नुकतीच आमची भेट झाली...!

नुकतीच आमची भेट झाली...!

मनातील शेवटची ईछा पुर्ण झाली
खुप सुदर दिसत होती ती आज
वर्णन तरी करु तिच मी
जे कधी मला जमलच नाही.

आज नेमकी तिने तेच विचारल
मी आज कशी दिसते?
सागु तरी काय आता तिला,
हा विचार करता-करताच वेळ निघुन गेला.

पुन्हा समोर असताना काही बोलू शकलो नाही
तिने आजही तेव्हढा वेळ मला दिलाच नाही
नतर खुप काही सुचल,
पण एकायला ती मात्र थाबलीच नाही

करु तरी काय माझ्या या मनाला?

मन आता मात्र त्रास देऊ लागले
सारख समोर तीला घेऊन आठवू लागले
पुन्हा जुण्या आठवणी आठवून,
ते ढसा-ढसा रडू लागले

विसरलो होतो तूला,
मग का भेट्लीस मला.
आता तूच साग,
कस समजाऊ माझ्या वेड्या मनाला?

तु नसताना कसे पाहु एकट्याला
तु नसताना कसे समजाऊ या मनाला
आता तरी नको जाऊस दुर
मझ्यासाठी नव्हे, माझ्या मनासाठी तरी,
समजव तुझ्या कठोर मनाला.

निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू।

निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू।

निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू।
अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।।

परोपकाराचीया राशी। उदंड घडती जयाशी।
तयाचे गुण महत्त्वासी। तुळणा कैची ? ।।

यशवंत कीतिर्वंत। सार्मथ्यवंत वरदवंद।
पुण्यवंत नीतिवंत। जाणता राजा।।

आचारशीळ विचारशीळ। दानशीळ धर्मशीळ।
सर्वज्ञपणें सुशीळ। सकळा ठाई।।

या भूमंडळाचे ठायी। धर्म रक्षी ऐसा नाही।
महाराष्ट्र धर्म राहिला काही। तुम्हांकरिता।।

कित्येक दुष्ट संहारिले। कित्येकास धाक सुटले।
कित्येकास आश्रय जाले। शिवकल्याणराजा।।

- समर्थ रामदास

गाडी सुटली

गाडी सुटली, रुमाल हलले, क्षणात डोळे टचकन् ओले
गाडी सुटली, पडले चेहरे, क्षण साधाया हसरे झाले
गाडी सुटली, हातामधुनी हात कापरा तरी सुटेना
अंतरातली ओली माया तुटूदे म्हटले तरी तुटेना
का रे इतका लळा लावुनी नंतर मग ही गाडी सुटते
डोळ्यांदेखत सरकत जाते आठवणींचा ठिपका होते
गाडी गेली फलाटावरी नि:श्वासांचा कचरा झाला
गाडी गेली डोळ्यामधल्या निर्धाराचा पारा फुटला

हे भलते अवघड असते... हे भलते अवघड असते...
कुणी प्रचंड आवडणारे... ते दूर दूर जाताना...
डोळ्यांच्या देखत आणि नाहीसे लांब होताना...
डोळ्यातील अडवून पाणी... हुंदका रोखुनी कंठी...
तुम्ही केविलवाणे हसता अन् तुम्हास नियती हसते...

तरी असतो पकडायाचा... हातात रुमाल गुलाबी...
वार्यावर फडकवताना... पाह्यची चालती गाडी...
ती खिडकीतून बघणारी अन् स्वतः मधे रमलेली...
गजरा माळावा इतुके... ती सहज अलविदा म्हणते...

तुम्ही म्हणता मनास आता, हा तोडायाचा सेतू...
इतक्यात म्हणे ती - माझ्या कधी गावा येशील का तू?
ती सहजच म्हणुनी जाते... मग सहजच हळवी होते...
गजर्यातील दोन कळ्या अन् हलकेच ओंजळीत देते...

कळते की गेली वेळ... ना आता सुटणे गाठ...
आपुल्याच मनातील स्वप्ने... घेऊन मिटावी मूठ...
ही मूठ उघडण्यापूर्वी... चल निघुया पाऊल म्हणते...
पण पाऊल निघण्यापूर्वी... गाडीच अचानक निघते...

परतीच्या वाटेवरती गुदमरून जड पायांनी...
ओठावर शीळ दिवाणी... बेफिकीर पण थरथरती...
पण क्षण क्षण वाढत असते... अंतर हे तुमच्यामधले...
मित्रांशी हसतानाही... हे दु:ख चरचरत असते...

हे भलते अवघड असते.

माझी आठवण कधीतरी येईल तुला ...

माझी आठवण कधीतरी येईल तुला
जुन्या आठवणीत मग तू शोधशील मला.....

कुणालातरी माझी आठवण सांगताना तू हसशील
पण त्या आठवणीत मला पाहताच तू रडशील.....

आठवेल तुला समुद्र किनारी आपल्या दोघांच फिरण
तुझ्या थरथरत्या स्पर्शात मी स्वता हरवून जान.....

तू माझा हातात हात घेउन अनेक स्वप्न सजवन
माझ्या डोळ्यात पाणी येताच मला हसवण.....

आठवेल तुला आपल्या प्रेमातला तो जुना पाउस
एकाच छत्रीत पाउसात भिजणारी ती आपली हाउस.....

ओल्या चिंब तुझ्या स्पर्शात अंगावर येणारे शहारे
काळ्या गर्द वातावरणात मोहरून गेलेले ते अंग सारे.....

माझी आठवण येताच मी जवळ असल्याच तुला भासेल
तुझ्या डोळ्यातून निघालेला अश्रुचा प्रतेक थेंब मी असेल.....

तू एकटी बसल्यावर आठवेल तुला प्रतेक क्षण
त्या क्षणांमधे दिसेल तुला माझ तडफडणार मन.....

माझी आठवण कधीतरी येईल तुला
व्याकुळ होउन तुझ मन शोधेल मला.....

माझी आठवण कधीतरी येईल तुला ....
माझी आठवण कधीतरी येईल तुला ....

टपरी ...

सन्ध्याकाळची वेळ, सगळे जमायचो,
काँलेज सुटलेकी इकडेच यायचो,
वरती छत नाही, फ़टक्या भीन्ति, दोन चार तुटक्या बाकडी,
अश्या तुटक्या फ़ुटक्या विसाव्याच्या जागेला अम्ही 'टपरी' म्हणायचो.

पास, नापास तर कधि अभ्यासाला न्याय,
शेरो शयरी टवाळक्या तर कधी प्रेमचे अध्याय,
ह्या सगळ्या गोष्टिऩ्वर एकच उपाय,
सिगारेट का धुआ और उधार की चाय.

मुव्हि, नाटक, पिकनिकचे तर प्ल्यान बनवीले डिस्कोथेकचे,
कधि बर्थडे बम्प्चे तर अस्वाद घेतले कधि केकचे,
इथेच पराक्रम केलेत आम्ही पोरगी पटविण्याचे,
तर भान्डणात नकाशेही बदलीविलेत अनेकान्चे.

उन्हाळे, पावसळे,हिवाळे गेले,
आणी टपरी प्रेम आमचे वाढतच गेले,
पण एक दिवस टपरी सोडावी लागेल,
या विचाराने मन रडू लागले.

वेळ बदलला काळ बदलला, मीत्रान्चा आता साथ सुटला,
मनात इथली फ़क्त आठवण आहे,
आम्ही नसलो तरी काय झाले,
टपरी अजुणही तशीच सदाबहार आहे

चांदण्या रात्री तुझी साथ ...

चांदण्या रात्री तुझी साथ
माझ्या हाती सख्या तुझाच हात
अशी रात्र संपूच नये कधी
सूर्य सुद्धा लपून रहावा त्या गोड अंधारात...

तू माझ्या संगतीने चांदण्यात हिंडावे
तुझ्या सहज स्पर्शाने मी हरवून जावे
हे असे क्षण सख्या
पुन्हा पुन्हा मी तुझ्यासवे जगावे...

तुझ्या आश्वासक स्वराने माझे मन हसते
तुला पाहताना मी स्वतःला विसरून जाते
कसे सांगू जिवलगा तुला
मी फ़क्त तुझ्याच साठी जगते...

आजही आठवते ती चांदरात मला
त्या प्रेमळ सहवासाने सुख नव्याने गवसले मला
तुलाही सख्या आठवतात का
ते सारे शब्द जे मोहून टाकतात मला...

काहीच नाही…..

बोलण्यासारखे खुप आहे,
सांगण्यासारखे काहीच नाही;

करण्यासारखे खुप आहे,
होण्यासारखे काहीच नाही….

कधी माझ्या डोळ्यात, खोलवर बघुन पहा;
सोसण्यासारखे खुप आहे,
दुखण्यासारखे काहीच नाही…..

उभा  रहा आरशासमोर, न्याहाळ स्वतःचे प्रतिबिंब;
मी दिसले नाही तुला तर,
बघण्यासारखे काहीच नाही…..

तुला नेहमीच वाटत असेल,
मी तुझ्यावर प्रेम का करावं ते;
समजण्यासारखे खुप आहे,

कळण्यास अवघड काहीच नाही…..
माझ्या नेत्रांतील आसवांची,
तुला काय किंमत;
मानले तर अमृताचे थेंब आहेत,
नुसते पाहिलेस तर काहीच नाहीत.

कोण म्हणत देव नसतो......!

कोण म्हणत देव नसतो
आधार मागितला चालण्यासाठी,
आई-वडिल दिलेत...
जग बघण्यासाठी.

थोड पुढ चालून
प्रवास काटावा म्हटल,
तर मित्र दिलेत
आधारसाठी.....

आल्या जन्मी काही करावस वाटल
जग बघण्यासठी,
गुरु दिलेत....
ज्ञान वाढवण्यासाठी.

कोण म्हणत देव नसतो....

सहवास हवा होता
सुख:दुखाची देवाण-घेवाणासाठी
जीवनाचा जोडीदार दिलास....
भरुन आलेल मन मोकळ करण्यासठी.

सगळ मिळाल्यावर आता मात्र
आभार मानावस वाटल
जन्मदाताच तो.....
शेवटी त्यान त्याच्याच दारात आणुन टाकल

मैत्री कशी असावी...........

मैत्री कशी असावी...........
मैत्री कशी असावी?मैत्री कशी असावी?
जी कधीही पुसली न जावीजशी रेघ काल्या दगडावर....
कोणतही वातावरण पेलवनारीएखाद्या लवचिक वेलीसारखी.....
.कुठेही दडली तरी अस्तित्व दाखवणारी
कुठेही चमकणार्‍या हिर्‍यासारखी..थोड्याश्यावर न भागणारी.
.दुष्काळात तहाननेल्या मनसासारखी......
.पवित्रतेने परिपूर्ण अशीदेववरचि फ़ुले जशि....
.कधीही न सम्पणारीविशाल सागरासारखी सतत बरोबर असावी
शरीराच्या प्रत्येक अवयवासारखी....
तुटली तरि कायम आठवणीत असणार्‍या आयुष्यातल्या सोनेरी क्षणासारखी..........
.मैत्री अशी असावीप्रत्येक तासाला, क्षणात बदलणारी
मनाला तजेला देणारीकधीही न मरणारी अमर झालेल्या जिवासारखी....!!!

तुझ्या मैत्री ....

तुझ्या मैत्रीवर कितीही लिहीलं
तरी उनं वाटतं
सारं आहे माझ्याकडे आज
तरी कुठंतरी काहीतरी सुनं वाटतं

तुझ्या मैत्रीचे क्षण
पुन्हा हवेहवेसे वाटु लागतात
आज मन माझं लख्ख आकाश
त्यात तुझ्या आठवांचे ढग दाटु लागतात

तुझ्या मैत्रीची गर्द सावली
अशी आयुष्यावर दाटली होती
आयुष्यातली उन्हं माझ्या
तुझ्याचमुळे आटली होती

तुझ्या मैत्रीच्या आठवणी
मी आजही जपुन ठेवतो
आनंदाचे ते क्षण हरवु नयेत म्हणुन
काळजाच्या तिजोरीत लपुन ठेवतो

मैत्रीचं नातं तुझ्या
माझ्याशी आजन्म असचं राहील
तुला ठेच लागली कधी
तर पापणी माझी वाहील

मन माझे वेडे
पुन्हा एकदा त्या क्षणांचा शोध घेतात
अन शब्द माझे कवितेतुन
तुझ्या मैत्रीचा वेध घेतात

एक प्रेयसी पाहिजे............

एक प्रेयसी पाहिजे............

एक प्रेयसी पाहिजे, पावसात चिंब भिजणारी;
अन् मलाही तिच्यासोबत भिजायला लावणारी.

एक प्रेयसी पाहिजे, फुलपाखरणमागे धावणारी;
फुलांचे सारे रंग उधलत, झाडांमागे लपणारी.

एक प्रेयसी पाहिजे, मुग्धपणे हसणारी;
माझ्या बहुपाशात, अलगद येऊन बसणारी.

एक प्रेयसी पाहिजे, कशीही दिसनरी;
पण मानाने मात्र, अप्रतिम सुंदर दिसणारी,

एक प्रेयसी पाहिजे, जिवलग मैत्रीण असणारी;
आमच्या नात्याला हळुवारपणे जपणारी,

एक प्रेयसी पाहिजे, माझ्या भावना जनणारी;
मी जसा आहे तसेच माझ्यावर प्रेम करणारी,

एक प्रेयसी पाहिजे, प्रेमाला प्रेम समझणारी;
सुखा- दु:खात माझ्या तन्मयतेने साथ देणारी,

एक प्रेयसी पाहिजे,........
मिळेल का अशी?

मला मिळाली ....
तुम्हाला ?

कठिण असते...

प्रश्न विचारणे सोपे असते
पण उत्तर देणे कठिण असते

प्रेम करणे सोपे असते
पण प्रेम निभावणे कठिण असते

स्वप्न बघणे सोपे असते
पण स्वप्न पूर्ण करणे कठिण असते

दुख: देणे सोपे असते
पण दुख: पचवणे मात्र कठिण असते

घर तोडणे सोपे असते
पण नव्याने ते उभारणे कठिण असते

एखाद्याला उपदेश देणे सोपे असते
पण त्याप्रमाणे स्वत: वागणे कठिण असते.

शूरांच्या कथा ऐकणे सोपे असते
पण त्यांच्यासारखे लढणे कठिण असते

देवाकडे मागणे सोपे असते
पण देवाला काही देणे कठिण असते

सारचं थोड कठिण,थोड सोपे असते
कुठचा मार्ग स्विकारायचा हे ज्याचे त्यानेच ठरवायचे असते

आयुष्य म्हणजे ...

आयुष्य म्हणजे
१ संध्याकाळ, ४ मित्र, ४ कप चहा,
१ टेबल..

आयुष्य म्हणजे
४ गाड्या, ८ मित्र, सुट्टे पैसे,
१ मोकळा रस्ता..

आयुष्य म्हणजे
एका मित्राचं घर,
हलका पाउस,
आणि पत्ते ..

आयुष्य म्हणजे
कॉलेजचे मित्र,
बंक केलेले lec. तिघात १ वड़ापाव आणि
बील वरून भांडण..

आयुष्य म्हणजे
फ़ोन उचलल्यावर मित्राची शीवी,
आणि सॉरी बोलल्यावर,
आणखी एक शीव..

आयुष्य म्हणजे
३० वर्षानंतर अचानक जुन्या मित्राचा १ sms,
धुळीत पडलेला फोटो आणि,

डोळ्यात अश्रु !

तू ...

तू

नदीकाठी वाळूवर चंदेरी
लाटांनी लहरत लोळण घ्यावी
फुलपाखराने फुलावर बसावे अलगद
तसा तू कधी जवळ आलास कळलेच नाही....

कुठे दूरवर अनोळखी तू
भिरभिरत होतास कुठल्या प्रदेशात
पण कधी नकळतच
स्पर्श करून गेलास कळलेच नाही....

नव्हती कधी दृष्टभेट
नव्हता जाणवला तुझा हवेतला दरवळ
पण मनाचा मनाशी
कधी संवाद घडला कळलेच नाही .....

मनात सतत गुंजारव
तुझ्या शब्दलहरींचा
सतत तरंगत राहणारी
तुझ्या आठवणीची वलय ....

अशा अनोळखी मनांची
कशी होते ओळख
आणि अवचित कशा
होतात गाठीभेटी कळतंच नाही....

एवढे मात्र कळते आहे
काहीतरी घडते आहे
मनाच्या कानाकोपर्यात
काहीतरी निनादाते आहे ....

संगीताची सुरावट, रंगांचे फटकारा
किंवा मनावर ओठांची फुंकर
डोळ्यापुढे काही तरळते आहे
हृदयात काही उमलते आहे.....

का अशी करतेस ...

का अशी करतेस
का माझी परीक्षा घेतेस
हे माहीती असुन तुला
प्रेम करतो तुझ्यावर
का माझ्या बोलण्याची वाट बघतेस
का ग सखे का अशी करतेस

प्रेम तुझ्यावर एवढे करतो
की न एइकन्यास जीव घाबरतो
म्हणुन सखे माझ्या बोल्न्यास विलंब होतो
म्हणुन सांगतो, का बोलण्याची वाट बघतेस
का ग सखे का अशी करतेस

का ग अशी छळतेस
उमजुन आलेच असेल तुला
जपतो कीती मी हृदयात तुला
माहीती असेलच तुला
प्रेम म्हणतात ह्याला
मग का अशी करतेस
का ग सखे का अशी करतेस

प्रेम हे व्यक्त करने जरूरी आहे का
गहरा भाव मझ्या डोळयातला समजत नाही का
माझे खरे प्रेम असेल
तर तुला जरूर उमजेल
आणी उमजले आहेच
तरी अशी करतेस
का ग सखे का अशी करतेस?

आठवत का गं आई?

आठवत का गं आई?
ती चिमणी इवली
चिव चिव देत होती आरवली
हळुच चिमणताईच्या शिरुन पंखांत
निर्धास्त विसावली ती चिव चिव

आठवत का गं आई?
निक्कीसारखाच टिकल्यांचा
पाहिजे होत मला ड्रेस........
दिवसभर तुला दुकांनात फिरवल
आणि तुझी परी होउन
घरभर मिरवलं........
रात्री तुझ्या कुशीत अशीच मी निजले!
मेघाकडे पाहत होती चातकांची ही वंशावेल
एक एक धारा म्हणाले मीच टिपेल........
टप टप पडले थेंब आईने शिकवले
चोचीने नभ मोती झेलायला.........

आठवते का गं आई?
"ही माझ्या आजीची माळ" तु सांगितलं
छोटं मन वाक्याने किती भांडावल.....
ती सर आणि बाहुली
किती भातुकली खेळले
काळच्या ओघात माळ तुटली.......
तरी मोती ओंजळीत मी जपले!

मन ...

मन शांत का बसते हे का कधी काळात नाही,
मन सैरावैरा धावते ते का कधी थांबत नाही,
मन बेचैन होते ते का मला कधी सांगत नाही,
मन रागवाले हेच मला कधी उमजत नाही.

मनावर माझ्या ताबा नाही हे का लोकांनी सांगितल्यावर मला कळते,
मनाच मी ऐकत नाही हे का मला लोकांनी सांगावे लागते,
मनानि माझ मलाच का चांगले सुचत नाही हे ही लोकांनी सांगितल्यावरच मला का कळते,
मनावर विसंबून राहू नकोस हे ही हेच लोक मला सांगतात.


मनास मारुन मारुन मी आता थकलो,
मनात झुरून झुरून मी आता खचलो,
मनास दाबून दाबून मी आता टेकलो,
मनात विचार करून करून मी आता संपलो.


आता मी ठरवले आहे,
या मनाला मोकळे सोडून द्यायचे,
या मनाला स्वच्छंद फिरू द्यायचे,
या मनाला अंकुश नाही कुणाचा,

मन सांगेल तसेच करायचे,
मन सांगेल तसेच करायचे

कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

बाकी काही नाही
हसता हसता डोळे अलगद भरुनही येतील
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता-जाता
"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवती भोवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
स्रुष्टीमध्ये दोनच जीव आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

मोबाईल वाजण्याआधीच तो वाजल्य़ासारखा वाटेल
जुनाच काढून एसएमएस वाचावासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुनं बिबरुनं जाण्यासारखं काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला सांभाळावे थोडे
सांगुन द्याव काळजीसारख बिलकुल काही नाही

"कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......"

तुझ्या मैत्रीवर कितीही लिहीलं.....

तुझ्या मैत्रीवर कितीही लिहीलं.....
तरी उनं वाटतं
सारं आहे माझ्याकडे आज
तरी कुठंतरी काहीतरी सुनं वाटतं

तुझ्या मैत्रीचे क्षण
पुन्हा हवेहवेसे वाटु लागतात
आज मन माझं लख्ख आकाश
त्यात तुझ्या आठवांचे ढग दाटु लागतात

तुझ्या मैत्रीची गर्द सावली
अशी आयुष्यावर दाटली होती
आयुष्यातली उन्हं माझ्या
तुझ्याचमुळे आटली होती

तुझ्या मैत्रीच्या आठवणी
मी आजही जपुन ठेवतो
आनंदाचे ते क्षण हरवु नयेत म्हणुन
काळजाच्या तिजोरीत लपुन ठेवतो

मैत्रीचं नातं तुझ्या
माझ्याशी आजन्म असचं राहील
तुला ठेच लागली कधी
तर पापणी माझी वाहील

मन माझे वेडे
पुन्हा एकदा त्या क्षणांचा शोध घेतात
अन शब्द माझे कवितेतुन
तुझ्या मैत्रीचा वेध घेतात

मला कळतच नाही कधी

मला कळतच नाही कधी ,
माझा कुठला रंग आहे,
कधी मी ढगातला कापूस ,
कधी समुद्रातील तरंग आहे.

मला कळतच नाही कधी,
माझ कुठल गाव आहे,
कधी सुखाच्या महालात पडून,
कधी निराशेच्या वस्तीत निभाव आहे .

मला कळतच नाही कधी ,
मला हवे काय आहे ,
कधी नाविन्याचे वेड मला,
कधी जुन्या आठवनीत पाय आहे .

मला कळतच नाही कधी ,
जीवन म्हणजे काय आहे ,
शोध आणि प्रवास नेहमी ,
हेच माझे ध्येय आहे.

मैत्री अशीच आसावी कधी न संपणारी...

रातोरात रडवणारी, आसवाणी भीजवणारी
हृदयात प्रेमाच नव घर करणारी मैत्री

मैत्री आकाराने लहान
पण अर्थाने मात्र महान असते

रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीची नाती बरी असतात
कारण ती रक्ताच्या नात्याइतकीच खरी असतात

मैत्रीत नसते वस्तुंची देवाण-घेवाण
मैत्रीत असते भावनांची जान

मैत्री नसावी सूर्यासारखी तापणारी
मैत्री असावी सावलीप्रमाणे शांत करणारी

कळतनकळत आपल्या सुख-दुखात सामवणार डोळ्यात
अश्रू जागवणार जेव्हा कोणी भेटत तेव्हा जीवनाचे अर्थच बदलतात

मैत्रीत घालवलेला प्रत्येक क्षण असतो अनमोल
मैत्रीत असतो मनमनाचा समतोल

मैत्री अशीच आसावी कधी न संपणार.......

तिने कित्ती सुंदर दिसावं..

तिने कित्ती सुंदर दिसावं..
जसं गुलाबाचं फूल उमलावं..
कोणाच्याही नजरेत भरावं..
तासन तास पाहत रहावं..!!!!

तिने कित्ती गोड बोलावं..
ऐकणाऱ्याने विरघळून जावं..
हरवूनच जावं ..
सोबत तिच्या..!!!!

तिने कित्ती साधं रहावं ..
त्यातही रूप तिचं खुलावं..
कोणीही फिदा व्हाव ..
अदांवर तिच्या..!!!!

तिचं उदास होणं..
कसं हृदयाला भिडावं..
कोणालाही वाईट वाटावं..
अश्रूंनी तिच्या..!!!!

तिचं हसणं ..
कोणालाही सुखवावं..
कोणीही घसरून पडावं..
गालावरल्या खळीत तिच्या..!!!!

तिच्या नजरेने मलाच शोधावं..
अचानक नजरेने नजरेला भिडावं ..
मग तिने लगेच दुसरीकडे पहावं..
लाजेने चूर चूर व्हावं..!!!!

ती समोर असताना ...
मी सारं काही विसरावं..
तिने इश्य करत लाजावं..
मी 'हाय हाय' करत घायाळ व्हावं ..!!!!

तिने फक्त माझंच रहावं..
मीही फक्त तिच्यासाठीच जगावं..
साथ देऊ जन्मोजन्मी ..
विरहाचं दुख कधीही न यावं..
कधीही न अनुभवावं..!!!!

आयुष्य म्हणजे ....

आयुष्य म्हणजे कटकट..
जगण्यासाठी रोज कामाच्या ओझ्याखाली मराव लागतं
सुखाचा मोती मिळवायला दु:खाच्या सागरात बुडावं लागतं

आयुष्य म्हणजे वणवा....
इथे वेदनांना घेउन जळावं लागत
पोटाच्या आगीसाठी वणवण पळावं लागतं

आयुष्य म्हणजे अंधार...
इथे काळोखात बुडाव लागतं
परस्परांच्या बुद्धीप्रकाशाने इच्छित स्थळ शोधाव लागतं

आयुष्य म्हणजे पाऊस....
आप्तांची रखरखता पुसण्यासाठी मुक्तपणे कोसळाव लागतं
कष्टांच्या खाच खळग्यातुन वाहत सुखसागराला मिळाव लागतं

पण ...आयुष्य हे असेच का ?
मला वाटते .. आयुष्य म्हणजे तान्हुल्याचे हास्य
जिथे स्वत:ही मुक्त कंठाने हसता येत.
आपण अनुभवताना दुसर्‍यालाही सुख देता येतं.

कुणीतरी सोबत असावं ...

कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं
माझ्याच विचारांनी दिवसाची सुरवात करणारं,
कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं

होता विरह थोडातरी काळजी घे स्वतःची म्हणणारं
हे सारं बोलताना नकळतपणे दोन आसु गाळणारं
कुणीतरी असावं माझ्या परतीच्या वाटेवर डोळे लावुन बसणारं

काहीही झालंतरी माझा फोन कट न करणारं
आणि बोलणे कुणालाही समजणारही नाही इतक्या सहजतेने बोलणारं
कुणीतरी असावं अश्या माझ्याशी तासंतास गप्पा मारणारं

दिवसभरं माझ्या फोनची आतुरतेने वाट पाहणारं
फोन आल्यावर माझ्यावरं लटके लटके रागवणारं
कुणीतरी असावं मी समजावल्यावर मात्र नचुकता सॉरी म्हणणारं

सुट्टीच्या दिवशी भेटायला यायला सांगणारं
थोडासा तरी उशीर झाला येण्यासाठी तर येरझारया घालणारं
कुणीतरी असावं सोबत आतुरतेने माझी वाटं पाहणारं

माझ्या डोळ्यांतील भाव बोलले नाही तरी जाणणारं
एखाध्या नाजुक भावक्षणी डोळ्यातुन पाणी गाळणारं

औंदा लगीन ....

कवापासनं घरची मागं माह्या लागल्यात…
अतातरी दोनाच, चार कर की म्हणत्यात..
गड्यानॉ, आसल काय बी करायच न्हाय…
नस्त्या झेंगाटात आडकायचं मला न्हाय..
………………………………औंदा लगीन करायच न्हाय.

कुठं राव त्या बायकांच्या नादी लागता…
रोज रोजची कटकट न वटवट, आयला…
ह्ये कर, त्ये आन् रोज मग मरान हाय…
ह्याला बघ,त्याला ने रोजचं ग्रहान हाय…
………………………म्हणून औंदा लगीन करायच न्हाय.

म्या महनतो, भाजी न भाकरी जळाली…
तरी..म्हणावं लागतं काय मस्तच हाय…
मोकळा फिरता येणार न्हाय..नि गावच्या
पोरीकडं बी दिलखुलास बघता येणार न्हाय…
……………………..म्हणूनच औंदा लगीन करायच न्हाय.

बस का, यावर थोडा च भगणाराय सगळं..
त्यानंतरच ‘लचांड’ मग मागचकी लगतय…
बा ह्ये घे,बा त्ये घे एकत आन् करत करत
म्हातरपण पण मग हळूहळू सराय लागतय…
…………..आन् मग म्हणूनच औंदा लगीन करायच न्हाय.

झाकच की, मामाच्या शालीशीच लगीन ठरतय..
बघताय काय आसं? तिच्यात माहा जीव हाय..
वर ज्ये काय म्हनालय़,.. त्ये इसारा की राव….
माणूस बी चुकतोच की कधी, का खाताय भाव?
…………………इचार करतोय औंदा लगीन करावं की काय?

नाय, तसं न्हाय…तिचं नखरं सोशीन म्हणतो….
जळकी भाकरी डोळेझाकून घशाखाली उतरवतो….
गावच्या पोरिमधी…. नाहीतरी ठेवलयच काय?
म्हातारपनाला आपलीच पोरं असणार की न्हाय?
….जाऊ द्या सगळेच म्हनत्यात, तर औंदा लगीन करणार हाय..

तू नसतांना ......

तू नसतांना पाऊस का येतो?
क्षणभर मनभर ओलावा देतो
रिमझीम बरसत श्रावण मन होते
मी चींब सयीवर चींब ऋतू होतो..

तू नसतांना पारंबी झुलली
तुझी आठवे क्षणात सरसरली
झुलले पारंबीवर मन वेडे
असा झुला हा कुणास सावरतो?
तू नसतांना...

काल किनारा खोल पुन्हा गेला
तू नसतांना सागर ओसरला
जरी संपल्या लाटा ह्र्दयाच्या
तरी आतुनी उगाच खळखळतो..
तू नसतांना....

तू नसतांना आलेल्या धारा
उगाच मजला छळणारा वारा
तू असतांना कधी न जाणवल्या
तरीच का हा सूड असा घेतो..
तू नसतांना....

तुझे प्रेम म्हणजे असे

तुझे प्रेम म्हणजे असे
उत्तुंग शिखरावर उभे राहणे
तुझे प्रेम म्हणजे असे
खोल खोल दरीत स्वत: ला झोकून देणे जसे
तुझे प्रेम म्हणजे
पहाटे पहाटे फ़ुलावरच्या दवाला टिपणे जसे
तुझे प्रेम म्हणजे असे
नदीच्या अवखळ पाण्याबरोबर वाहत जाणे
जसे तुझे प्रेम म्हणजे असे
भर पावसात भिजणारे पारिजातक जसे
तुझे प्रेम म्हणजे असे
कुडकुडणार्‍या थंडीत शेकोटीतले कोळसे जसे
तुझे प्रेम म्हणजे असे
वार्‍यासंगे उडणारे पतंग जसे
तुझे प्रेम म्हणजे असे
उन्हाळ्याच्या रोहीणीत तापणारा सुर्यप्रकाश जसे...

अखेर कमाई...

मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले.

ज्योतिबा म्हणाले,
शेवटी मी झालो फ़क्त माळ्यांचा.

शिवाजीराजे म्हणाले,
मी फ़क्त मराठ्यांचा.

आंबेडकर म्हणाले,
मी फ़क्त बौद्धांचा.

टिळक उद्गारले,
मी तर फ़क्त चित्पावन ब्राम्हणांचा.

गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला
आणि ते म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात तरी तुमच्या पाठीशी आहे.
माझ्या पाठीशी मात्र फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !