वाड्यानं काय काय झेललं होतं
सगळ्यातुन स्वत:ला वाचवुन
कशासाठी असं जपलं होतं

गुमान ती त्याला दुर्लक्षिली
पुढल्या वेळी हळुच दुरुन गेली
तिच्या वागण्याने तटबंदी आनंदली
पण वाड्याच्या आत ख़ळबळ माजली

बाहेरुन आलंच जर वादळ तर
ती तटबंदी उभी होती पण
आत उठलेल्या वादळासाठी
मात्र काही काहीच नव्हतं

झुळुकेविन ‘ख़ंगला वाडा’
आता पुर्णच मोडला होता
गर्वापायी त्या झुळुकेनं मात्र
एक नवा पायंडा पाडला होता…

कारण आता वाडा तिच्यापायी
झुरण्यासाठी उरलाच नव्हता
उरली होती ती फ़क्त
फ़क्त ती ख़ुश तटबंदी………………

चार ओळीतलं दुःख

आठवण
आज पुन्हा तुझी आठवण आली
आणि मी उगीच हसू लागलो
खोटं खोटं हसताना
कळलेच नाही कधी रडू लागलो

अश्रूंचा झरा
मी प्रयत्न करतो स्वतःला
कशात तरी रमविण्याचा
ओघळणार्या अश्रूंचा झरा
काही काळ तरी थंबविण्याचा

अशक्य
तुला विसरणं खरंच
आता अशक्य आहे
माझा भूत, वर्तमान आणि भविष्यकाळ ही
तुझ्याच आठवणिने भरला आहे

ओळी
माझ्या ओळीच सांगतील तुला
मी किती असह्य जगतोय
तुझ्या शिवाय जगताना
क्षणो क्षणी मरतोय

दूरावा
आता नाही सहन होत हा दूरावा
एकदा तरी परत ये
एकदाच परत येवून
कायमचं जवळ घे

राहून गेलं
तुझ्या मिठीतील सुखं
पचवायचं राहून गेलं
तू कायम मिठीत रहा
हे सुचवायचं राहून गेलं

दुःख
फ़ुलण्या आधीच खुडल्यावर
कळ्यांना ही दुःख होतं
स्वप्न अर्धचं राहिले की
आपल्याला ही ते कळतं

भिंती
माणसांपेक्षा मला
घराच्या भिंतीच जवळच्या वाटतात
मी काही ही बोललो तरी
त्या शांतपणे ऐकून घेतात

दरी
माणसं नेहमी उंचावर जाण्याचा
प्रयत्न करीत असतात
उंचावर जाताना मात्र
खोळ दरी ही निर्माण करतात

तसे तुम्ही सगळे माझेच म्हणा !

तसे तुम्ही सगळे माझेच म्हणा !
पण तरीही..

कधी कधी तुमची माया
इतकी आक्रमक होते..
की माझ्यावर चोहोबाजूंनी
चालून येते.

माझे विकार, विचार, भावना -
माझे सारे मौन..
प्रत्येकाचं स्पष्टीकरण मागते !

माझ्या क्षणांवर, कणांवर -
अनियंत्रीत स्वामीत्व गाजवते !

अशा वेळी नाइलाजाने
मी मला माझ्यात कोंडून घेतो !

तसे तुम्ही सगळे माझेच म्हणा…
पण तरीही….

हे राष्ट्र आहे फक्त त्या भारतीयांचे....

उचलूनी देह ताठ नयनांतून आग ज्यांनी ओकली
क्रौर्यतेच्या राक्षसांची मान पराक्रमाने छाटली
फळ आज उपभोगतो ज्यांच्या शर्थ प्रयत्नांचे
हे राष्ट्र आहे फक्त त्या भारतीयांचे.

स्वप्नभरारी ज्यांनी वास्तवात आहे घेतली
क्षणोक्षणी मोहमाया देशासाठी लाथाडली
सुख इतरांना देण्या दुःख जे स्वतः विसरले
माणूसकी जपण्यास ज्यांनी आयुष्य सारे वेचले
व्हावे नतमस्तक फक्त नाव घेता ज्यांचे
हे राष्ट्र आहे फक्त त्या भारतीयांचे.

कोण मी, जन्मलो का हे स्वतःस ज्यांनी विचारले
नुसतेच नाही पूर्वजांच्या पुतळ्यांस सलाम ठोकले
विचार ज्यांचे अस्त्र अन व्यक्त होण्या धमक आहे
यौवनाचा रंग ज्यांच्या रक्त जैसा लाल आहे
जाणूनी पुरुषार्थ जाणीवेने पेटले ऊर ज्यांचे
हे राष्ट्र आहे फक्त त्या भारतीयांचे.

निरक्षरता भ्रष्ट आचार अन जातीपातीची घाण
जाणूनी मूल्ये ज्यांनी फडकवले बंडाचे निशाण
शिकवण्या दुसऱ्यास आधी ज्यांनी स्वतः नियम पाळले
वादळाचे घर ज्यांनी स्वतःत आहे बांधले
मुक्त होण्याचे स्वप्न पाहण्या नयन आहेत समर्थ ज्यांचे
हे राष्ट्र आहे फक्त त्या भारतीयांचे….!

अशी असते ती मैत्री…

मैफ़लीत रंगून जाते ती गायत्री
जीवनात विलीन होऊन जाते ती मैत्री

मैत्री हा असा एक धागा,
जो रक्ताची नातीच काय
पण परक्यालाही खेचून आणतो
आपल्याही मनाला जवळचा करून ठेवतो
आपल्या सुख-दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो.

मैत्री करण्यासाठी नसावं
लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो
फ़क्त मैत्रीचा आदर

काहीजण मैत्री कशी करतात?
उबेसाठी शेकोटी पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात.
स्वार्थासाठी मैत्री करतात अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?
दोन्हीपण एकच जाणवतात.

मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?

कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ मैत्रीची जात

या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळला
मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर कळला

आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं
जीवनाला खरा अर्थ समजावणारं
अशी असते ती मैत्री
ठेवा या लक्षात या गोष्टी
माझ्याशी सुद्धा कराल ना तुम्ही गट्टी??

असे कुणाशी नकळत नाते जुळून जाते

असे कुणाशी नकळत
………नाते जुळून जाते

चिंब होऊन ओली माती
…….. पाऊस गाणे गाते

गुंता मनमनांचा की
……..ईश्वर-साक्ष रेशीमगाठी

स्वप्नासाठी दिव्याचा
……….प्रकाश होऊन जळते वाती

गंध असा हा
……….काट्याचेही होऊन जावे फ़ूल

नात्यांसाठी जगताना
……स्वतःलाच पडावी स्वत:ची भूल

मला तुझी आणी फ़क्त तुझीच आठवण येते

मी चालत आसताना पाय अचानक थांबतात
कुठुन तरि ओळखीचे शब्द काणी पडतात
ह्र्दयाचे ठोके ही हळुहळु वाढतात
मन आणी ङोळे दोघं ही मागं वळुन पहातात
त्या आशेच्या नजरेने मागं वळुन पहाताना
मला तुझी आणी फ़क्त तुझीच आठवण येते

त्या दीवशी मी जरा जास्तच घाईत होतो
गदी असताना ही ट्रेन मध्ये शीरलो होतो
अचानक कुणीतरी ओळखीचं वाटलं
तोच तो चेहरा पाहील्या सारखं भासलं
उशीर झाला तरी चुकीच्या स्टेशनवर उतरताना
मला तुझी आणी फ़क्त तुझीच आठवण येते

नको असतानाही मीत्र फ़ीरायला घेवुन जातो
एकांत हवा असतो पण मैत्री पुढे ईलाज नसतो
वीसरता यावं तुला म्हणुन मी हि त्या गदीत शीरतो
शोधतो त्या मानसांत एखादा ओळ्खीचा चेहरा
त्या लाखोंच्या गदीत ही मी एकटाच फ़ीरताना
मला तुझी आणी फ़क्त तुझीच आठवण येते

दीवसा उजेडात स्वतःला सावरताना
सायंकाळी सुर्य अस्ताला जाताना
रोज रात्री जागरन करताना
पांघरुन घेवुन अश्रु ढाळताना
जेव्हा मी स्वतःलाच जळताना पाहतो
तेव्हा ही मला तुझी आणी फ़क्त तुझीच आठवण येते.

फक्त तू नकोस मला...

फक्त तू नकोस मला
साथही तुझी हवी आहे
शांत
स्थळी एकांतवेळी
प्रीत तुझी हवी आहे

शृंगार प्रेम नको मला
वात्सल्य
प्रेम हव आहे
सांजवेळी सूर्यास्ताला
प्रेमगीत हव आहे

दवबिंदू
नकोत मला
रिमझिम पाऊस हवा आहे
रानफुलाला सुखावणारा
गार वारा हवा
आहे

फक्त शब्द नकोत मला
अर्थ त्यातला हवा आहे
तिमिरातून
तेजाकडचा
मार्ग त्यातून हवा आहे

सृष्टी सारी नको मला
द्रुष्टी
तुझी हवी आहे
तुझ्या डोळ्यात दिसणारा
विश्वास मला हवा आहे

तुझा
दुरावा नको मला
सहवास तुझा हवा आहे
खचनाऱ्या माझ्या मनाला
आधार
तुझा हवा आहे

क्षण तुझे नकोत मला
प्रत्येक क्षणी तू हवी आहेस
वेळ
तुझी नको मला
वेळीस तू हवी आहेस

काळजातुन धबधबा घोंघावतो दिनरात आहे

झिंगलेल्या यात्रिकाला वादळाची साथ आहे
शोधला नाही कधी कोठे नदीचा काठ आहे

शीड फ़ुगलेले असे भरदार छाती फ़त्तरी
दोरखंडासारखा पिळदार तोही ताठ आहे

येऊ दे ज्वालामुखी लाव्हा किती अंगावरी
मार्ग त्याने आखलेलाही ‘तसा’ भन्नाट आहे

आडवा येईल जो होईल पुरता आडवा
हीच त्याच्या पौरुषाने बांधली खुणगाठ आहे

मागतो तुमच्याकडॆ त्याची विनंती खास ही
पिंगळावेळेस सांगा ‘माझीही तुज साथ आहे’

झेप घे गरुडा तुझा तू वाढ्वी रे हौसला
जो कुणी ना जिंकला चढणार तू तो घाट आहे

नाम गुम जाये तो जाये काय पर्वा काळजी
काळजातुन धबधबा घोंघावतो दिनरात आहे

तूच सांग, मी काय कारण देऊ??

सांगून गेलास निघुन दूर देशी तू,
येईन मी परत नको तू खंतावू
झाली कित्येक वर्ष त्याला,
थकले मी,किती रे वाट पाहू?
जग मला विचारतंय नाना प्रश्न
मी काय उत्तर देऊ?

जेवताना रोजच लागतो ठसका,
साऱ्या आप्तेष्टांची नावं घेऊन संपली,
रोज नवीन नाव कुणाचं घेऊ?
आठव तुझा रोज, दाटून कंठ येतो,
मग नाहीच येत अश्रू आवरता मज
कितीदा डोळ्यात कुसळ नाही तर
कांदा लागल्याचं कारण देऊ?

असते आजकाल दर आठवड्याला वधू परिक्षा
मिसळंत आसवाचं खारट पाणी चहा देताना
बिघडते चव,करतात सगळेच मग त्रागा
“आमची होशील का?” प्रश्न भर-सभेत होता
सर्वस्व वाहिलेलं तूला मी काय उत्तर देऊ?

विरह असह्य होतो, प्राण कंठाशी येतो,
निघते सरळ मग कडेलोटाला, फ़िरते
माघारी वचन तुला दिलेलं आठवताना
“काय कुठून आलीस?” होता प्रश्न मला
कारण “निसर्ग पहायला गेले होते” असं देऊ ?

ज्ञानेशाची विरहिणी मी, नाही येत
माझी व्यथा चार ओवींमधे सामावता
लिहिते रोजनिशी गर्भित शब्द येतात मदतीला
विचारलंच स्पष्टिकरण तर कुणाला काय देऊ ?

उरली-सूरली आशाही संपली, जेव्हा तुझ्या करता
तेवत ठेवलेली पणती परवाच्या वादळात विझली
मृत्यूला कवटाळताना शेवटी तुझं की इश्वराचं नाव घेऊ?
भेटशील ना रे तिथे तरी की आसमंती भटकत राहू?

तुझ्या नंतर मी आता दुसरी मुलगी शोधतो आहे

एक वर्षभर माझ्यावर केलेल्या प्रेमाबद्दल
आभार तुझे मानतो आहे
तुझ्या नंतर मी आता
दुसरी मुलगी शोधतो आहे

तु सुद्धा आता
दुसरा कुनी शोधला असशील
रोज रोज त्याला
माझ्यासारखा पिळला असशील

तुला माहीत आहे
प्रेमासाठी किती STRUGGLE करावा लागतो
एका मुलीला पटवायला
किती घाम गाळावा लागतो

तुला लिहीलेल्या प्रेमपत्रांची
आजही आठवन ताजी आहे
पुढचे प्रेम करायला
मला त्यांची गरज आहे

आपल्या प्रेमापायी तुला दिलेले
सर्व GIFT सुद्धा हवे आहे
अर्ध्या किंमतीत सुद्धा त्यांना
विकत घ्यायला मी तयार आहे

तुझ्यावर केलेला सर्व खर्च
आजही माझ्याकडे तयार आहे
CHECK घ्यायचा की CASH घ्यायची
यावर विचार सुरु आहे

अरे हो…
तुझा तर माझ्यावर
कोनताही खर्च नसेल
कारन पर्स नेहमी घरी विसरने
तुझे आजही सुटले नसेल

तुझ्याकडे मी दिलेला
माझा फोटो मला हवा आहे
मुलींना IMPRESS करायला
तोच तर एक दुवा आहे

तुझ्याकडुन मिळालेल्या सर्वच वस्तुंचा
माझ्या पुढच्या प्रेमावर मी वर्षाव करील
तुला जसे PROPOSE केले होते
तसेच मी तिला पन करील

म्हनुन मला माझे
सर्व तु परत कर
मला अजुन एक मुलगी पटवायला
माझ्यासाठी प्रार्थना कर

तुझे प्रेम संपल्यावर
दुसरे प्रेम मी शोधतो आहे
तुझ्या नंतर मी आता
दुसरी मुलगी शोधतो आहे
तुझ्या नंतर मी आता
दुसरी मुलगी शोधतो आहे ……………

दोन थेंब...

दोन थेंब...
पावसाचे दोन थेंब ढगातुन निघाले.वार्याच्या प्रवाहाशी झुंजत, ढगाच्या तुकड्यांना चुकवत, पृथ्वीच्या दिशेने.दोघेही गप्प होते.एकाला रहावल नाही, त्यान संवाद सुरु केला-"आता पृथ्वीवर एकत्र प्रवास करायचाच आहे, बोल ना काहीतरी."
मग दूसरा बोलला,"मी अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करतोय."
"आता काही मैलांचा प्रवास उरलाय, आता अंतर्मुख होउन काय करणार आहेस?"
"आयुष्याच्या शेवटीच तर अंतर्मुख व्हाव लागत.आपला वेग आपल्या हाती नाही, आपली दिशा आपल्या नियंत्रनात नाही आणि

कपाळमोक्ष तर ठरलेलाच आहे!""मग आपल्या हाती काहीच नसताना विचार करुन आणि अंतर्मुख होउन काय करणार आहेस?त्यापेक्षा छान गप्पा मारू आणि वेळ आली, की अनंतात विलीन होउन जाऊ."
"त्याने काय होणार? कपाळमोक्ष टळणार आहे का आपला?"
"अच्छा, म्हणजे तुला काळजी लागुन राहिली आहे ती तुझ अस्तित्व संपून जाण्याची!"
"का?तुला नाही लागुन राहिली आहे काळजी?"
"नाही.आपला ढगात जन्म होतो, त्याच क्षणी अपल भवितव्य ठरलेल असत.ढगाला आपला भार असह्य झाला, की तो आपल्याला सोडून देणार.मग गुरुत्वाकर्षणाच्या ताब्यात जाउन खाली डोक वर शेपुट असा आपला प्रवास सुरु होतो.यात आपण काय करू शकतो?"...
"पृथ्वीवर पाण्याला जीवन म्हणतात आणि जीवनाच्या थेंबाला स्वताचा जीव राखन्याच स्वातंत्र्य नाही,हे अजबच."
"हे बघ, अपाला कपाळमोक्ष होतो म्हणजे काय? तर थेंबाच अस्तित्व संपत.आपला जीव जात नाही,फ़क्त रूप बदलत!"
"मी थेंब आहे आणि पडल्यावर थेंब राहणार नाही, एवढ मला कळत."
"तू पाणी आहेस आणि पाणीच राहणार आहेस,एवढ समजुन घे.तू म्हणजे Hydrogen चे दोन रेणू आणि Oxigen चा एक! तलावातही आणि समुद्रातहि!"

"बरा भेटलास,बोल,काय गप्प मारणार होतास माझ्याशी?"
"अरे,गप्पा मारायला काय हजार विषय आहेत.मी तुला प्रश्न विचारतो, आपण का पडतो?"
"हा काय प्रश्न झाला?""म्हणजे अस बघ, बेडूक घसे फुगवून त्यांच्या प्रेयासिला बोलावतात आणि आपली आराधना करतात म्हणुन आपण पडतो, की एखादी आजी देव पाण्यात बुडवून बसते म्हणुन आपण पडतो..."
"अरे तुला काय खूळ लागल का? आपण पडतो त्याच्याशी यापैकी कशाचाही संबंध नाही.निसर्गचक्र म्हणुन पडतो आपण."
"चूक!"
"हे बघ, आपण पडतो त्याला उगाचच काहीतरी महान अर्थ
चिकटवत पडू नकोस."
"पण, समज आपण स्वताचा असा समज करुन घेतला, की आपण त्या
बेडकांसाठीच पडतो आणि आपल्या वर्षावात भिजुन बेडूक-बेडकी प्रनयात धुंद होतात......मादी अंडी देते.हजारो बेडूक जन्मतात, ते किड्यांना खाऊन पृथ्वी स्वच्छ ठेवतात. त्या बेडकांना खाऊन साप जगतात..."

"बापरे, मी हा असा विचारच केला नव्हता कधी..."
"समज, कुणीतरी पर्जन्यदैन्य होता म्हणुन आपण पडलो.पाउस पडून काही कोणाचा व्यक्तिगत फायदा नाही.मग यांच्यामुळे आपण पडलो, अस समजायला काय हरकत आहे?"
"खरच, काहीच हरकत नाही आणि एखादी प्रेमळ आजी जगासाठी देवाला पाण्यात बुडवून ठेवणार असेल, तर तेवढ्यासाठीच मी पडतो म्हणायला तर मला आनंदच वाटेल!"
"आता कस बोललास? नाही तरी आपण पडणार तर आहोच,मग त्या
पडण्याला असा अर्थ दिला तर पडण्याला आणखी गम्मत नाही का येणार? आता आणखी एक गम्मत.तुला जर choice दिला आणि विचारल, की बोल तुला कुठे पडायचे आहे, तर तू कुठे पडशील?"
"हे काय भलतच?"
"अरे गम्मत! ज़रा विचार तर करुन बघ.कुठेतरी दोन धुंद जीव एकमेकांना लगटून समुद्राकाठी फिरत असतील तर नेमक जाउन तिच्या ओठांवर पड़ाव,भेगाळलेली जमीन तहानेन व्याकुळ होउन आकाशाकडे पाहत असते तिच्या तृप्तीचा पहिला थेम्ब व्हाव,एखाद अवखळ मूल खिडकित बसून तळहात गजातुन बाहेर काढत असेल तर त्याच्या इवल्या हातांवर जाउन विसावाव..
...एखाद नक्षिदार फुल पाखरू पंख पसरून फुलावर बसल असेल तर त्याचे रंग भिजवून टाकावेत...काहीही!" दूसरा थेम्ब ऐकता ऐकता हरखून गेला होता.पहिल्यान बोलन संपवल तेव्हा तो भानावर आला आणि म्हणाला,"अरे

आपले आयुष्य पण एवढे रोमांटिक,छान असू शकत, असा विचारच नव्हता केला मी कधी!"
एक आजोबा हातात पिशवी सांभाळत, वाऱ्याने उलटी होत असलेली

छत्री सावरत कसेबसे चालत होते.पहिला थेंब त्यांच्या छत्रीवर पडला आणि मग घरंगळत जमिनीवर पडला.चाफ्याच डौलदार झाड़ दुधाळ फुल अंगावर लेवून हिरवी वस्त्र नेसून सजल होत.भार सहन न होउन पान वाकल आणि

थेंबन जमिनीवर उडी घेतली.तितक्यात पहिल्यान दुसर्याला मिठीत झेलल.दूसरा म्हणाला,"आता मी वाट बघतोय, वाफ होउन ढगात जाण्याची आणि पुन्हा थेम्ब होउन बरसन्याची.थेम्ब होउन पडण्यात किती मजा असते, ते मला आज कळल!".

काय म्हणता, काळ बदलला?

काय म्हणता, काळ बदलला?
पुर्वीचा काळ सुखाचा
आता नाही कोण कुणाचा
तोच प्रवास, तोच रस्ता
वीट आलाय या जीवनाचा.

मान्य आहे, इंधन महागलंय, प्रदूषण वाढलंय
पण कधी पहाटे लवकर उठून
घनःश्याम सुंदरा ऐकलंय?
ते राहू द्या, सुर्योदयाचं मनोहर रुप
शेवटचं केव्हा पाह्यलंय?

मान्य आहे, तुम्ही खूप धावपळ करता,
एकाच वेळी अनेक ठिकाणी असता
पण पाहिलाय कधी पौर्णिमेचा चंद्र
कोजागिरी वगळता?
तृण मखमालीवर आकाश पांघरुन
मोजल्यात कधी चांदण्य़ा रात्र सरता?

मान्य आहे, पाऊलवाटांचे हमरस्ते झालेत
अन मनाचे कप्पे अरुंद झालेत.
जरी करीत असाल तुम्ही इंटरनेटवर हजारो मित्र
पाठवितही असाल ढिगांनी ई-मेल अन चित्र
पण कुणाला पाठवलंय कधी एखादं
पान्नास पैशाचं अंतरदेशीय पत्र?
अन लुटलाय का कधी पोस्टमन कडून
शुभेच्छा तार स्विकारल्याचा स्वानंद?

मान्य आहे, जीवनमान बदललंय,
पालटलाय साराच नूर
आम्हालाही पडते आजकाल
डिजे पार्ट्यांची भूल
पण ऐकलाय का हो कधी
रेडियोवर अकराचा बेला के फ़ूल?

मला नाही कळत असं काय झालंय
की ज्यानं आपलं अवघं विश्वच बदललंय

सुर्य नाही बदलला, चंद्रही नाही बदलला
काळ आहे तिथेच आहे तो नाही बदलला
तुमचा आमचा पहाण्याचा नजरीया बदलला.

असंच कधी काळी…

असंच कधी काळी जीवनाचा प्रवास करता करता
थांबलो एका मुग्ध वळणावर क्षणभर विश्रांती करता.

नकळत कानी पडली ती सुरेल संगीत सरीता
उडालेली धांदल तीची खट्याळ वाऱ्याशी झुंजता
पाहीलं तीला मी काहीसं अनावृत्त पदर सावरता
निसर्ग-निर्मात्याची अप्रतीम स्वर्गीय कलाकृती ती
कसं यावं ते आरस्पानी सौंदर्य शब्दात पकडता

नाहीच जाता आलं पूढे मला मग तिला डावलता
वाट संपली, प्रवास थांबला, मुक्काम विसरला,
तिथेच कडेला मी दिवास्वप्न महाल बांधला
श्रावणमासी हर्षमानसी हृदयी वसंत फ़ुलला
चोहीकडे उत्सवक्रिडा आसमंती प्रणय बहरला
नकळे, न रुचे काहींना तो आनंद सोहळा

नतद्रष्टांनी डाव साधला, एके रात्री धरण-बांधच फ़ोडला
स्वप्न-महाल विखुरला, अवघा आसंमत आक्रंदला
हा करुण सोहळा सर्वांनी मग काठावर बसुन पाहिला
जाता येता आजही पडतात शेवाळलेले भग्नावशेष दृष्टीला

माझं दिवास्वप्न आजकाल वापरलं जातंय स्मशानभूमीला
शकून म्हणून माझ्या संवेदनांचा दाहसंस्कार होता शुभारंभाला
कृतज्ञता म्हणून अमर केलंय नाव माझं देऊन प्रवेशद्वाराला
खरं तर,कायमचं जखडून टाकलंय भूता-खेतांच्या सानिध्याला

नाही म्हणायला टांगलेली असतात काही वटवाघळं सोबतीला
कधी काळी, चार लोकही येतात आप्तेष्ट म्हणून नक्राश्रू ढाळायला
मृत्यूला माझा कधीच नकार नव्हता जर तो एकदाच असता

आता मानस आहे तो एका महाप्रलयाचा…..
सदेह अस्थिविसर्जनाचा…सागराची गळाभेट घेण्याचा..
राखेतून फ़िनिक्ससारखं उठण्याचा …गगनाला भिडण्याचा..
आसमंत व्यापण्याचा……त्याच्या इतकं मोठ्ठं होण्याचा….

वेदना अंतरी ची…

केल्या असतील चुका
प्रीतीपण केली.

वेदना अंतरी ची मज
आता साहवत नाही
गुन्हा असा मी काय केला
मज सांगाल काय कोणी?

हळहळती सारे परी
चालत मात्रा कुणाचीही नाही

अश्वत्थाम्याच्या भाळी जखम जशी
मज ही खोलवर जाळीत जाई
बहू म्हणती अमरत्व वरदान असे हे
मज साठी हा उ:शाप ही नाही

साधावयाचे त्यास जे
ते साधलेच नाही

विद्ध करुनी मज
पारधी ही मुक्त नाही
खंत एकच त्याची, स्वत्व परी
माझे त्याच्या काबूत नाही

युध्द असे हे यातूनी
सुटका कुणाचीच नाही

उभा कुरुक्षेत्री परंतू
अर्जुन मी नाही
साधु कसे लक्ष्य
करुनी शिखंडीस सामोरी?

निशब्द असा मी
पाहतो वाट पहाटेची…

विजयी अखेर प्रीतीच होईल
यात शंकाच नाही
परंतू काळ किती जाईल
मज सांगाल काय कोणी?

वेदना अंतरी ची मज
आता साहवत नाही

मैत्रीमधले अश्रू

असते मतलबी, दुनिया ही सारी,
पण आपले, निराळे, असतातही काही,
दैव ज्यांची, सतत परिक्षा पाही,
मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी

जिथे असते श्रद्धा आणि भक्ति,
असे पुजनिय, असतात काही व्यक्ति,
क्षणिक असते, अबोल्याची सक्ति,
मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी

गौण ठरतात मैत्रीपुढे, रक्ताची नाती,
कारन ही असते, सुंदर, निर्मळ नाती,
मनास होत नाही, कधी येथे क्षिती,
मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी

इथे शब्द असतात काही, जे लागतात जिव्हारी,
विसर पडतो यांचा, इथे माणसं आपलीच सारी,
आठवणींन्ने त्यांच्या, मनास येते नवी ऊभारी,
मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी…

तु वजा झालीस तिथे….

भरावी म्हटलं ओंजळ चांदण्यानी
तर वज्र-मुठ तुझी तु घट्ट झाकली
दाखवावं म्हटलं पौर्णिमेचा चंद्र
तु जाऊन पलंगी गाढ निजली
हरवावं म्हटलं तुझ्या नेत्रांत
तु स्वतःलाच न्याहाळत बसली

निरपेक्ष प्रेमाची परिभाषा तुला कधीच नाही कळाली
तु तर जमीनीवर हरवलेलं नाणं शोधण्यात गुतंली
पहायची होती मला तुला खुल्या स्वातंत्र्यात फ़ुललेली
तु तर आजन्म जखडून ठेवण्यातच धन्यता मानली

म्हणायला हाकेचं इवलसं अंतर
मधे ठाकली भली-मोठी दुर्गम दरी
झेप तुझ्या स्वप्नांची कुंपणापर्यंत
मी अवघी आसमंत-पोकळी व्यापली
जिथे तुझी विचारशक्ती क्षितीजाला टेकली
कल्पनाशक्ती माझी तीथे गगनाला भिडली

मला वाटलं तु चाणाक्ष अन व्यवहारी
पण तु तर भलतीच हिशोबी निघाली
स्वप्नही माझी तु कवडीमोलानं विकली
किंचीत कुठली गोष्ट मनाविरुद्ध गेली
भाड्याची बालकं घेऊन फ़िरणाऱ्या बाईसारखं
सहानभुतीचं भांडवल करायलाही नाही विसरली

ज्या क्षणी तु माझ्या मनाची कास सोडली
असं नाही की मी हिम्मत नाही दाखवली
पण तुझ्या पाशवीपणापुढे तीही फ़िकी पडली
कित्येकदा नयनी मेघांनी दाटी-वाटी केली
सरींवर सर पण एकदाच मनसोक्त बरसली

फ़िकिर खेदाची मग यत्किंचीतही नाही बाळगली
तु वजा झाली तिथे जगण्याची सुरुवात झाली
त्वेषानं तु समुळ नायनाटाची भाषा केली
माझ्याकडून सर्जनशील निर्मीतीच झाली
अगदीच कपाळ करंटी नाहीस तू , तुझ्यामुळे
मला माझ्या कवीतेची नायीका तरी लाभली. ———-

पाऊस ...

पाऊस, कालपासून भलताच पेटलाय !
पाऊस ...
ये म्हटल्याने येत नाही ...
जा म्हटल्याने जात नाही ...

पाऊस ...
माझ्याशी असाच तुसड्या सारखा वागतो
मी रेनकोट घरी ठेवला कि
हात धुउन मागे लागतो.

पाऊस ...
मी हजारदा बजावलं तरी
मी नसताना तिला एकटी गाटतो ...
तिच्या छत्रीतून लगट करतो.
काल असाच त्यानं मुक्काम थाटला ...
धूसमुसळेपणान तिला खेटला.

वाटलं आता हिचा तोल जाणार ....
हि गरम होणार ...
हिला ताप येणार.

पण झालं भलतंच ...!
पाऊस ...
जेंव्हा तिच्या उष्ण श्वासाना भेटलाय.
पाऊस, कालपासून भलताच पेटलाय !

मी, दोष कुणाला देणार ...?
चूक माझीहि नसते ... तशीच त्याची हि नाही ... !
आणि ती तर नेहमीप्रमाणे नामानिराळी.

त्याला मी म्हणतो काळोख!!!!

तुम्ही सुर्य नसला की
त्याला म्हणता काळोख

रात्रीवरच्या उजेडाच्या ग्रहणाला
त्याला म्हणता काळोख

चंद्र तार्‍यांवीन असतो तो
त्याला म्हणता काळोख

बंद पापण्यांआड स्वनंउशी देतो
त्याला म्हणता काळोख

कवितेसाठी सर्रास प्रतिमा देतो
त्याला म्हणता काळोख

मग प्रश्न उरतो,

आंधळ्या डोळ्यांमागचा तो
कोणता असतो काळोख??????

निर्विवाद खरा
उजेडाला हरविणारा
उजेडातही जाणवणारा
रविराजाला लाजवणारा

त्याला मी म्हणतो काळोख!!!!

अन आता तुम्ही?????????

आजकाल सारखं असं का होतं?

मन माझं बिलकूल थाऱ्यावर नसतं
आरशात पाहून माझं मलाच हसू येतं

कधी ते इतकं बहूरंगी की जणू
सप्तरंगी इंद्रधनुष्यही त्यापूढे फ़िकं असतं

कधी ते इतकं चंचल की जणू
फ़ुलांवर उडणारं फ़ुलपाखरू असतं

कधी ते इतकं खट्याळं की जणू
नवतरूणीचा सावरणारा पदर असतं

कधी ते इतकं बिलंदर चोर की जणू
केतकीच्या बनी नाचणारा मोर असतं

कधी ते इतकं अधीर की जणू
नवविवाहितेच्या वेणीतलं फ़ूल असतं

कधी ते इतकं हट्टी की जणू
गरोदर मुलीला हवसं चिंच अन बोर असतं

कधी ते इतकं कोमल की जणू
अती-स्निग्ध दुधावरची साय असतं

कधी ते इतकं लोभस की जणू
जमीनीवर रांगणारं गोंडस मुल असतं

कधी ते इतकं वेंधळं की जणू
जत्रेत हरवलेलं शेबडं पोर असतं

कधी ते इतकं अवजड की जणू
दुभत्या गायीच्या गळ्यातलं लोढणं असतं

कधी ते इतकं बधीर की जणू
ओल्या घावावरील लादीचा बर्फ़ं असतं

कधी ते इतकं कठोर की जणू
भल्या भल्यांचा कर्दनकाळ असतं

कधी ते इतकं आशयघन की जणू
अवजड संदर्भ ग्रंथातलं शेवटचं पान असतं

कधी ते इतकं विषण्ण होतं की जणू
गावच्या स्मशानभूमीतलं रिकामं बाकडं असतं

मलाच माहित नाही हे नक्की असं का असतं
तरीच आरशात पाहिलं की माझं मलाच हसू येतं

आजकाल सारखं असं का होतं? ———-

लाख सलाम तुझ्या-माझ्या मैत्रीला...

तुझ्या मैत्रीच्या सानिध्यात
भीती नाही वाटली अंधाराची
अन अंधारात चालताना देखिल
ओढ़ होती प्रकाशाची.......
तुझ्या मैत्रीच्या सानिध्यात
पावलो पावली मिळाला विश्वास
अन मिळाला धीर संकटात .....
तुझी-माझी मैत्री बनली
एक फुलांचा नाजुक वेल
म्हणुन आपल्या मैत्रीचा
आहे अनोखा खेल......
पण तू हाथ धरलास
नि जिव माझा खुलुन आला
माझ्या आयुष्याच्या वृक्षावर
जणू गुलमोहरच खुलुन आला......
तूच शिखवलीस मला
जगण्याची खरी कला
म्हनुनच तुझ्या-माझ्या मैत्री साठी
लाख सलाम तुला.......

मुक्काम….

जाताच पक्षी निघुन दुर देशी
झंजावाती घरटं उन्मळून पडलं
त्यांच्या मुक्कामी मग मिच
भेटायला जायचं ठरवलं !

एकदा मुक्काम ठरल्यावर..
………चालायचं बळ
….वाटेनंच पावलांना दिलं!

येताच मुक्काम जवळी
पाऊल ठणकेनं कण्हू लागलं !

पावलं बिचारी कदाचित
अंगच्या सवयीनं आपोआप
वाट चालतीलही असं वाटलं !

फ़क्त् डोळ्यातल्या पाण्यानं
..समोरचा मुक्काम अंधूक
झाला नाही म्हणजे मिळवलं !

तू परतून येवू नकोस

तू नकळतपणे आलीस माझ्या
हृदयाच्या प्रांगणात चोरपावलानं
अन् समोरुन नाही तर एका
बेसावध क्षणी,तेही मागच्या दारानं

अजाणत्या वयात नाही कळालं
घ्यावा कुणाचा कौल?
बुद्धी नेहमीच सांगत आली
विचार कर खोल
पण हृदय घसरलं की
न कळे गेला मनाचा तोल
नंतर लक्षात आलं की तुला
नसे या कशाचंच मोल

अजुनही स्मरतोय मला
तुझा तो अलवार स्पर्श
अन् त्या मागोमागचं
निष्पाप, निरागस हास्य
कसं विसरू मी तुझं ते
मधुर निर्झर भाष्य
अन् नकळतपणे बाहेर
पडलेलं लाडीक “इश्श्य”

खरं सांगू??, तुझं हे प्रत्येक असणं
मी जपलंय वहीतल्या मोरपिसांसारखं
अगदी तुझं झिडकारणंही झेललंय मी
गुलाबाच्या काट्यासारखं
ते आठवण करुनं देतात मला
जखम अजूनही रक्तरंजीत असल्याचं

जरी तूला जाणवलं असेल
आताश्या, मला संवेदना असल्याचं
तू परतून येवू नकोस सोंग घेऊन
जसं काही झालंच नसल्याचं
खरंच, मला नाही झेपायचं दुःख
आणखी, हेही स्वप्न भंगल्याचं ————-

मराठी मुलगा ...

कंपनीत अनेक मुले असतात
पन जो सर्वात साधा सुधा दिसतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीत अनेक मुले असतात
पन जो सर्वांना सतत मदत करीत असतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीमध्ये मुले पिज़्ज़ा बर्गर खातात
पन जो नेहमी वडा पाव खातांना दिसतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीत मुले सिगरेट पिऊन येतात
पन जो घरुन पुजा करुनच येतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीमध्ये मुले मुलींना प्रोपोज करतात
पन जो आवडत्या मुलीला फ़क्त चोरुनच पहात असतो
तो मराठी मुलगा असतो !!

माझं काय, तुमचं काय..

माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायच !!

तिचं बोलणं; तिचं हसणं;
जवळपास नसूनही जवळ असणं
जीवणीशी खेळ करीत
खोटं रुसणं;
अचानक स्वप्नात दिसणं !!

खट्याळ पावसात चिंब न्हायच !
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायच !!

केसांची बट तिने
हळूच मागे सारली….
डावा हात होता की
उजवा हात होता?

आपण सारखं आठवतो,
प्रत्येक कण मनात साठवतो !

ती रुमाल विसरुन गेली !
विसरुन गेली की ठेवून गेली?
आपण सारंच आठवतो
प्रत्येक क्षण मनात साहवतो !

आठवणींच चांदणं असं झेलून घ्यायचं !
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायच !!

तिची वाट बघत आपण उभे असतो…..
ठरलेली वेळ कधीच टळलेली असते !
येरझाऱ्या घालणं सुद्धा शक्य नसत रस्त्यावर !
सगळयांची नजर असते आपल्यावरच खिळलेली !!

माणासं येतात, माणासं जातात
आपल्याकडे संशयाने रोखून बघतात !

उभे असतो आपण आपले मोजीत श्वास
एक तास ! चक्क अगदी एक तास !!

अशी आपली तपश्चर्या आपलं त्राण तगवते !
अखेर ती उगवते !!

इतकी शांत ! इतकी सहज !
चलबिचल मुळीच नाही !
ठरलेल्या वेळीच
आली होती जशी काही !!

मग तिचा मंजूळ प्रश्न :
“अय्या ! तुम्ही आलात पण?”
आणि आपलं गोड उत्तर:
नुकताच ग ! तुझ्या आधी काही क्षण !

काळावर मात अशी !
तिच्यासोबत भुलत जायच !
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायच !!

एकच वचन कितीदा देतो आपण !
एकच शपथ कितीदा घेतो आपण !
तरी सुद्धा आपले शब्द
प्रत्येक वेळी नवे असतात !
पुन्हा पुन्हा हवे असतात !!

साधंसुधं बोलताना
ती उगीच लाजू लागते,
फ़ुलांची नाजूक गत,
मनात आपल्या वाजु लागते !!

उत्सुक उत्सुक सरींनी
आभाळ मनावर भरुन जातं ;
भिजलेल्या मातीसारखं
आपलं असणं सुगंधाने भरुन जातं

भरलेल्या ढगासारखं
मनाचं भरलेपण उधळून द्यायचं !
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायच !!

प्रेम म्हणजे नक्की काय असतं ?

प्रेम म्हणजे नक्की काय असतं?
तुझ्या-माझ्या मनातल्या
प्रत्येक निरुत्तरित प्रश्नाच उत्तर असतं!
आपल्या प्रत्येक सुखदुःखात
आपला आधार असतं ,
का …
परस्परांवरच्या विश्वासानं
द्रुढ होत जाणारं नातं असतं?

प्रेम म्हणजे नक्की काय असतं ?
एक्मेकांच्या आठवणीत वाहीलेला
एक छोटासा आसवं असतं?
की…
आयु्ष्यभर एक्मेकांच्या सोबतीनं जगण्याचं
दिलेलं एक वचन असतं?

हे सगळं म्हणजे प्रेम असतच
पण ते एव्हढच नसतं,
ते असतं एक पुर्ण सत्य
आपल्या जीवनाला-जगण्याला अर्थ देणारं!!

डॉक्टर म्हणतायत, मला कॅन्सर झालाय….

डॉक्टर म्हणतायत, मला कॅन्सर झालाय…
जगण्यासाठी माझ्याकडे, फार कमी वेळ उरलाय…
डॉक्टर म्हणतायत, मला कॅन्सर झालाय….

कट्ट्यावर मित्रांसोबत सिगरेट पिताना,
हे असं होऊ शकेल, असं वाटलं नव्हतं;
मरणाचं भय कधी, माझ्या मनात दाटलं नव्हतं;
आता मात्र माझ्या ह्रदयाचा, अगदी थरकाप झालाय…
डॉक्टर म्हणतायत, मला कॅन्सर झालाय….

हॉस्टेलच्या गच्चीवर नेहमीच, आमची मैफल जमायची;
आनंद-दुःख साजरं करण्यासाठी, अलगद मदिरा प्राशन व्हायची;
दारुच्या जागी आज हाती, मृत्युचा प्याला आलाय…
डॉक्टर म्हणतायत, मला कॅन्सर झालाय….

जगण्याच्या मजेसाठी, मरणाचं भांडवल मी घेतलं;
स्वातंत्र्याच्या नावाखाली, मृत्युलाच जोपासलं;
आज पहिल्यांदाच मी, अंत एवढ्या जवळून पाहीलाय…
डॉक्टर म्हणतायत, मला कॅन्सर झालाय….
जगण्यासाठी माझ्याकडे, फार कमी वेळ उरलाय…
डॉक्टर म्हणतायत, मला कॅन्सर झालाय….

नेहमीच कसं हसवायचं…??

तूच सांग देवा असं किती दिवस चालायचं…
जोकर बनुन सर्वांना नेहमीच कसं हसवायचं…??

समोरचा तो हसला………… ….नव्हे!
हसवण्यावर माझ्या फसला!!
त्याच्या समोर रडलोच् तर…
हसवणाराच् मी कसला…

माणसांच्या या गर्दीमध्ये स्वतःला मात्र विसरायचं…
दू:ख दाबून ओठांमध्ये , त्यांतच हसून दाखवायचं
पण …. श्वास जड होतो जेव्हा—…तेव्हा रे काय करायचं???
जोकर बनुन सर्वांना नेहमीच कसं हसवायचं…!!!

मी रडू लागलो जेव्हा …
ते मात्र हसत होते…
कारण, माझ्या रडण्यामधले
व्यंगच त्यांना दिसत होते…

मनातलं सर्व मनातच ठेवून, हसून मग मी दाखवायचं,..
शिषीरा नंतर येतो वसंत…….स्वप्नंच् फक्त पहायचं
पण; ……..ह्रूदयातच ढग दाटून येतो….तेव्हा रे काय करायचं….???
जोकर बनुन सर्वांना नेहमीच कसं हसवायचं…!!!

म्हणी...

. एक ना code, भाराभर bugs
· code चांगला वाटला, म्हणून copy-paste करू नये
· मरावे परी bugs रूपी उरावे
· आपलाच code आणि आपलेच bugs
· आपला तो program, दुसऱ्याचं ते copy-paste
· इकडे code तिकडे release
· project आला होता, पण deadline आली नव्हती
· Engineer ची खोड lay-off शिवाय जात नाही
· अतीशहाणा त्याचा code रिकामा
· Developer मागतो ’A’ rating, Manager देतो ’D’
· code कळला तरी bugs मिळत नाहीत
· bonus नको पण workload आवर
· स्वतः coding केल्याशिवाय output दिसत नाही
· दुसऱ्याच्या कोडातल्या warnings दिसतात, पण स्वतःच्या कोडातले errors दिसत नाहीत
· दिसतं तस नसतं म्हणूनच client फसतं

ओळखा पाहू...

मध्यरात्री दारावर टकटक
दार उघडलं
पडून-पडून जख्मी झालेला पाऊस
सरळ आत आला
'ती' कुठाय म्हणाला…
मी म्हटलं 'नाहीय'… 'ती नाहीय'
'म्हणजे?'
'म्हणजे ती आली नाही कधीच इथे'
'पण ती म्हणाली होती मला
इथेच भेटीन म्हणून… एनी वे! असं कर…
माझे ढग घे
वेशांतर कर
बरसून ये ती असेल तीथे… मी थकलोय…'
मग मी बाहेर पडलो
रात्रभर बरसबरस बरसलो कुठेकुठे
सकाळी घरी परतल्यावर पाऊस म्हणाला,
"जा ना साल्या जा…
माझ्याहून तूच चांगला बरसतोस…"
आता…
माझ्या खोलीत
ढगांशिवाय राहणारा 'तो'
आणि असा भणंग बरसत फिरणारा मी…
ओळखा पाहू…
खरा पाऊस कोण?

आज अस वाटलं की ...

आज अस वाटलं की कोणी जिवनात माझ्या डोकाउन गेलं
आज अस वाटलं की कोणी मनात माझ्या पाहून गेलं
माझे डोळे बदं होते त्यावेळी आणि श्वास जणू यांबला होता
मग असं वाटलं की कोणी ह्दयाचे टोके कोणी मोजून गेलं
आज अस वाटलं की कोणी जणू केस माझे कुरवाळून गेलं
आज अस वाटलं की कोणी जणू पदराने मला झाकून गेलं
मला आटवतयं उश्याकडे कागंद होती आणि हातात पेन होता
आज अस वाटलं की मानेखाली मग उशी कोणी सरकवुन गेलं
आज अस वाटलं की कोणी जणू दु:ख माझं जाणून गेलं
आज अस वाटलं की कोणी जणू डोळे माझे पुसून गेलं
हो ती नक्कीच माझी माय होती माझी आई आणी कोणी नाही
मग पदराने डोळो पुसले कोणी आणि देवापुटे हात कोणी जोडून गेलं.

लोक माझ्याशी असं का वागतात?

दाखवायला सभेत माझा चेहरा
मनात हिंस्त्र श्वापदं पाळतात
मी चार माणसांत गेलो तर
मलाच भोंदू तोतया ठरवतात

सदरा माझा घालून आपली
ओंगळ चारित्र्य लपवतात
मी घालून फ़िरलो तर घातला
कुणाचा म्हणून हिणवतात
लोक माझ्याशी असं का वागतात?

मेजवानीला प्राणीपक्षी मला
हल-हलाल करायला लावतात
येथेच्छ ताव मारुन संपला की
पाशवी हत्यारा मलाच ठरवतात

दु:ख माझं जड वजनदार म्हणून
बाजारात चढ्या भावाला विकतात
बायकीपणाचं लक्षण म्हणून मग
मला मनसोक्त रडणंही नाकारतात
लोक माझ्याशी असं का वागतात?

एखाद्या निरव भयाण रात्री मग
अवघ्या उशांची अभ्रे भिजतात
माझ्या साऱ्या आशाआकांक्षा
मग तिथेच ऊशाला कुजतात
श्रांत झालेली गलीत शरीर-गात्रं
गाढ निद्रेच्या अधीन होतात

अती-उद्दीप्त तरल जाणिवा मात्र
रात्रभर मन समुळ पोखरतात
सकाळपर्यंत कणखर मनाची
मोठ्ठी वारुळं झालेली असतात
बाहेरुन मोहक दिसली तरी
आतुन पुर्ण पोकळ असतात
लोक माझ्याशी असं का वागतात?

अशात अगोदर मुंग्या नंतर
महाभुजंग रहायला येतात
चिमुकल्या दाहस्पर्शांचे मग
अतीजहरीले सर्पदंश होतात

लख्ख प्रज्वलित संवेदनाच्या
ठिणग्या मग दिवसरात्र उडतात
पाचोळा मनं त्यांची आग लावली
म्हणून मग मलाच वेठीला धरतात
करायला गेलो आत्महत्या तर गुन्हा
ठरवून मरणालाही लाचार करतात

लोक माझ्याशी असं का वागतात? —–

तु गुंतलीस किनार्‍यावर……………….

तु गुंतलीस किनार्‍यावर,
या नजरेच्या जाळ्यांत,
मी खोल बुडालो,
प्रेमाच्या या महासागरात,

येणार्‍या प्रत्येक आहोटीबरोबर,
तुला घट्ट पकडुन बसण्याचा हा अट्टहास,
तर उठणार्‍या दर भरतीसमवेत,
तुला मिठीत सामावन्याचा केलेला अनाहत प्रयास,

या चक्ररुपी वादळाबरोबर,
तुझ्यापासुन दुरावण्याची ही अघोरी भीती,
याच वेळी या गतीमान भोवर्‍यामध्ये,
स्वतःचे आत्मभान हरवण्याची ही स्थिती,

कधी असतेस तु सीमारेषा,
दोघांच्यामधील नातं संपवुन टाकणारी,
तर असतेस कधी तु जिवनरेषा,
आपलं नविन जग सुरु करणारी,

तुझी वाट पाहणारा,
मी निरंतर एक खलाशी,
तु आहेस एक किनारा,
तुला शोधणारा मी दिशाहीन एक प्रवासी………..

तु गुंतलीस किनार्‍यावर,
या नजरेच्या जाळ्यांत,
मी खोल बुडालो,
प्रेमाच्या या महासागरात,

म्हणून ते आंनंदाश्रू…..

प्रसववेदनांनंतर जन्म देते
………………म्हणून ती आई

रोज रात्रीनंतर येते
………………म्हणून ती सकाळ

बिकट वळणावळणांची असते
………………..म्हणून ती वाट

अतीदूर क्षितीजापाशी टेकते
………………..म्हणून ते आकाश

प्रत्येक क्षणोक्षणी रंग बदलते
…………………म्हणून ते जीवन

निखळ अश्रूंशी नाते जोडते
………………..म्हणून ते खरं प्रेम

भाबडं प्रेम व्यक्त करतात
…………….म्हणून ते आंनंदाश्रू ——–

नजरेला नजर मिळते जेंव्हा

नजरेला नजर मिळते जेंव्हा
प्रेमाला नवे घर मिळते तेंव्हा
ह्दयाच्या गोष्टी नजरेनेच होतात
प्रेमचे प्रेत्येक घोट ते नजरेनेच पितात
आसाच सुरु होतो प्रेमाचा प्रवास
सतत हवा असतो तिचाच सहवास
मग खेळतो नशिब आपली खेळी
ती दूर करतो त्यांची जोडी
दोन जीव दुर होतात मिलनाच्या क्षणात
पण विरह खुप असतो नशिबाच्या मनात
दोघे भेटतात न बिछ्डण्याच्या प्रणात
ते घर बाधंतात प्रेमाच्या गावात
एक जन्म ही कमी अस्तो,
प्रेम समजून घ्यायला
एक क्षण खुप अस्तो
नजरे मिळायला
आजही आहे मी पहिल्या नजरेच्या शोधत
मला पण घर बाधांच्य आहे
प्रेमाच्या गावात

खरं सांगू, मला आवडतं!!!!

तुझं असणं,
तुझं हसणं,
खरं सांगू, मला आवडतं!!

पावलात अडखळणं,
दगडाला लागलं म्हणुन अश्रु गाळणं,
खरं सांगू, मला आवडतं!!

निरर्थक बडबड करणं,
चांभारालाही मग ‘काका’ म्हणणं,
खरं सांगू, मला आवडतं!!

एकांती किनारी बसणं,
स्वप्नांच्या होड्या करणं,
खरं सांगू, मला आवडतं!!

फुलपाखरांशी गप्पा मारणं,
त्यांना आपल्यातीलच समजणं,
खरं सांगू, मला आवडतं!!

तुझं लटकं रागावणं,
चिडले आहे भासवणं,
खरं सांगू, मला आवडतं!!

हिशोबात हरवणं,
बोटांवर बेरीज करणं,
खरं सांगू, मला आवडतं!!

अंधाराला घाबरणं,
चंद्राला पापण्यांत लपवणं,
खरं सांगू, मला आवडतं!!

सिनेमात सगळं विसरणं,
माझ्या खांद्याला रुमाल समजणं,
खरं सांगू, मला आवडतं!!

तुझ्यासमोर मनाचा आरसा होणं,
शब्दांचा भार हलका होणं,
खरं सांगू, मला आवडतं!!

आता तुझं नसणं,
मग अश्रुंना गोंजारणं,
खरं सांगू, मला जड ज़ातंय!!!!

मन उधाण वा-याचे

मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते,
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते
मन उधाण वा-याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान, कसे गहिवरते !

आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते,
हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते
सावरते, बावरते, घडते, अडखळते का पडते ?
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते
मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते
अन्‌ क्षणात फिरुनी आभाळाला भिडते !
मन उधाण वा-याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान, कसे गहिवरते !

रुणझुणते, गुणगुणते, कधी गुंतते, हरवते,
कधी गहि-या डोळ्यांच्या डोहात पार बुडते
तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते ?
कधी मोहच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते !
जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते ?
भाबडे तरी भासांच्या मागून पळते !
मन उधाण वा-याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान, कसे गहिवरते !

गीत - गुरु ठाकूर
संगीत - अजय-अतुल
स्वर - शंकर महादेवन
चित्रपट - अगं बाई …. अरेच्चा ! (२००४)

कधी पाह्यलंय तूला मी….

कधी पाह्यलंय तूला मी,आभाळाएवढं मोठ्ठं होताना
तर कधी निराशेच्या गर्तेत सागरतळाशी जाताना

कधी पाह्यलंय तूला मी,वर्षा-मेघासारखं गरजताना
तर कधी लयबध्द श्रावण-सरींसारखं बरसताना

कधी पाह्यलंय तूला मी, प्रेम करुणेचा सागर होताना
तर कधी तिरस्कारानं प्रलयासारखं बेभान होताना.

कधी पाह्यलंय तूला मी, हर्षाचा अम्रृत घट भरताना
तर कधी अतीव वेदनेचा विष-प्याला रिचवताना

पाह्यलंय तूला मी, अशा कित्येक ऋतू-रुपांत
उन्हा-पावसात, अन इंद्रधनुष्याच्या रंगछटांत

पण तरीही अनोळखी वाटतेस तू मला
जसं काही, प्रथमच पहातोय मी तूला. —–

दगडांना मी फ़ुलं समजतो

दगडांना मी फ़ुलं समजतो
परी मी कवि नाही जनांनो
मी एक वेडा दगड मारणांरा
फ़ुलं समझून दगड मारतो.

मृगजळांनी मी भुमी भिजवतो
अख्खं आभाळ डोळ्यात साठवतो
पसरवुन जाळे पाणवट्यावर मी
चद्रंबिबं माझ्या जाळ्यात पकडतो.

स्वप्नांत पिऊन अमृत अमर होतो
मी चद्रांलाही कधी काजवा समजतो
मला ना पारख ना जाण चागंल्याची
समजुन कल्पवृक्ष बाभळीस कवटाळतो.

दोन शब्दांसाठी सारं विश्व धुडांळतो
नाहीच मिळाले तर अक्षंर गुडांळतो
मी कुठे शब्दांचा सौदागर सा-यापरी
सौदागरापुढे शब्दांचा सौदा मदांवतो.

आज मला कोण इथे ओळखतो
कोंण मला या शब्दांत इथे शोधतो
मी तर एक शब्द खूळा खुळ्यातला
माझा शब्दही मला खुळाच ठरवतो

अचानक बरसणाऱ्या पावसाचं…

अचानक बरसणाऱ्या पावसाचं
देखील स्वागतच असतं.
अणू-रेणू सुखावणाऱ्या अमृताचं
कौतूक धरतीला उमगतं.

हातचं राखून ठेवणाऱ्याला
काहीच मिळत नसतं.
तोलून मापून चालणाऱ्या
सुख हुलकावण्या देत रहातं.

खऱ्या प्रेमात काही द्यायचंही नसतं
काही घ्यायचं ही नसतं.
क्षणभर मिठीत विसावायचं असतं
क्षणभर सत्य विसरायचं असतं

मला काय त्याचे?

पेट्रोल महागणार …
माझ्याकडे गाडीच नाही .. मला काय त्याचे?

ओ.बी.सी. कोटा वाढणार …
माझे शिक्षण झाले … मला काय त्याचे?

जेसिका लालचा खुनी निर्दोष सुटला …
जेसिका माझी कोणीच नव्हती … मला काय त्याचे?

शेअर बाजार पडला …
मी कुठे पैसे गुंतवले होते … मला काय त्याचे?

हिंदू देवतांची विटंबना होतेय …
मी धर्मांध नाही … मला काय त्याचे?

२१ काश्मिरी पंडीतांची गोळ्या घालुन हत्या …
मी काश्मीरी नाही … मला काय त्याचे?

शेतक-यांच्या पिकाला योग्य भाव येत नाही …
मी तर नोकरदार आहे … मला काय त्याचे?

सरकार भारताला विनाशाकडे घेऊन जातेय …
आपल व्यवस्थीत चाललय ना … मला काय त्याचे?

आई, शेजारच्या बाई "चोर चोर" ओरडताहेत …
शु.. आपल्याकडे नाही ना आला चोर? … मला काय त्याचे?

या पिढीने मला काय त्याचे म्हणत हात झटकायचे …
पुढच्या पिढीसाठी निष्क्रीयतेचे बीज रोवायचे …
मग ते विषारी वृक्ष फ़ोफ़ावलेले पहायचे …
आमच्या वेळी "हे असे नव्हते" म्हणत नि:श्वास सोडायचे …

मला काय त्याचे मला काय त्याचे …
म्हणत म्हणत जगायचे …
आणि आपले रोजच …
कुढत कुढत मरायचे …