Showing posts with label लेख. Show all posts
Showing posts with label लेख. Show all posts

माझी निवड चुकली तर नाही ना?

एका सेमिनारमध्ये एका महिलेने प्रश्न केला, "मी जीवनसाथी निवडण्यात चुकले तर नाही ना हे मला कसे काय कळेल?". वक्ते महाशयांनी तिच्याकडे पाहिले. त्यांच्या लक्षात आले की तिच्या शेजारी बसलेले गृहस्थ हे बरेच स्थूल दिसत होते. वक्ते महाशयांनी प्रश्न केला, "तुमच्या शेजारी बसलेले गृहस्थ हेच तुमचे जीवनसाथी आहेत काय?" अत्यंत गंभीरपणे तिने उत्तर दिले," तुम्ही कसे काय ओळखले?" वक्ते महाशय उत्तरले,"तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मला आधी देऊ द्या. कारण त्या प्रश्नामुळे तुम्ही खरोखर खूप अस्वस्थ आहात असे दिसतेय. तुमच्या प्रश्नाचे उत्तर असे आहे.


प्रत्येक नात्याचे एक चक्र (सायकल) असते. सुरूवातीला तुम्ही तुमच्या साथीदाराच्या प्रेमात पडता. तुम्ही त्याच्या फोन्सची वाट पाहता, त्याच्या स्पर्शाची इच्छा धरता, त्याच्या आवडींवर सवयींवर प्रेम करता. प्रेमात पडणे मुळीच कठीण नसते. खरं तर तो एक पूर्णपणे नैसर्गिक आणि उत्स्फूर्त असा अनुभव असतो. प्रेमात पडण्यासाठी तुम्हाला वेगळे असे काही करायचेच नसते. म्हणून तर त्याला प्रेमात 'पडणे' असे म्हणतात. प्रेमात असणारी माणसं त्यांच्या अवस्थेचं वर्णन करताना कधी कधी म्हणतात, "I was swept off my feet" हे जे वर्णन आहे ते जरा दृश्य स्वरूपात बघण्याचा प्रयत्न करून बघा. त्याचा अर्थ असा लागतो की तुम्ही आपले तुमचे तुमचे उभे होता, काहीही न करता आणि अचानक तुमच्या बाबतीत काही तरी घडले.

प्रेमात पडणे हा एक उत्स्फूर्त आणि passive असा अनुभव आहे. पण परस्परांसोबत काही महिने अथवा वर्षे काढल्यानंतर प्रेमाची धुंदी ओसरू लागते. प्रत्येक नात्याचे हे असेच नैसर्गिक असे सायकल असते. हळूहळू फोन कॉल्स (अद्यापही येत असतील तर) कंटाळवाणे वाटू लागतात. स्पर्श हवाहवासा वाटेनासा होतो. तुमच्या साथीदाराच्या सवयी-आवडी, ज्या तुम्हाला सुद्धा आवडत असत, आता तुमचे डोके उठवू लागतात. नाते या अवस्थेला पोहोचल्याची लक्षणे प्रत्येक नात्यागणिक वेगवेगळी असतात. तुम्ही जेव्हा प्रेमात पडला त्या वेळेची अवस्था आणि नंतरची किंवा सध्याची ही कंटाळवाणी किंवा संतापजनक अवस्था - या दोन्हीमध्ये जमीन अस्मानाचा फरक असल्याचे तुम्हास जाणवते. या ठिकाणी कदाचित तुमच्या किंवा तुमच्या साथीदाराच्या मनात हा प्रश्न उभा राहतो की माझी निवड चुकली तर नाही ना? तुम्ही अनुभवलेली प्रेमाची धुंदी तुम्हाला जेव्हा जेव्हा आठवते तेव्हा, अन्य कोणाबरोबर का होईना, पण आपल्याला ती नशा पुन्हा एकदा अनुभवायला मिळावी असे तुम्हास वाटू लागते. आणि ह्या वेळी नाती तुटायला लागतात.

नात्यात यशस्वी व्हायचं असेल किंवा ते शाबूत ठेवायचं असेल तर त्याची एकच गुरुकिल्ली आहे. नात्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करणे ही ती गुरुकिल्ली नव्हे. तर जी व्यक्ती तुम्ही निवडलीत तिच्यावर प्रेम करणे ही ती गुरूकिल्ली आहे. The key to succeeding in a relationship is not finding the right person; it's learning to love the person you found.
आपण दु:खात आहोत याला जवाबदार आपला जीवनसाथी आहे असे लोक समजतात आणि वैवाहिक संबंधांच्या बाहेर आनंद शोधायला जातात. विवाहबाह्य संबंध हे सर्व रंगा रुपांत बघायला मिळतात. अनैतिक संबंध हे त्याचे एक सर्वात कॉमन रूप आहे. पण बरेचदा लोक अन्य मार्गांकडेही वळतात.

स्वत:ला कामामध्ये, एखाद्या छंदामध्ये, मित्रांच्या घोळक्यात गुंतवून घेणे, किंवा बेसुमार टीव्ही पाहणं अथवा नशापाणी करणं. पण त्यांच्या समस्येचं उत्तर लग्न संबंधांच्या बाहेर उपलब्धं नसतंच. ते तर घरातच उपलब्ध असतं. तुम्ही दुस-या कुणाच्या प्रेमात पडूच शकत नाही असं मला म्हणायचं नाहिये. पडू शकता आणि त्यामुळे तुम्हाला काही काळाकरिता छान सुद्धा वाटू शकतं. पण काही वर्षानंतर तुम्ही, आज आहात त्याच परिस्थितीमध्ये असाल.
कारण (हे लक्षपूर्वक ऐका) : एखाद्या नात्यामध्ये यशस्वी होण्याची गुरुकिल्ली - जीवनसाथी म्हणून योग्य व्यक्ती निवडणे ही नसून जी व्यक्ती तुम्ही निवडलीत तिच्यावरच प्रेम करायला शिकणे - ही आहे. The key to succeeding in a relationship is not finding the right person; it's learning to love the person you found.

समाजव्यवस्थेचा कणा : आई

खरे म्हणजे आईविषयी इतके लिहीले गेले आहे, कथा, कादंबऱ्या आणि बॉलीवूडने आईला अजरामर केले आहे, त्यामुळे मी आता वे
गळे काय सांगणार असा प्रश्न वाचकाला पडणे साहजिक आहे.

मी वयाची पन्नाशी पार केल्यावर आणि माझ्या आईने ऐशी वर्षे ओलांडल्यावर तसेच अनेक मित्र आणि आजूबाजूच्या अनेक आयांना बघितल्यावर जाणवणारी बाब म्हणजे भारतीय समाजव्यवस्था टिकून आहे ती आई या बळकट वटवृक्षामुळे.

मुळात आईपण ही बाबच खडतर आहे. मुल कितीही मोठे झाले तरी त्याला आईची गरज भासते. किंबहुना माणूस वयाने वाढला की त्याला आईचे महात्म्य अधिक दिसू लागते. तरुणपणाची मस्ती उतरली की आधार आईचाच असतो हे त्याला जाणवू लागते. एका टप्प्यावर मित्र, मैत्रिणींचे स्थान आईपेक्षा वरचे ठरते. त्यांचा सल्ला घेतला जातो. नोकरी वगैरे लागली की आलेल्या आर्थिक स्वातंत्र्यामुळे आईचा सल्ला न घेण्याकडे कल असतो. मग तिने आपल्याला अनेकदा कठीण परिस्थितीतून सावरलेले असते, आपल्याला सांभाळुन घेतलेले असते, अनेक गुन्हे वडीलांपर्यंत न पोहोचवताही आपल्याला कानपिचक्या दिलेल्या असतात, वेळप्रसंगी आपण दोन घास कमी खाऊन आपल्याला काही कमी पडू दिलेले नसते या साऱ्या बाबींचा विसर पडतो.

नंतर लक्षात येते की आईने वेळोवेळी दिलेले सल्ला, सावधानतेचे इशारे, मांडलेली मते ही अधिक दिशादर्शक होती. त्यात आईकडे अनुभवातुन आलेले शहाणपण तर होतेच, पण मायेचा अखंड स्त्रोतही होता. संसार कसा करावा. कोणाला टाळावे आणि कोणाला महत्त्व द्यावे, पैसा कसा वाचवावा अशा अनेक बाबींमध्ये तिचा दृष्टिकोन बराच पुढचा विचार करणारा होता.

आई ही संस्था कुटुंब टिकवण्यात मोलाचा वाटा उचलते. आता आया नोकरी करायला लागल्या, त्या स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात. परंतु, अगदी काही वर्षांपूर्वींपर्यंत आईने घर सांभाळायचे, आल्यागेल्यांचे करायचे, मुलांची काळजी घ्यायची, सणउत्सव साजरे करायचे आणि मुख्य म्हणजे हे सारे घरातल्या र्कत्या पुरूषाने दिलेल्या मर्यादित रकमेत पार पाडायचे. हे करताना अडीअडचणीसाठी बचत करायची, मुलांच्या भविष्याची तरतूद करायची. हे करत अनेक आयांनी आपल्या मुलांना मोठे केले. त्यांचे कर्तृत्व फुलवले. त्या काळात गरिब असणाऱ्यांची संख्या बरीच मोठी होती. त्यामुळे परिस्थितीशी झगडत प्रपंच करणाऱ्या आयाही बऱ्याच होत्या. आता तुलनेने मध्यम वर्ग वाढला आहे परंतु यामुळे आईची जबाबदारी बदलली आहे असे नव्हे. आजही नोकरी करणाऱ्या आईला घर सांभाळावेच लागते. मुलांचा अभ्यास, त्यांचे खाणेपिणे याचा विचार करावा लागतो. नातीगोती सांभाळावी लागतात. आजची आई त्यामुळे लोकलमध्ये भाजी निवडताना दिसते आणि पहाटे उठून डब्यांची तयारी करताना दिसते.

यात आश्चर्याची आणि कौतुकाची बाब अशी की आईची भूमिका पार पाडताना ती आपण काहीच विशेष करत नाही अशा आविर्भावात वावरत असते. अनेकदा यात ती स्वत:च्या आवडीनिवडींकडे, प्रकृतीकडे दुर्लक्ष करत असते. पूर्वीच्या जमान्यात हे अधिक प्रमाणात घडत होते, कारण स्वत:चा विचार करायला तिला सवडच नसायची आणि पैसेही.

आईच्या भूमिकेत असतानाही ती, पत्नी, सुन, भावजय, नणंद अशा अनेक भूमिका सहजतेने पार पाडत असते. हल्ली कुटुंबाचा आकार कमी झाला आहे, माणसे सहजतेने एकमेकाकडे जातयेत नाही. पूर्वी बॅग घेऊन नातेवाईक कधीही यायचा. तो नोकरीसाठी नाहीतर शिक्षणासाठी आलेला असायचा. त्याचा मुक्काम किती दिवस आहे हे माहीत नसायचे. तो नातेवाईकही दूरचा असायचा. पण पाहुणचार करताना आईच्या चेहऱ्यावरचे स्वागताचे भाव कमी होत नसत. आज अर्थातच हे कमी झाले आहे. पण अशी परिस्थिती आली तर तिच्यात आईची माया जागी होईल यात शंका नाही.

सर्वांना जोडणारा दूवा असेच आईचे रूप राहीले आहे. तिच्यामुळे चार भिंती न राहता घर बनले आहे, घरपण राखले गेले आहे. आई म्हटल्यावर हे सारे आठवते. मग ती आई कोणाचीही असो. अशा आईला खरे म्हणजे वर्षाचे ३६५ दिवसही वंदन करायला हवे. निदान मातृदिनी तरी आपल्या आयुष्याला वळण लावणारी म्हणून तिचे पूजन करायला हवे.

