मैत्री ..

जीवन म्हणजे अलुच्या पानावरील दवबिंदु
टिकला तर मोती नाहीतर माती
तुझ जीवन नेहमी मोती असू दे
आणि हा मोती सदैव आपल्या
आठवनिच्या आणि मैत्रीच्या शिम्प्ल्यात वसु दे.....

रक्ताची नाती जन्माने मिळतात
मानलेली नाती मनाने जुळतात
पण नाती नसतानाही जे बांध जुळतात
त्या बंधाना "मैत्री" म्हणतात

पावसातून जेवढा ओलावा मिळत नाही
तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो
मैत्रिमधल्या सावलीचा अर्थ
कधीतरी उन्हातुन गेल्यावर कळतो

माणुस सर्वश्रेष्ठ प्राणी आहे;
परन्तु तो गवताहून दुर्बल आहे
आपण सारेच भंगलेल्या मूर्तीचे अवशेष आहोत
तरी परस्पर विश्वासाच्या चिवट धाग्यांनी
मैत्रीचे जरतारी वस्त्र विणले आहे
एखादा धागा जरी जरासा उसवला तर
जगण्यातील स्वारस्य निघून जाते....

0 comments: