Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

आयुष्याला द्यावे उत्तर

असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची
आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची
असे दांडगी ईछा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना
हसू असावे ओठांवरती काळीज काढुन देताना
संकटासही ठणकावुन सांगावे आता ये बेहत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर


करुन जावे असेही काही दुनियेतुनी या जाताना
गहिवर यावा जगास सा-या निरोप शेवट देताना
स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

अफाट होती तुझी स्मरणशक्ती

अफाट होती तुझी स्मरणशक्ती
तुला नेमके ठाऊक होते, एकमेकाना पहिल्यान्दा पाहीले
तेव्हा सुर्याचा पृथ्वीशी असलेला नेमका कोन
एकमेकान्च्या नजरेत हारवताना
आपन नक्की किती होतो एक का दोन?
तुला ठाऊक होते माझ्या कुठल्या शर्टला होती किती बटने?
कुठल्याचा उसवला होटा खिसा?
रात्रभर गाणी म्हणून दाखवताना
नेमका कितव्या गाण्याला बसला होता घसा
तुझ्याशी बोलताना चुकून जाम्भई निसटली
त्या दिवसाची तारीख, महिना, वर्ष, वेळ
आणी एकून किती मायक्रो सेकन्द टिकू शकला होता
मुश्किलीने एकमेकान्शी अबोला धरण्याचा खेळ
आठवतेका तुला रातरानी शेजारी बसून
कविता म्हणून दाखवताना
फुललेल्या एकूण कळ्यान्ची सन्ख्या
माझ्या अक्षराची पुस्तकात लिहीलेली मानसशास्त्रीय व्याख्या
नेमके आठवत होते तुला
कवितानी बोट टिकवले होते ते नेमके कुठल्या क्षणान्वर
आणी मनावरील पानावर कोरल्या गेल्यावरही
कुठली कविता कुठल्या पानावर
अफाट होती तुझी स्मरनशक्ती
मलाच कसेकाय विसरलीस कुणास ठाऊक?

आता बरसतोय फक्त तुझ्या आठवणींचा पाऊस

आता बरसतोय फक्त तुझ्या आठवणींचा पाऊस
कधी रप रप कधी रिमझिम
कधी दिवसा ,कधी रात्री
कधी अंधुक पहाटी, तर कधी भर दुपारी
आता बरसतोय फक्त तुझ्या आठवणींचा पाऊस !!

मध्यरात्री पावसाच्या पाण्यानं ओथंबलेली प्राजक्ताची पानं
आणि अलगद उमलु पाहणारा प्राजक्त !
त्याचा मंद सुवास आणि पावसाचा तो लयबद्ध आवाज
आणि अचानक आठवतो तो तुझा निःशब्द सहवास
आणि नकळत पाणावतात डोळे
आता बरसतोय फक्त तुझ्या आठवणींचा पाऊस !!

खिडकीच्या गुलाबी गजांवर तयार झालेले पाण्याचे टपोरे थेंब ,
काही उजवीकड तर काही डावीकड सरकणारे,
काही लगेच खाली पडणारे, तर काही अगदी हळू !
आपल्या दोघांच्या भांडणान्सारखे !
कधी क्षणात मिटणारे, तर कधी पुढच्या कितीतरी
दिवसांतल्या प्रत्येक क्षणाला झुरायला लावणारे !!

तसं आता थेम्बांतून दिसणारा पलीकडचा निसर्ग
लुप्तच होत चाललाय जणू !
थेम्बही लुप्त होतील !!
पाऊसही निघून जाईल !!!
बरसतील फक्त तुझ्या आठवणी
माझ्या अश्रूंच्या पावसातून !!!!!

म्हातारपण

एकदा आले संध्याकाळी सोसाट्याचे वारे
डोक्यावरचे केस उडवून नेले सारे
येत नाही म्हणत, ऐकू कान सोडून गेले
वाक्यामधले अधले मधले शब्द सोडून गेले
चष्मा खराब, डोळे खराब काही कळत नाही
मागचे सारे दिसते स्पष्ट, पुढचे दिसत नाही
जेवण संपवून दंताजींची पंगत उठली सगळी
जून तोंडी पडली नेमकी देखणी गोरी कवळी
कंप कंपनीचा संप करतात बोटे काही
कापत रहातो पायच नुसता , अंतर कापत नाही
देहसदन सोसायटीचे हल्ली झालेत वांदे
जूने झाले बांदे, तरी आखडून वाकतात खांदे
मन म्हणते, कशाला या अर्थ असतो काही?
मान म्हणते तिन्ही त्रिकाळ नाही नाही नाही
शिवून घेतला सूट नवा , सवलती सकट
सुरकुत्यांचे क्रेप कापड , शिवणावळ फुकट
इतका सारा मेकअप , आता नाटकाला मजा
मुलगे झाले आजोबा अन मुलींच्या आज्ज्या
ओबड धोबड फणसा सारखे पिकत चालले क्षण