लक्षात नसलेला बाप

वडिल बाबा पिता लिह्न्यास बोलन्याश खुप चांगल वाटत पण अपन जानुन बुजुन शब्द उचारतो तो म्हणजे बाप...बाप होय बाप ! त्याच बापाविशायी काही
आई घराच मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व पण खरच या अस्तितवाला कोणी समजुन घेतलय का ? वडीलांना महत्वं असून त्यांच्या विषयी जास्त बोलल जात नाही लिहल जात नाही कोणताही व्यखता आई विषयी जास्त वेळ बोलत बसतो संत महत्म्यानी आईच्च महत्व अधिक सागितले आहे देवाधिकानी आईच कौतुक तोंड भरून केल चांगल्या गोष्ठिना आईची उपमा दिली जाते पण बापा विषयी कुठच कही बोलल जात नाही. लोक बाप रेखाटतात पण तोही तापत, व्यसनी, मारझोड करणारा सामाज्यात एक दोन टक्के बाप असे असतील पण चांगल्या वडीलां विषयी काय?
आईकड़े अस्रुंचे पाट असतात पण बापाकडे सयंमाचे घाट आसतात आई रडून मोकली होते पण सांत्वन वडीलांनाच काराव लगत अणि रडनारा पेक्षा सांत्वन करनारावर जस्ता तान पडतो कारण ज्योति पेक्षा समइच जास्त तापते ना पण श्रेय मात्र ज्योतीलाच मिलते रोजचा जेवण करणारी आई लक्षात राहते पण शिदोरिची सोय करणार बाप आम्ही किती सहज विसरून जातो आई रडते पण बापाला रडता येत नाही स्वतःचा बाप मेला तरी रडता येत नाही कारन भावंडाना जपयचं असत आई गेली तरी रडता येत नाहि कारण बहिनिंचा आधार व्हायच असत पत्नी अर्ध्यावत सोडून गेली तरी अस्रुना आवर घालावा लागतो
जिजाउने शिवाजी घडवला पण शाहजी राज्यांची ओड़ातान लक्षात घ्या देवकीच यशोदेच कौतुक काराव पण पुरातून पोराला डोक्यावर घेउन जाणारा वाशुदेव लक्षात ठेवावा. वडिलांचा टाचा झिजलेल्या चापलानकडे पाहील की त्यांच प्रेम कळत त्यांची फाटकी बनियान पाहिली की आपल्या नशिबाची भोक तांच्या बनियानला दिसतात.
मुलीला कपडे मुलाला कपडे घेतील पण स्वतः मात्र जुनी प्यांट वापरायला काढतिल मुलगा सलून मधे २५ रुपये खर्च करतो मुलगी पारलर मधे ३० एक रुपये खर्च करते पण त्याच घरातील बाप दाढ़ीचा साबन संपला म्हणून अंनघोलीच्या सबनाने दाढ़ी करतो. अनेकदा तो नुसत्या पाण्याने दाढ़ी करतो
बाप अजारी पडला तरी पटकन दवाखान्यात जात नाही तो अजराला मुलीच घाबरत नाही पण डॉक्टर एखादा महिना आराम करायला लावतील याची त्याला भीती वाटते कारन पोराच शिक्षण मुलीच लग्नं घरात उतपनाच साधन दुसर नसत.
ज्या घरात बाप आहे घरात वाइट नजरेने कोणी बघत नाही कारन घरातला करता जिवंत असतो तो जरी काही करीत नसला तरी तो त्या पदावर असतो अणि घराच कर्म बघतो
चटका बसला ठेच लागली फटका बसला की आईग!! हा शब्द बाहेर पडतो पण हायवेवर रस्ता ओलांडताना एखादा ट्रक जवळ येउन अचानक ब्रेक लावतो तेव्हा बापरे!! हाच शब्द बाहेर पडतो कारन लहान संकटांना आई चालते पण मोठी मोठी संकटे पेलताना बापच अटवातो. काय पटतय ना? कोणताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी जास्त जात नाही पण गरीब मुलीच्या घरी उभ्या उभ्या का होइना चक्कर मारतो. तरुण मुलगा उशिरा घरी येतो तेव्हा त्याचा बापचं जागा असतो.
मुलाच्या नोकरी साठी साहेबानपुड़े लाचार होणारा बाप मुलीच्या स्तलासाठी उम्बर्ठे झिझवानारा बाप घरासाठी स्वतःच्या व्यथा दड़पनारा बाप खरच किती ग्रेट असतो ना ? लहानपणी बाप गेल्यावर अनेक जबाबदारया पेलाव्या लागतात त्याना एका एका वस्तुसाठी तरसावं लागत वडिलान्ना समजुन घेते ती त्या घरची मुलगी वडीलाना जानते जपते
इतरांनी सुधा किमान आपल्याला जानवं हेच प्रतेक बापाला वाटत

स्वप्न आणि सत्य

एकदा स्वप्न आणि सत्य यांचे जोरदार भांडण झाले. विषय होता भविष्य घडविण्यात सर्वाधिक सहभाग कोणाचा. दोघे ही खुप भांडले, झगडले पण निर्णय काही होईना. शेवटी या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ते आपल्या मानसपित्याकडे- ब्र्म्हदेवाकडे गेले. ब्र्म्हदेवाने त्यांना सांगितले, "ज्या कोणाचे हात आभाळाला टेकतील आणि तरीही ज्याचे पाय जमिनीवर आसतील, त्याचा भविष्या घडविण्यात निर्णायक सहभाग असतो". दोघेही परत आले. स्वप्नाने आधी प्रयत्न केला. एकच उडीत त्याचे हात आभाळाला टेकले, पण त्याचे पाय जमिनीपसुन केंव्हाच उचलले गेले होते. सत्याने नंतर प्रयत्न केला. त्याचे पाय कायम जमिनीवर होते, पण त्याचे हात आभाळापर्यंत कधीच पोचु शकले नाहीत. दोघांनीही खुप प्रयत्न केले, पण दोघांपैकी कोणीच यशस्वी होउ शकले नाही. थकुन परत एकदा ते ब्रम्हदेवाकडे गेले, आणि या वेळेस ब्रम्हदेवाने त्यांना सांगितले, "भविष्य घडविण्यात सत्य, आणि स्वप्न या दोघांचाही सहभाग तितकाच मोलाचा असअतो. खर्‍या अर्थाने यशस्वी भविष्य घडवायचे असेल, तर स्वप्नाला सत्याच्या खांद्यावर उभे रहयला हवे!."

मराठी भाषेची ताकद खालील २ लेखात पहा

मराठी भाषेची ताकद खालील २ लेखात पहा. प्रत्येक शब्द 'क' आणि 'प' पासून सुरु करुन येवढा मोठा परिच्छेद लिहिला आहे. जगातल्या कोणत्या इतर भाषेत अशी ताकद असेल ?

------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------

केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर
कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत
कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये '
कजरारे-कजरारे' कवितेवर कोळीनृत्य केले.
काकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कळवळले. काकांनीही कमालच केली. काकांनी काकूंचे काळे
कुळकुळीत केस कात्रीने कराकरा कापले. काका काय करताहेत काकूंना कळेनाच! काकूंनी कर्कश्श
किंचाळून कलकलाट केला.
काका काकूंची कसली काळजी करणार! काकांना कामाची काळजी. काकूंच्या कर्णकर्कश्श
कोलाहलातही, केशवाने कचऱ्यात कोंबलेले कागदाचे कपटेन कपटे काढून काकांनी कचेरीकडे कूच केले.
कचेरीच्या कामासाठी काकांनी कंबर कसली. कागदाच्या कापलेल्या कपट्यांचे काकांनी 'कोलाज'
करून कामकाज कार्यान्वयित केले. केशवाचे कारनामे कळताच काकांनी काट्यानेच काटा काढला.
काकांनी केशवालाच कोलाजचे काम करण्यासाठी कुथवला. कपटी केशवने काकांवरच कामचुकारपणाचा
कांगावा करून कामाचा कंटाळा केला. काकांनी कठोरपणे केशवाला कामावरून काढले.
कासावीस काकूंनी कालच्या कडू कारल्याची कोशिंबीर कटाप करून काकांसाठी कच्च्या कैरीचे कोय
काढून कालवण केले. काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले.
केळकरांच्या कोकणस्थ कुटुंबात कर्तव्यापुढे कर्मकांड केव्हाही कनिष्ठच. कर्तव्यदक्ष काकांच्या
कार्यकाळात कचेरीने कर्मरूपी किल्ल्याचे कीर्तिशिखर काबीज केले.
कामावरून काढलेल्या केशवाने कितीतरी काबाडकष्ट काढल्यावर कोल्हापूरच्या कॉम्रेड कणेकर
कॉलेजने केशवाला कबड्डीचा कर्णधार केला. क्रिडापटू केशवाने कबड्डीतच करियर केले. कालच्या
कागाळीखोर केशवाला काळानेच केला 'कबड्डीतल्या किचकट कसरतींचा कर्ता'!
कथासार
-
क्रियेविण करिता कथन, किंवा कोरडेची कीर्तन,
कितीक किताब कष्टाविण, काय कामाचे

------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------

परवा पुराण-प्रसिद्ध पखवाज पंडित पुरोहित पंतांची पिवळी पगडी पुरंदरच्या पंधराशेव्या
पायरीवरून पुण्यात पर्वतीच्या पाचव्या पायरीपाशी पर्णकुटीपासून पंधरा पावलांवर पहुडलेल्या
पंकजच्या पोटावर पटकन पडली. पगडी पडलेली पाहताच पंत पुरंदरच्या पायथ्याशी पोलिसठाण्यात
पळाले. पुरंदरच्या पोलिसांनी पंतांना पुण्याच्या पोलिसांकडे पाठवले.

पंत पुण्यात पोहोचताच पोलिसांवर पेटले. पंत पेटल्यामुळे पोलिस पटकन पर्वतीकडे पळाले. पांढर्‍या
पोषाखातल्या पोलिसांना पाहून पंकज पर्वतीच्या पलिकडे पळाला. पोलिसांनी पंकजचा पिच्छा
पुरवला.

पळता पळता पंकज पाण्याच्या पाँडमध्ये पडला. पंतांनीच पाण्यात पोहून पंकजला पकडले. पिवळी
पगडी पण पकडली. पोलिसांनी पंकजला पोलिसठाण्याकडे पिटाळले. पकडणारा पोलिस पदपथावर
पाय पसरून पडला. पोलिस पडलेला पाहून पंकज पाठीवर पांघरूण पांघरून पळाला.

पंतांनी पुरंदरला पोहोचताच पगडीत पंकजचे पैशांचे पाकिट पाहिले. पाकिटातले पुष्कळ पैसे पंतांनी
पनवेलला पुत्राला पोस्टाने पाठवले. पंतांच्या पाजी पुत्राने पैशांच्या प्राप्तीतून पोटात पंजाबी
पदार्थ पचवले.

पंतांना परमेश्वरच पावला!
पंकजला पकडण्यासाठी पंतांसोबत पुण्यात पोहोचलेली पंतांची पोरगी प्राची पंकजला पहिल्यांदा
पाहताच पंकजच्या प्रेमात पडली. प्राचीने पंकज, पोलिसांची पकडा पकडी पाहिली. पंकजचा
पदपथावरून पोबाराही पाहिला. पानशेतच्या पुराच्या पाण्यामुळे पुनर्वसित पंकज परत पर्णकुटीत
पोहोचला.

पित्यासमवेत प्राची पुरंदरला परतली, पण पंतांनी पंकजच्या पाकिटातल्या पैशांबाबत पंक्ति-प्रपंच
पाळला. पुष्कळ पैसे पुत्राला पाठवले. पंतांच्या पुन्हा पुन्हा पिडणार्‍या पुराणांच्या पोपटपंचीमुळे
प्राची पेटली.

पंकजच्या प्रेमाखातर प्राची पुण्यास परतली. प्राचीनेच पंकजवरच्या पोलिसांच्या पंचनाम्याला
पाने पुसली. पंकजला पहायला प्राची परत पर्णकुटीपाशी पोहोचली. पण पर्णकुटीत पहुडलेल्या
पंकजचे पाय पळून पळून पांढरे पडलेले! प्राचीने पंकजच्या पायावर पिवळे पुरळही पाहिले.

पंकजची परिस्थिती पाहून प्राण पिळवटलेल्या प्राचीने पदर पाण्यात पिळून पंकजचे पाय पुसले.
प्राचीचा प्रथमोपचार पाहून पंकजला पोरगी पसंत पडली. पंकजने प्राचीला पर्णकुटीतच पटवले.

पर्णकुटीतील प्रेम-प्रकरण पाहून पर्णकुटीच्या पायर्‍यांवर पत्ते पिसणारी पोरे पूर्व-पश्चिमेला
पांगली. प्राचीने पंकजच

आई, असं का ग केलंस?

आई, असं का ग केलंस?
(मनाला स्पर्शून गेलेले आईला लिहिलेले एक पत्र..)


उरिया भाषेतील लेखक...श्रीकांत पारिजा यांनी एकदा एक हत्या झालेला स्त्री गर्भ पाहिला. त्या क्षणी त्यांचा पोटात ढवळून आलं. काय करावं ते सुचेना.
त्यानंतरचे कित्येक दिवस त्यांच्या मनातून ते दृश्य आणि त्या अकाली फेकून दिलेल्या चिमुकलीविषयीचे विचार पुसले जात नव्हते. मग त्यांनी लेखणी उचलली आणि
त्या आईलाच एक पत्र लिहिलं......उरिया भाषेत प्रसिद्ध झालेल्या त्या पत्राचा अनुवाद केला आहे कटक येथे राहणाऱ्या "राधा जोगळेकर" यांनी.
( सकाळ च्या सप्तरंग पुरवणीतून आज हे पत्र इथे पोस्ट करतांना फक्त हीच विनंती आहे कि हे पत्र कॉपी करून शक्य तितक्या लोकांपर्यंत email करून पोचवा....
हे वाचून एक जोडप्याचे जरी विचार बदलले तरी "सार्थक" झाले असे मी समजेन.....हे पत्र पोस्ट करायची हि जागा आहे का नाही मला माहित नाही...चुकल्यास क्षमा
असावी.
आणि पुन्हा एकदा हे पत्र शक्य तितक्या लोकांपर्यंत पोचवा हि विनंती. )


आई, असं का ग केलंस?
का ग, तुला माझी थोडीशीही आठवण येत नाही का? तू असं का केलंस?
मी तुला पाहण्यासाठी किती आशा लावून बसले होते; पण तू मला मारूनच टाकलस.
तुला माहित आहे का आई, मी फक्त तुलाच ओळखत होते. आणखी कोणाचा स्पर्शही नव्हता झाला मला.
माझ्या आयुष्यातल्या त्या चार महिन्यात मी जे काही अनुभवलं, ते फक्त तुझ्याचमुळे ग.
आई तुला आठवत का? माझा भाऊ राजा जेव्हा रडायचा, तेव्हा तू त्याला समजवायचीस, कि रडू नकोस.
आता तुला थोड्याच दिवसात तुझ्याशी खेळायला आणखी एक भाऊ येईल.
तेव्हा मी तुझ्या पोटात खळखळून हसायचे आणि म्हणायचे, 'आई भाऊ नाही.
राजाभाईची छोटी बहिण येणार आहे.
तू राजाभाईला कुशीत घेऊन झोपी जायचीस; पण मला मात्र रात्रभर झोप यायची नाही.
भाईबरोबर दंगामस्ती करण्याची, खेळण्याची मला खूप इच्छा व्हायची. मग पोटात असूनही मी त्याला
हळूच पायाने ढकलून द्यायचे. तोही झोपेतून जागा झाल्यावर तुझ्या पोटाला हाताने ढकलत असे. मला लागायचं.
तरीही खूप आनंद व्हायचा. का माहिती आहे? कारण बहिण-भावातल्या खेळाची मजा वेगळीच असते!
कधीतरी भाईला बर नसायचं, तेव्हा तू म्हणायचीस, 'हे माँ, माझ्या मुलांना सुखी ठेव.
ते ऐकून माझ्या लहान लहान डोळ्यात पाणी दाटून येई. वाटे, माझी आई किती चांगली आहे.
मुलांवर तिची किती माया आहे. तुझ्यामुळे मला समजल, कि आणखी एक मोठी आई, "माँ" आहे,
जी माझ्या आईला शक्ती देते. सामर्थ्य देते.
माझे हे चार महिने फक्त तुझा विचार करण्यात गेले. मनात सतत एकाच विचार असायचा, तुला बघण्याचा!
एकदा तू राजाभाईला म्हणत होतीस. माझ्या बाळा तुझ्यासाठी दहा महिने मी त्रास सोसल्यावर तुझा जन्म झाला.
मोठा झालास, की आईचं नाव उज्वल कर, वगैरे वगैरे.....
त्या दिवशी मला रडूच आलं. तू राजाभाईचे लाड करत होतीस म्हणून नाही, तर माझ्या आईला बघण्यासाठी मला अजून
सहा महिने वाट पहावी लागेल म्हणून.....
मग एक दिवशी तू आणि ते पप्पा नावाचे कोणीतरी डॉक्टरांकडे जाण्यासाठी बाहेर पडलात.
रस्त्यांमध्ये असताना मला खूप जोरात धक्का बसला. आतल्या आत बराच मार बसला. मग तू पप्पांना
गाडी हळू हळू चालवायला सांगितलस. बाळाला त्रास होईल म्हणालीस. तुला माझी किती काळजी वाटते,
हे पाहून मला किती बर वाटल होत.
दवाखान्यात तू झोपलीस, तेव्हा मी तुझ्या पोटात खेळत होते. तुझ्या पोटावर काहीतरी लावून डॉक्टर जेव्हा तपासात होते,
तेव्हा मला खोडसाळपण करण्याची खूप इच्छा झाली होती. मी पोटातल्या पोटात पटापट फिरत राहिले. म्हणून डॉक्टर म्हणाले,
"मुल खूप हालचाल करत आहे, त्यामुळे काही समजत नाही."
थोड्या वेळाने ते म्हणाले, की मुलगी आहे. त्यानंतर एकदम शांतता पसरली. मग तो पप्पा नावाचा माणूस म्हणाला,........
"सर, अबोर्शन करा..."
डॉक्टर म्हणाले "उद्या सकाळी या."
मी पोटामध्ये खिदळत होते.
दुसर्या दिवशी सकाळी देवाची पूजा करताना आई तू म्हणालीस, हे माँ, मला नीटपणे जाऊन सुखरूप घरी येऊ दे."
मला वाटल, की तुझी तब्येत बिघडली असावी, मी पण पाणावलेल्या डोळ्यांनी त्या मोठ्या आईला म्हणाले,
की माझ्या आईला लवकर बर कर....
नंतर.....नंतरच तुला माहीतच आहे....
आई, का ग मारलस मला? आई, तुला बघायचं होत ग डोळेभरून.
मी तुला पाहिल्यानंतर मला मारून टाकलं असतस तरी चालल असत मला.
आई मला पुन्हा एकदा तुझ्या गर्भात जागा दे. मला हे जग बघायचं आहे. मलाही शाळेत जायचं आहे.
राजाभाईसारखा " हेप्पी बर्थ डे" करायचा आहे. हसत खिदळत तुझ्यामागे धावायचं आहे.
आई, फक्त एकदाच मला कुशीत घेऊन माझे लाड कर ना ग....आणि फक्त एकदाच माझ्या कानाशी म्हण....
'झोप ग माझ्या लाडक्या बाळा, तुझी आई आहे ना जवळ...मग कशाला घाबरतेस....'
............ ....आई एकदाच...........फक्त एकदाच.........

दोन थेंब...

दोन थेंब...
पावसाचे दोन थेंब ढगातुन निघाले.वार्याच्या प्रवाहाशी झुंजत, ढगाच्या तुकड्यांना चुकवत, पृथ्वीच्या दिशेने.दोघेही गप्प होते.एकाला रहावल नाही, त्यान संवाद सुरु केला-"आता पृथ्वीवर एकत्र प्रवास करायचाच आहे, बोल ना काहीतरी."
मग दूसरा बोलला,"मी अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करतोय."
"आता काही मैलांचा प्रवास उरलाय, आता अंतर्मुख होउन काय करणार आहेस?"
"आयुष्याच्या शेवटीच तर अंतर्मुख व्हाव लागत.आपला वेग आपल्या हाती नाही, आपली दिशा आपल्या नियंत्रनात नाही आणि

कपाळमोक्ष तर ठरलेलाच आहे!""मग आपल्या हाती काहीच नसताना विचार करुन आणि अंतर्मुख होउन काय करणार आहेस?त्यापेक्षा छान गप्पा मारू आणि वेळ आली, की अनंतात विलीन होउन जाऊ."
"त्याने काय होणार? कपाळमोक्ष टळणार आहे का आपला?"
"अच्छा, म्हणजे तुला काळजी लागुन राहिली आहे ती तुझ अस्तित्व संपून जाण्याची!"
"का?तुला नाही लागुन राहिली आहे काळजी?"
"नाही.आपला ढगात जन्म होतो, त्याच क्षणी अपल भवितव्य ठरलेल असत.ढगाला आपला भार असह्य झाला, की तो आपल्याला सोडून देणार.मग गुरुत्वाकर्षणाच्या ताब्यात जाउन खाली डोक वर शेपुट असा आपला प्रवास सुरु होतो.यात आपण काय करू शकतो?"...
"पृथ्वीवर पाण्याला जीवन म्हणतात आणि जीवनाच्या थेंबाला स्वताचा जीव राखन्याच स्वातंत्र्य नाही,हे अजबच."
"हे बघ, अपाला कपाळमोक्ष होतो म्हणजे काय? तर थेंबाच अस्तित्व संपत.आपला जीव जात नाही,फ़क्त रूप बदलत!"
"मी थेंब आहे आणि पडल्यावर थेंब राहणार नाही, एवढ मला कळत."
"तू पाणी आहेस आणि पाणीच राहणार आहेस,एवढ समजुन घे.तू म्हणजे Hydrogen चे दोन रेणू आणि Oxigen चा एक! तलावातही आणि समुद्रातहि!"

"बरा भेटलास,बोल,काय गप्प मारणार होतास माझ्याशी?"
"अरे,गप्पा मारायला काय हजार विषय आहेत.मी तुला प्रश्न विचारतो, आपण का पडतो?"
"हा काय प्रश्न झाला?""म्हणजे अस बघ, बेडूक घसे फुगवून त्यांच्या प्रेयासिला बोलावतात आणि आपली आराधना करतात म्हणुन आपण पडतो, की एखादी आजी देव पाण्यात बुडवून बसते म्हणुन आपण पडतो..."
"अरे तुला काय खूळ लागल का? आपण पडतो त्याच्याशी यापैकी कशाचाही संबंध नाही.निसर्गचक्र म्हणुन पडतो आपण."
"चूक!"
"हे बघ, आपण पडतो त्याला उगाचच काहीतरी महान अर्थ
चिकटवत पडू नकोस."
"पण, समज आपण स्वताचा असा समज करुन घेतला, की आपण त्या
बेडकांसाठीच पडतो आणि आपल्या वर्षावात भिजुन बेडूक-बेडकी प्रनयात धुंद होतात......मादी अंडी देते.हजारो बेडूक जन्मतात, ते किड्यांना खाऊन पृथ्वी स्वच्छ ठेवतात. त्या बेडकांना खाऊन साप जगतात..."

"बापरे, मी हा असा विचारच केला नव्हता कधी..."
"समज, कुणीतरी पर्जन्यदैन्य होता म्हणुन आपण पडलो.पाउस पडून काही कोणाचा व्यक्तिगत फायदा नाही.मग यांच्यामुळे आपण पडलो, अस समजायला काय हरकत आहे?"
"खरच, काहीच हरकत नाही आणि एखादी प्रेमळ आजी जगासाठी देवाला पाण्यात बुडवून ठेवणार असेल, तर तेवढ्यासाठीच मी पडतो म्हणायला तर मला आनंदच वाटेल!"
"आता कस बोललास? नाही तरी आपण पडणार तर आहोच,मग त्या
पडण्याला असा अर्थ दिला तर पडण्याला आणखी गम्मत नाही का येणार? आता आणखी एक गम्मत.तुला जर choice दिला आणि विचारल, की बोल तुला कुठे पडायचे आहे, तर तू कुठे पडशील?"
"हे काय भलतच?"
"अरे गम्मत! ज़रा विचार तर करुन बघ.कुठेतरी दोन धुंद जीव एकमेकांना लगटून समुद्राकाठी फिरत असतील तर नेमक जाउन तिच्या ओठांवर पड़ाव,भेगाळलेली जमीन तहानेन व्याकुळ होउन आकाशाकडे पाहत असते तिच्या तृप्तीचा पहिला थेम्ब व्हाव,एखाद अवखळ मूल खिडकित बसून तळहात गजातुन बाहेर काढत असेल तर त्याच्या इवल्या हातांवर जाउन विसावाव..
...एखाद नक्षिदार फुल पाखरू पंख पसरून फुलावर बसल असेल तर त्याचे रंग भिजवून टाकावेत...काहीही!" दूसरा थेम्ब ऐकता ऐकता हरखून गेला होता.पहिल्यान बोलन संपवल तेव्हा तो भानावर आला आणि म्हणाला,"अरे

आपले आयुष्य पण एवढे रोमांटिक,छान असू शकत, असा विचारच नव्हता केला मी कधी!"
एक आजोबा हातात पिशवी सांभाळत, वाऱ्याने उलटी होत असलेली

छत्री सावरत कसेबसे चालत होते.पहिला थेंब त्यांच्या छत्रीवर पडला आणि मग घरंगळत जमिनीवर पडला.चाफ्याच डौलदार झाड़ दुधाळ फुल अंगावर लेवून हिरवी वस्त्र नेसून सजल होत.भार सहन न होउन पान वाकल आणि

थेंबन जमिनीवर उडी घेतली.तितक्यात पहिल्यान दुसर्याला मिठीत झेलल.दूसरा म्हणाला,"आता मी वाट बघतोय, वाफ होउन ढगात जाण्याची आणि पुन्हा थेम्ब होउन बरसन्याची.थेम्ब होउन पडण्यात किती मजा असते, ते मला आज कळल!".

आम्ही अशा देशात राहतो...

मित्राने पाठवलेल्या इंग्रजी ई-मेलचा मराठी अनुवाद...

आम्ही अशा देशात राहतो:

* जिथं पोलिस आणि रुग्णवाहिकेपेक्षाही लवकर तुमच्या घरी "पिझ्झा" पोह्चतो,
* जिथं वाहन कर्ज ५% तर शैक्षणिक कर्ज १२% नी मिळतं,
* जिथं तांदुळ ४० रु. किलो तर "सिमकार्ड" मोफत मिळतं,
* जिथं एक लखपती लाखो रुपये देवुन क्रिकेटचा संघ विकत घेतो, मात्र तीच रक्कम दान नाही करत,
* जिथं पायात घालायच्या चपला/ बुटं वातानुकुलित दुकानात विकली जातात तर पोटात घालायच्या पालेभाज्या उघड्या रस्त्यावर विकल्या जातात,
* जिथं प्रत्येकाला प्रसिध्दी हवी आहे, मात्र त्यासाठी कुणी सत्-मार्ग अवलंबण्यास तयार नाही,
* जिथं लिंबाच्या पेयात कृत्रिम स्वाद मिळवला जातो, मात्र भांडी धुण्याचा साबणात अस्सल लिंबु असतं,
* जिथं चहाच्या टपरीवर लोक "बालमजुरी" वरच्या वर्तमान पत्रातील बातम्यांवर चर्चा करतात - म्हणतात "यार, बाल-मजुरी करवणार्‍यांना फासावर लटकवलं पाहिजे" .... आणि नंतर आवाज देतात...."छोटु.... दोन चहा घेऊन ये...!"


..... तरीसुध्दा ...... माझे माझ्या देशावर प्रेम आहे!

कशासाठी करायचा जयमहाराष्ट्र ?

कशासाठी करायचा जयमहाराष्ट्र ?
 
१८ तास वीज नाही त्यामुळे कारखानदारी व्यापार नाही रोजगार नाही
सुंदर मुंबई स्वछ्य  मुंबईची,  बकाल मुंबई बेफाम मुंबई केली आहे
प्यायला पाणी नाही म्हणून विदर्भात दंगे हि आजची बातमी
पण राज्यकर्ते दारू कशी स्वस्त मिळेल या विचारात मग्न .
 
५० वर्षात जातीपाती नष्ट होण्याऐवजी प्रत्येकजण आपण कोणत्या जातीचे ते अभिमानाने मिरवतो ,
सहिष्णुता नष्ट होऊन 
विचारांचा मुकाबला विचारांनी करण्यापेक्षा हाणामारीने करणारे आज नेता बनत आहेत. 
लोकशाही च्या नावाखाली सर्व नेते घराणेशाही राबवीत आहेत ,
माझा मुलगा/मुलगी पुतण्या यापलीकडे जग नाही
महिला आरक्षणाच्या नावावर स्वताच्या बायको /मुलीची काळजी घेतली जात आहे
गुंड तडीपार खून हि नेते (??)मंडळींची ओळख बनली आहे .
 
शिक्षण हे  फक्त श्रीमंतांची मिरासदारी होऊन राहिली आहे 
 
महाराष्ट्रच्या  राजधानीत मराठी फक्त २० टक्के बोलतात
महाराष्ट्रात मराठी भाषा हि इंग्रजी व हिंदी नंतर ३रया  क्रमांकावर आहे 
पण  मराठी भाषेच्या  नावावर गळे काढन्न्यारांची मुले इंग्रजी भाषेत शिकतात कारण ती जागतिक गरज आहे.
बाल मृत्यू चे प्रमाण वाढत आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत
गावे ओस पडत आहेत तर शहरांची सूज वाढत  आहे 
नक्षलवाद वाढतो आहे पण त्यावर मार्ग शोधण्या ऐवजी बंदुकीच्या बळावर तो दडपून टाकायला बघत आहेत
साहित्यिक क्षेत्रात मरगळ आहे, क्रीडा क्षेत्रात बोंब आहे, व्यापारात साडेमाडे तीन-चार आहेत  कशी होणार प्रगती?
आपल्या बरोबर निर्माण झालेला गुजरात १६ टक्के जी डी पी वाढ करून खरा सुवर्ण गुजरात बनत असताना  पुणे मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्राची  वाढ बिहारपेक्षा देखील कमी आहे पण विचार कोण करतोय ?
५० वर्षानंतर आज महाराष्ट्र ची अवस्था  खालील ' बी' च्या कविते प्रमाणे आहे 
 
तेजाचे तारे तुटले                मग मळेची सगळे  पिकले !
लागती दुहीच्या आगी      राष्ट्राच्या संसाराला ;
अति महामूर पूर येते      ढोग्याच्या  पावित्र्याला ;
खडबडात उडवी जेव्हा       कोरडया  विधीचा मेळा;
                चरकात मान्यवर पिळती
                सामान्य मुकी जनता ती ,
                 लटक्याला  मोले येती ,
कौटिल्य स्वैर बोकाळे !     तेजाचे तारे तुटले  !! 
 
अचारविचारौघाचा             नवनित्य रक्तसंचार
ज्या समाजदेही होता       अनिरुद्ध करीत व्यापार
त्या देहा ठायी ठायी        घट कसले बंध अपार
                 कोंडिले स्वार्थकोंड्यात,
                 जल सडले ते निभ्रांत 
                 तरी धूर्त त्यांस तीर्थत्व 
देऊनी नाडती भोले !            तेजाचे तारे तुटले  !! 
 
कर्तव्य आणि श्रेयाची      हो दिशाभूल जेव्हां ती,
आंधळा त्याग उपजोनी    डोहळे भिकेचे पडती;
अतिरेक पूज्यभावाचे        फुंकिती विवेकेज्योती;
               मग जुन्या अप्तावाक्याते
              भलतिशीच महती येते,
               राणीची दासी होते,
बुद्धीचे फुटती डोळे !           तेजाचे तारे तुटले  !! 
 
घन तिमिरी घोर अघोरी    विक्राळ मसण जागवती;
ती ' परंपरा ' आर्यांची 'संस्कृती' 'शिष्टरूढी' ती;
'धर्मादी' प्रेत झाल्याची बेफाम भुते नाचवती;
सत्तेचे फक्त पुजारी उरले        तेजाचे तारे तुटले  !! 
...
खिन्न मनाने

भवानी तलवारीचे गूढ....

भवानी तलवारीचे गूढ
छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार कुठे आहे, हा एक मोठा गूढ प्रश्‍न आहे. लोकमान्य टिळकांच्या काळापासून हा प्रश्‍न अधूनमधून चर्चेत येतोच, त्यावरून रान पेटते आणि मग तो पुन्हा बासनात जातो, असे घडताना दिसत आहे. इंग्लंडमध्ये बकिंगहॅम राजवाड्यात भवानी तलवार आहे, अशी एक समजूत आहे. लोकमान्य टिळकांनी ही तलवार इंग्लंडमधून परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करणारी एक कविता गोविंदाग्रजांनी (राम गणेश गडकरी) लिहिली होती.

1980मध्ये बॅ. अब्दुल रहमान अंतुले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना, तर त्यांनी भवानी तलवार महाराष्ट्रात आणणारच अशी घोषणा करून मोठी मौज केली होती. त्यासाठी लंडनवारीही केली होती. तिकडून त्यांनी भवानी तलवार नाही आणली, पण तिचे चित्र तथाकथित चित्र मात्र आणले. यानंतर भवानी तलवार पुन्हा चर्चेत आली ती केंद्रात भाजप आघाडीचे सरकार सत्तेवर आले तेव्हा. जून 2002मध्ये तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवानी स्पेनच्या पाच दिवसीय भेटीवर गेले होते. त्यावेळी स्पेनमधील काही संशोधकांनी सांगितले, की शिवाजी महाराजांची भवानी तलवार स्पेनमधील तोलेदो या शस्त्रास्त्रे निर्मितीसाठी नावाजलेल्या शहरातील कारागिरांनी तयार केली होती. त्यावरून काही काळ धुरळा उडाला. मग तो विरून गेला.

बखरी आणि काव्यांनुसार साक्षात्‌ तुळजाभवानीने शिवरायांना तलवार दिली, ती ही भवानी तलवार. तुळजाभवानीने महाराजांना दर्शन दिले आणि "राजा, मी तुझी तलवार होऊन राहिले आहे' असे म्हणाली, असे "शिवभारत' या काव्यामध्ये नमूद आहे. महाराजांकडे अनेक तलवारी होत्या. त्यातील एक त्यांनी शहाजीराजांनी दिली होती. तिचे नाव त्यांनी "तुळजा' असे ठेवले होते. महाराजांच्या दुसऱ्या एका तलवारीचे नाव "जगदंबा' असे होते. महाराज भवानीचे भक्त होते. तेव्हा अन्य एखाद्या तलवारीला त्यांनी "भवानी' असे नाव दिले असेल. यात काही वाद नाही. वाद आहे तो हा, की सध्या ही तलवार कुठे आहे?

सुमारे नव्वदेक वर्षांपूर्वी मुंबईतील कॅप्टन बहादुर मोदी नावाच्या गृहस्थांनी भवानी तलवार आपल्याकडे असल्याचा दावा केला होता. तशी एक पुस्तिकाही त्यांनी प्रसिद्ध केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, खान बहादुर पदमजी यांच्याकडे भवानी तलवार होती व ती त्यांनी डॉ. कूर्तकोटी यांना दिली. नंतर ती त्यांच्या स्वतःकडे आली. या तलवारीवर "छत्रपती शिवाजी' असे कोरलेले होते. नंतर उघडकीस आले, की तो मजकूर या पदमजी नावाच्या इसमानेच कोरलेला होता!

इंदूर-महू येथे असलेली तलवार हीच भवानी तलवार आहे व ती महाराजांनी छत्रसाल बुंदेल्याला दिली होती, असा दावा काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ इतिहाससंशोधक सेतुमाधवराव पगडी यांनी केला होता. परंतु त्या तलवारीवर नंतर छत्रसालाच्या सेनापतीचे नाव आढळून आले! असाच आणखी एक दाव