आवाज झालाय पावरी सारखा , शेवरी सारखे मन..
एकदा आले संध्याकाळी सोसाट्याचे वारे
डोक्यावरचे केस उडवून नेले सारे

... संदीप खरे ...

लाख सलाम तुझ्या-माझ्या मैत्रीला

तुझ्या मैत्रीच्या सानिध्यात
भीती नाही वाटली अंधाराची
अन अंधारात चालताना देखिल
ओढ़ होती प्रकाशाची.......
तुझ्या मैत्रीच्या सानिध्यात
पावलो पावली मिळाला विश्वास
अन मिळाला धीर संकटात .....
तुझी-माझी मैत्री बनली
एक फुलांचा नाजुक वेल
म्हणुन आपल्या मैत्रीचा
आहे अनोखा खेल......
पण तू हाथ धरलास
नि जिव माझा खुलुन आला
माझ्या आयुष्याच्या वृक्षावर
जणू गुलमोहरच खुलुन आला......
तूच शिखवलीस मला
जगण्याची खरी कला
म्हनुनच तुझ्या-माझ्या मैत्री साठी
लाख सलाम तुला.......

कधी असेही जगून बघा…..

कधी असेही जगून बघा…..
माणूस म्हणून जगताना
हा एक हिशोब करुन तर बघा!
“किती जगलो” याऐवजी “कसे जगलो”?
हा एक प्रश्न जरा मनाला विचारुन तर बघा!

कधी असेही जगून बघा…..
कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर बघा!
तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी
न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!

कधी असेही जगून बघा…..
संकटांमुळे खचून जाणारे तर शेकडोंनी मिळतात
कधीतरी अडचणींवर मात करण्याची हिम्मत दाखवुन तर बघा!
स्वतःपुरता विचार तर नेहमीच करतो आपण
कधीतरी बुडत्या्साठी काठीचा आधार होउन तर बघा!

कधी असेही जगून बघा…..
वर्तमान आणि भवि्ष्याची चिंता तर सदाचीच असते
कधीतरी भूतकाळाच्या वि्श्वात गुंगून तर बघा!
काळाची वाळू हातातुन निसटली म्हणुन काय झाले?
आधी अनुभवलेला क्षण पुन्हा एकदा जगून तर बघा!

कधी असेही जगून बघा…..
प्रतिसादाची काळजी का करावी नेहमी?
एखाद्यावर जिवापाड,निर्मळ,एकतर्फी प्रेम करुन तर बघा!
ज्या प्रेमाबद्दल सर्व जग कुतूहल करते
त्या अथांग भावनेची व्याख्या करुन तर बघा!

कधी असेही जगून बघा…..
अतिसामान्य जीवन नशीबी असले म्हणून काय झाले?
कधीतरी सामान्यातले असामान्य होण्याची जिद्द दाखवून तर बघा!
चिमणीसारखा जन्म मिळाला असला तर काय झाले?
आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करुन तर बघा!

कधी असेही जगून बघा…..
आयुष्य रोजच वेगवेगळे रंग उधळते
त्या रंगांमधे आनंदाने रंगून तर बघा!
तसे जगायला काय?कुत्रे-मांजरीही जगतात हो
कधीतरी माणूस म्हणुन स्वतःच्या जगण्याचा उद्देश शोधून तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

वाईट असते ...

मध्यरात्री जागणे वाईट असते
अन दुपारी झोपणे वाईट असते

सारखे रागावणे वाईट असते
सारखे वैतागणे वाईट असते

दूध अन फळ मिसळणे वाईट असते
फ्रीजचे पाणी पिणे वाईट असते

चिप्सपिझ्झे चापणे वाईट असते
कोकपेप्सी ढोसणे वाईट असते

दूध घेणे टाळणे वाईट असते
अन चहाकॉफी पिणे वाईट असते

प्रौढ स्त्रीला सेवणे वाईट असते
अन स्वतःशी खेळणे वाईट असते

यौवनाने माजणे वाईट असते
वृद्धपण नाकारणे वाईट असते

सप्तधातू बिघडणे वाईट असते
दोषतिन्ही बिनसणे वाईट असते

आळसाने लोळणे वाईट असते
नित्यकर्मे टाळणे वाईट असते

देह शाश्वत समजणे वाईट असते
आत्मबुद्धी विसरणे वाईट असते

एक विनंती आहे .....

एक विनंती आहे .....
दुरच जायच असेल तर
जवलच येऊ नका,
busy आहे सांगुन टालायाच असेल
तर वेळच देऊ नका......

एक विनंती आहे .....
साथ सोडून जायचच असेल तर
हाथ पुढे करुच नका ,
मनातून नंतर उतरायचच असेल तर
मनात आधी भरूच नका.........

एक विनंती आहे .....
चौकशी भरे call कालजीवाहू sms यांचा
कंतालाच येणार असेल तर misscall च देऊ नका,
memory full झालिये सांगुन delet च
करायचा असेल तर नंबर save च करू नका.......

एक विनंती आहे .....
मौनव्रत स्वीकारायच असेल तर
आधी गोड गोड बोलूच नका ,
सीक्रेट्स share करायचीच नसतील तर
मनाच दार उघडूच नका.....

एक विनंती आहे .....
माझ्या कालजी करण्याचा त्रासच होणार असेल तर
मला आपल म्हनुच नका ,
अनोलखी होउनच वागायच असेल तर
माझ्या बद्दल सगळ जानुच नका ....

एक विनंती आहे .....
अर्ध्यावर सोडून जायचाच असेल तर
आधी डाव मांडूच नका,
रागावून निघून जायचच असेल तर
आधी माझ्याशी भांडूच नका .....

एक विनंती आहे .....
सवयीच होइल म्हणुन तोडायच असेल तर
कृपया नात जोडूच नका ,
फाडून फेकून द्यायच असेल तर
माझ्या मनाच पान उलगडूच नका ........!

हल्ली कविताच सुचत नाही....!!!

शब्दांच्या या दुनियेत, मन माझे रमत नाही
कविता करायला, हल्ली कविताच सुचत नाही....!!!

शब्दांच्या प्रवासात
ओळ काही मिळत नाही,
वेचली अनेक शब्द फुले
पण शब्द शब्दाला जुळत नाही

खेळ हा शब्दांचा, मनाला कळत नाही,
कविता करायला, हल्ली कविताच सुचत नाही....!!!

रचल्या शब्दांच्या ओळी,
पण यमक काही जुळत नाही,
लिहिलेल्या कवितांना मग
अर्थ काही उरत नाही,

कशी आहे हि वेळ, सरता सरत नाही,
कविता करायला, हल्ली कविताच सुचत नाही....!!!

|| शिवबाची शिवशाही ||


||शिवबाची शिवशाही||
राजेशाहीचे नाव जरी
स्वराज्याची ग्वाही होती
लोकशाहीस प्रेरणा देणारी
शिवबाची शिवशाही होती
स्वराज्य संकल्पक बाप, 
दृढनिश्चयी आई होती
आत्मभान जागविणारी
शिवबाची शिवशाही होती
समता अन मानवतेची
रात्रंदिवस द्वाही होती
सह्याद्रीचा माथा उंचविणारी
शिवबाची शिवशाही होती
ना जातीभेद, ना धर्मभेद
प्रजानिष्ठा ठायी ठायी होती
स्वामीनिष्ठेने भारलेली
शिवबाची शिवशाही होती
आत्मभानाची पेटती मशाल
जिथे स्वराज्याची घाई होती
शत्रूस चळाचळा कापविणारी
शिवबाची शिवशाही होती
मातीस फाटाफुटीचा शाप,
जरी आपसात दुही होती
त्या सर्वाना मिटविणारी 
शिवबाची शिवशाही होती
हे पडती शब्द अपूरे
याहूनही बरेच काही होती!
स्वातंर्त्याची गाथा रचणारी
शिवबाची शिवशाही होती!!

शिवा एकदा जन्मला होता अफझल त्यानेच फाडला होता

शिवा एकदा जन्मला होता अफझल त्यानेच फाडला होता
भारतीय संसदेवर हल्ला करुनहि हिरो ठरु पहाणार्या अफझलला आणि त्याला फाशी न देणार्याना शतशाः प्रणाम.
हीच लायकी आमुची
धर पुन्हा वेठीस आम्हा
हीच पायरी आमुची
जा पुन्हा तुडवुन आम्हा
शिवा एकदा जन्मला होता
अफझल त्यानेच फाडला होता
नकोस घाबरु गडया तूं
आमचा तो इतिहास होता
ठेव लिहुन अनुभव तुझे
नक्किच त्यानाहि भाव येईल
न जाणो उध्याचा इतिहास
हिरव्या शाईने लिहीला जाईल
देशद्रोह केलास तूं
नको गाळुस हात-पाय तूं
देशद्रोह केलास तूं
आंता शहीद ठरशिल तूं
गल्लीबोळात भाऊबंध तुझे
आमचे हात बांधलेले
नेते साले कुत्रे आमचे
तुझ्या तर्फे भुंकणारे
टळेल रे फांशी तुझी
मग तुला कैदेत ठेवतील
मरतील आमचे बांधव उपाशी
तुला चिकन-मटन बिर्याणी
तुला सोडवायला तुझे लोक
विमानाचे अपहरण करतील
म्हणूनच म्हणतो-----
उठ अफझल ऊठ
नेते आमचे षंढ आहेत---
पुन्हा घाव घाल तूं !
पुन्हा घाव घाल तूं !!!

कोणासारखे काय करावं ............ ......... ...

राज्य करावं तर शिवाजी महाराजां सारखं
शूर असावं तर राणा प्रतापसारखं.
स्वामिनिष्ठ असावं तर खंडो बल्लाळासारखं.
देशभक्त असावं तर भगतसिंगसारखं.
कारस्थानी असावं तर आनंदीबाईसारखं .
हुशार असावं तर बिरबलासारखं .
धाडसी असावं तर डॉ.आनंदी जोशीसारखं.
करिअर करावी तर लता मंगेशकरसारखी.
सगळ्यांच्या गळ्यातील ताईत ह्वाव तर सचिन तेंडूलकरसारखं.
सत्तेला चिकटून रहाव तर शरद पवारांसारख.
राजकीय पक्ष बदलावेत तर सुब्रमन्यम स्वामीसारखं.
बेसूर गाव तर अलिशा चिनॉयसारखं.
समस्त लोकांना उल्लू बनवावं तर ललित मोदीसारखं.
अष्टपैलू लेखक असावं तर जयवंत दळवीसारखं.
देशाला ललामभूत ह्वाव तर बिल गेट्ससारखं.
निरलस सेवार्थी ह्वाव तर डॉ.तात्यासाहेब लहानेसारखं.
शब्दांचे बुडबुडे फोडावेत तर कॉंग्रेससारखं.
राष्ट्रभाषेचे धिंडवडे काढावेत तर ममता बनेर्जीसारखे.
लग्न न करता नुसतच बिनधास्त बरोबर रहाव तर बिपाशा बसूसारखं .
लग्नाशिवाय झालेली मुलगी खुल्लम खुल्ला वाढवावी तर नीना गुप्तासारखी.
खमक्या असावं तर लालू प्रसादसारखं.
लफडेबाज असावं तर टायगर वूड्ससारखं.
लग्न करावीत तर एलिझाबेथ टेलरसारखी.
उद्योगपती ह्वाव तर टाटासारखं.
सहकुटुंब यशस्वी ह्वाव तर अमिताभ बच्चनसारखं.
अनाकलनीय लिहाव तर ते ग्रेससारखं.
व्यंगचित्रे काढावीत तर ती आर.के.लक्ष्मणसारखी.
बाराच्या भावात जाव तर राजेश खन्नासारखं .
गझल गावी तर मेहंदी हसनसारखी.
घर असावं तर मुकेश अंबानीसारखं.
बायको असावी तर अभिषेक बच्चनसारखी.
चालीचा चोर असावं तर अन्नू मलिकसारखं.
भ्रष्टाचारी असावं तर इंडियन मेडिकल कौन्सिलचा अध्यक्ष केतन देसाईसारखं.
बोलबच्चन असावं तर अरुण जेटलीसारखं.
निर्ल्लज कामांध असावं तर किचकासारखं किंवा शायनी आहुजासारखं.
प्रेक्षक नाहीत हे कळून सुद्धा सिनेमे काढावेत तर देव आनंदसारखं.
बाईने रूपवान व ‘ग्रेसफुल’ असावं तर गायत्री देवीसारखं.
बाईन कस नसाव तर राखी सावंतसारखं .
निर्विष विनोद करावा तर पु.ल.देशपांडेसारखा.
लग्न करून सुखी ह्वाव तर माधुरी दीक्षितसारखं.
लग्न करून दुखी ह्वाव तर अदनान सामीसारखं.
दुसरी बायको करायची तर हेमा मालीनिसारखी.
त्रेचाळीस वय झाल तरी देवाच्या नावावर सोडलेल्या बोकडासारखं बकऱ्यांच्या मागे उंडरत फिरायचं तर सलमान खानसारखं.
बाबा आदमच्या जमान्यात लिहलेल्या एका कादंबरीच्या जीवावर मिशीला तूप लावून फिरायचं तर भालचंद्रनेमाडेसारखं.
बाबा आदमच्या जमान्यात काढलेल्या एका चित्रपटाच्या जीवावर आजही टेचात फिरायचं तर रामदासफुटाणेसारखं.
आनंदात व उत्साहात जगायचं तर यशवंत देवांसारखं.
रडत आणि कटकट करीत जगायचं तर माझ्यासारखं.
( सौजन्य- शिरीष कणेकर यांचा ‘सामना’ मधील लेख)

लल्लाटी भंडार ...

नदीच्या पल्याड, आईचा डोंगर (२)
डोंगर माथ्याला, देवीचं मंदिर (२)
घालू जागर जागर, डोंगर माथ्याला (२)
हे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
आलो दुरून, रांगून, डोंगर येंगुन, उघड देवी दार (२)
नदीच्या पाण्यावर, आन्गीण फुटत (२)
तुझ्या नजरेच्या तालावर, काळीज डुलत (२)
नाद आला गं आला गं, जीवाच्या घुंग्राला (२)
हे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
आलो दुरून, रांगून, डोंगर येंगुन, उघड देवी दार (२)
नवसाला पाव तू, देवी माझ्या, हाकला धाव तू
हाकला धाव तू, देवी माझ्या, अंतरी रहावं तू
देवी माझ्या, अंतरी रहावं तू, काम क्रोध अर्पुनी लाव तू
काम क्रोध मर्दुनी लाव तू, देवी माझी पार कर नाव तू
डोळा भरून, तुझी मुरत पाहीन
मुरत पाहीन, तुझा महिमा गाईन
महिमा गाईन, तुला घुगर्‍या वाहीन
घुगर्‍या वाहीन, तुझा भंडारा खाईन
दृष्ट लागली लागली, हळदीच्या अंगाला (२)
हे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
आलो दुरून, रांगून, डोंगर येंगुन, उघड देवी दार (२)
यल्लम्मा देवीचा जागर ह्यो, भक्तीचा सागर
निवदाची भाकर दाविती हि, जमल्या गं लेकरं
पुनवंचा चांदवा, देवीचा गं, मायेचा पाझर
आई तुझा, मायेचा पाझर, सागर ह्यो, भक्तीचा सागर
खनं नारळानं, ओटी मी भरीन
ओटी मी भरीन, तुझी सेवा करीन
सेवा करीन, तुझा देव्हारा धरीन
देव्हारा धरीन, माझी ओंजळ भरीन
आई सांभाळ सांभाळ, कुशीत लेकराला
आई सांभाळ सांभाळ, कुशीत लेकराला
हे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
आलो दुरून, रांगून, डोंगर येंगुन, उघड देवी दार (२)
यल्लम्मा देवीचा जागर ह्यो, भक्तीचा सागर
निवदाची भाकर दाविती हि, जमल्या गं लेकरं
पुनवंचा चांदवा, देवीचा गं, मायेचा पाझर
आई तुझा, मायेचा पाझर, सागर ह्यो, भक्तीचा सागर



संगीत : अजय-अतुल
गीत : संजय पाटिल
चित्रपट : जोगवा

कधीतरी पून्हा तू स्वप्नात येशील

कधीतरी अशीच एक संध्याकाळ असेल,
ह्रदयात तूझी प्रीत अन ओठावर गीत असेल...
सगळया आठवणी क्षणात डोळयासमोरून जातील,
नकळत मग गालावर या थेंब ओघळतील...


कधीतरी पून्हा तू स्वप्नात येशील,
एकत्र घालवलेले क्षण आठवतील...
तूझ्याशिवाय आता मला जगावं लागेल,
जगतानाही रोज असं मरावं लागेल...


कधीतरी तू ही माझी आठवण काढशील,
प्रीत आठवून मझी कंठ तूझाही दाटेल..
डोळ्यातील अश्रू मूक पणे गिळून टाकशील,
कारण पूसायला तेंव्हा ते मी जवळ नसेन...


कधीतरी असा एक दिवस येइल,
प्रेमापोटी मझ्या तू परत येशील...
पण तेंव्हा या प्रेमाला अर्थ नसेल,
कारण तेंव्हा मी या जगीच नसेन...


कधीतरी मग या मनालाही समजेल,
तूझ्या परतीची अशा तेंव्हा मावळेल...
त्यावेळेस जीवनाला या अर्थ नसेल,
कारण शरीराला तेंव्हा या मनंच नसेल...


कधीतरी तू मला असं वचन देशील ?
पूढच्या जन्मी तरी माझी होशील ?
मग तू सोडून गेल्याचं दुःख नसेल,
आपण कोणावर तरी प्रेम करू शकलो
यातच मग मला समाधान असेल...

मराठा हाच विचार ...

टिप – मराठा शब्द अखंड महाराष्ट्रातील लोकांना उद्देशून आहे. कुणी जातिवाचक घेऊ नये.

मराठ्यांची उप-यांशी जमली आहे गट्टी
लाचारीची मस्त पेटली आहे भट्टी
इथे जो तो स्वात: चा उदो उदो करतोय
गटारातील कीडा रोजच इथे मारतोय || १ ||

कुणी नाही जिवंत सारे मुडदे इथे
स्वार्थाचे माकड धावते जिथे तिथे ,
देतात आरोळी मेलेल्या प्रेताला
मराठाच शोधतोय मेलेल्या स्वत:ला || २ ||

भाषणबाजी करत रोज जोतो जगतोय
“मराठा मी एकटाच” आरोळी ठोकतोय
शंडा ची अवलाद दुसरेच आहे
हे बांगड्या घेऊन सांगायची वेळ आहे || ३ ||

मराठ्यांचे सरदार सगळे लाचार
आपणच खरे पाईक राज्याचे आहे
बाकी गणोजीची पिलावळ सांगायला
कलाशाचे ह्याना पाठबळ आहे || ४ ||

लिलावात इज्जत, आज बाजार भरलाय
जो तो इथे स्वार्थाने भारलाय ,
संपेल संपूर्ण मराठा पण संपेल का स्वार्थ ?
कधीतरी लाचारिही पुकारेल का आर्त ? || ५ ||

जे जे आहे जिवंत त्यानी घालावी साद
मेलेले मूडदे ही देतील प्रतिसाद ,
लाचार सरदार पण मावळे हुशार
गाडा आधी फितूर करा “मराठा हाच विचार” || ६ ||

—————– बाजी दराडे

माझ्या मागे....!

मी सुखे त्यागुनी सारे;
असे हरवतो जेंव्हा;
न जाणे कसा उमटलो
हा रस्ता माझ्या मागे...॥१॥

दर्पणात या इसमां
पाहणे अशक्य आहे;
तू काय हवी ती कर तयाची
अवस्था माझ्या मागे... ॥२॥

मी धावत होतो अथवा;
फरफटलो गेलो तरीही
हे काय नित्य स्तब्ध उभे
जन्मतः माझ्या मागे....॥३॥

काळाचा वेग असाध्य;
मन चक्काचूर होते
समोर पळते काही
सर्वत: माझ्या मागे....॥४॥

मज देह रिताच होता;
मोक्षाधीन आता झाला
ही कशास करिता तुम्ही
सांगता माझ्यामागे....॥५॥

असणे नसणे सारे;
जर हाती तुझ्याच आहे
का राहतोस व्यर्थ उभा
समर्था माझ्या मागे....॥६॥

मैत्री असते कशी ...


मैत्री असते कशी, लोणच्यासारखी?

हो हो लोणच्यासारखी. मुरत जाते, जुनी झाली की.

मैत्री असते कशी, दुधावरच्या सायीसारखी?

हो हो सायीसारखी. घट्ट होते वेळ जा‌ईल तशी.

मैत्री असते कशी, बासुंदीसारखी?

हो हो बासुंदीसारखी, गोडी वाढते आटवाल तशी.

मैत्री असते कशी, फोडणीसारखी?

हो हो फोडणीसारखी. लज्जत येते जीवनाला तडतडली तरी.

मैत्री असते कशी, मीठासारखी?

हो हो मीठासारखी. नसेल तर हो‌ईल जीवन अळणी.

चिमणं गोष्टी

चिमणे चिमणे रडू नको!
आईचा पदर ओढू नको!
सोपवते तुज बाईंच्या हाती,
शाळेला कधी टाळू नको!!!

चिमणे चिमणे झालीस मोठी,
पंख पसरून उडण्या साठी..
भरारी घेताना भिऊ नको!
उंच उंच जाण सोडू नको!!!

चिमणे चिमणे रडू नको!
सुटले घरटे समजू नको!
संसारी केली तुझी पाठवणी,
कमी स्वत:स लेखू नको!!!

चिमणे चिमणे झालीस मोठी!
टिपशील दाणे बाळा साठी!
शेवटची गं ही बाळे पाठवणी,
आता चिमणू राहू नको!!!

चिमणे चिमणे झालीस मोठी,
चिमणं गोष्टी विसरू नको!
चिमणे चिमणे रडू नको,
चिव-चिव करण सोडू नको!!!

राजे पुन्हा जन्मास या..

जन्म घ्या तुम्ही जन्म घ्या
राजे पुन्हा जन्मास या

शिरि शिरपेच हाती समशेर शोभती
अश्वरुढ होई राजा शिवछत्रपती
हे राजे, तुम्हा हिन्दुह्रुदय पुकारती
भगवा धरुन हातात या..राजे पुन्हा जन्मास या. || १ ||

कावा गनिमी करुनी, धर्मरक्षिण्यास
फाडिले अफजल खानास तसा
आज सरकार म्हणे त्यास फासी नको.
फाडण्या पुन्हा खानास या
राजे पुन्हा जन्मास या. || २ ||

नाव घेती तुमचे किती, परी
चरित्र कुणा का ना उलगडे तरी?
राजकारण करी, ती नावावरी,
शिकवण्या धडे राजकारणाचे या
राजे पुन्हा जन्मास या. || ३ ||

पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माणास या
मराठि अस्मिता जागविण्यास या
नको बांधणि किल्ल्याची आम्हा आता
माणुस मराठि एकदा जोडण्यास या
राजे पुन्हा जन्मास या. || ४ ||

जाणत्या राजास ला़ख्-लाख मुजरा असो
स्विकारण्या माझ्या मुजर्यास या
राजे पुन्हा जन्मास या.
जन्म घ्या तुम्हि जन्म घ्या
राजे पुन्हा जन्मास या. || ५ ||

----- --- स्वप्निल देमापुरे

चुकलंच.... पण कुणाचं ??

कधी कधी माझं मन मला खायला उठतं,
मी तिला असं दुःखवायला नको होतं...

हां, झालं असेल काही उलटं सुलटं,
कदाचित ते तिच्या मनात नसेल सुद्धा..!!
मी कधी याचा विचारच का केला नाही?
आत्ताच का डोकं खायला लागलाय हा मुद्दा..??

पण तरीही ती माझीच होती,
कमीतकमी त्या क्षणापर्यंत तरी..!!
झालं गेलं विसरून जां !! असं म्हणायला पाहिजे होतं,
पण कुणी?, मी नाही म्हटलं... तिनं तरी??

तिला काय वाटत असेल आत्ता?
जे घडलं त्या दिवशी, याचा ती विचार करत असेल का...?
शेवटी मान्य करुन चूक तिनं केली घोडचूक ...पण,
मी काय करू? काय नको ? ...असं मलाच कोड्यात टाकलं .. ते का?

मी काहीच बोललो नाही.
बोलायचं होतं, पण शब्दच फुटले नाही..
बस्स.. डोळ्यात डोळे घालून बघत राहिलो,
पण कदाचित म्हणूनच ती तिथं थांबली सुद्धा नाही..!!

शेवटचा निर्णय तिचाच होता ,
त्यावर तरी मी काहीतरी बोलायला हवं होतं,
दुःखवायचं होतं तिला, म्हणून चूप राहिलो, पण.. आत्ता वाटतं..

मी तिला असं दुःखवायला नको होतं...
मी तिला असं दुःखवायला नको होतं........!!!!
की...? तिनं तरी मला असं दुःखवायला नको होतं...