जिद्दीस पेटला; हट्ट नको तो केला
पाहिली सुखाची वाट; शेवटी मेला
तो जाता जाता हेच सांगुनी गेला -
`...मरतात माणसे; पण दुःख अमर आहे!`
सारखा सुखाच्या धावधावला मागे
चडफडला, चिडला, रडला, भरला रागे
शेवटी म्हणाला सर्व विसरुनी त्रागे -
`...मरतात माणसे; पण दुःख अमर आहे!`
जगण्याच्या नावाखाली क्रूर कुचेष्टा
ही विटंबना; या अविरत हाल-अपेष्टा
कोकले कुणी तो दूर सुखाचा द्वेष्टा -
`...मरतात माणसे; पण दुःख अमर आहे...!`
ही व्यर्थ, निरर्थक इथली नातीगोती
जी परस्परांच्या दुःखां कारण होती
अन् गलका होतो अंती हाच सभोती -
`...मरतात माणसे; पण दुःख अमर आहे...!`
हा उरला आता शेवटचाच शिपाई
संपेल तरी का मग असमान लढाई ?
मेलाच पहा तो, बोले घाई घाई -
`...मरतात माणसे; पण दुःख अमर आहे...!`
विश्वात आज या कुणीच उरले नाही
दाटून राहिले दुःख दिशांना दाही
ललकारी आता घुमेल हीच उद्याही -
`...मरतात माणसे; पण दुःख अमर आहे...!`
माणूस क्षुद्र; त्याची ही क्षुद्र कहाणी
संघर्षानंतर उरली काय निशाणी ?
बोलेल कुणाच्या डोळ्यांमधले पाणी ? -
`...मरतात माणसे; पण दुःख अमर आहे...!`
***
मी कधीच त्याच्या नाही पडलो हाती
मी कधी न झालो का त्याचा सांगाती ?
सुख रडते; म्हणते, पिटून आता छाती -
`...मरतात माणसे; पण दुःख अमर आहे...!`
आई, असं का ग केलंस?
आई, असं का ग केलंस?
(मनाला स्पर्शून गेलेले आईला लिहिलेले एक पत्र..)
उरिया भाषेतील लेखक...श्रीकांत पारिजा यांनी एकदा एक हत्या झालेला स्त्री गर्भ पाहिला. त्या क्षणी त्यांचा पोटात ढवळून आलं. काय करावं ते सुचेना.
त्यानंतरचे कित्येक दिवस त्यांच्या मनातून ते दृश्य आणि त्या अकाली फेकून दिलेल्या चिमुकलीविषयीचे विचार पुसले जात नव्हते. मग त्यांनी लेखणी उचलली आणि
त्या आईलाच एक पत्र लिहिलं......उरिया भाषेत प्रसिद्ध झालेल्या त्या पत्राचा अनुवाद केला आहे कटक येथे राहणाऱ्या "राधा जोगळेकर" यांनी.
( सकाळ च्या सप्तरंग पुरवणीतून आज हे पत्र इथे पोस्ट करतांना फक्त हीच विनंती आहे कि हे पत्र कॉपी करून शक्य तितक्या लोकांपर्यंत email करून पोचवा....
हे वाचून एक जोडप्याचे जरी विचार बदलले तरी "सार्थक" झाले असे मी समजेन.....हे पत्र पोस्ट करायची हि जागा आहे का नाही मला माहित नाही...चुकल्यास क्षमा
असावी.
आणि पुन्हा एकदा हे पत्र शक्य तितक्या लोकांपर्यंत पोचवा हि विनंती. )
आई, असं का ग केलंस?
का ग, तुला माझी थोडीशीही आठवण येत नाही का? तू असं का केलंस?
मी तुला पाहण्यासाठी किती आशा लावून बसले होते; पण तू मला मारूनच टाकलस.
तुला माहित आहे का आई, मी फक्त तुलाच ओळखत होते. आणखी कोणाचा स्पर्शही नव्हता झाला मला.
माझ्या आयुष्यातल्या त्या चार महिन्यात मी जे काही अनुभवलं, ते फक्त तुझ्याचमुळे ग.
आई तुला आठवत का? माझा भाऊ राजा जेव्हा रडायचा, तेव्हा तू त्याला समजवायचीस, कि रडू नकोस.
आता तुला थोड्याच दिवसात तुझ्याशी खेळायला आणखी एक भाऊ येईल.
तेव्हा मी तुझ्या पोटात खळखळून हसायचे आणि म्हणायचे, 'आई भाऊ नाही.
राजाभाईची छोटी बहिण येणार आहे.
तू राजाभाईला कुशीत घेऊन झोपी जायचीस; पण मला मात्र रात्रभर झोप यायची नाही.
भाईबरोबर दंगामस्ती करण्याची, खेळण्याची मला खूप इच्छा व्हायची. मग पोटात असूनही मी त्याला
हळूच पायाने ढकलून द्यायचे. तोही झोपेतून जागा झाल्यावर तुझ्या पोटाला हाताने ढकलत असे. मला लागायचं.
तरीही खूप आनंद व्हायचा. का माहिती आहे? कारण बहिण-भावातल्या खेळाची मजा वेगळीच असते!
कधीतरी भाईला बर नसायचं, तेव्हा तू म्हणायचीस, 'हे माँ, माझ्या मुलांना सुखी ठेव.
ते ऐकून माझ्या लहान लहान डोळ्यात पाणी दाटून येई. वाटे, माझी आई किती चांगली आहे.
मुलांवर तिची किती माया आहे. तुझ्यामुळे मला समजल, कि आणखी एक मोठी आई, "माँ" आहे,
जी माझ्या आईला शक्ती देते. सामर्थ्य देते.
माझे हे चार महिने फक्त तुझा विचार करण्यात गेले. मनात सतत एकाच विचार असायचा, तुला बघण्याचा!
एकदा तू राजाभाईला म्हणत होतीस. माझ्या बाळा तुझ्यासाठी दहा महिने मी त्रास सोसल्यावर तुझा जन्म झाला.
मोठा झालास, की आईचं नाव उज्वल कर, वगैरे वगैरे.....
त्या दिवशी मला रडूच आलं. तू राजाभाईचे लाड करत होतीस म्हणून नाही, तर माझ्या आईला बघण्यासाठी मला अजून
सहा महिने वाट पहावी लागेल म्हणून.....
मग एक दिवशी तू आणि ते पप्पा नावाचे कोणीतरी डॉक्टरांकडे जाण्यासाठी बाहेर पडलात.
रस्त्यांमध्ये असताना मला खूप जोरात धक्का बसला. आतल्या आत बराच मार बसला. मग तू पप्पांना
गाडी हळू हळू चालवायला सांगितलस. बाळाला त्रास होईल म्हणालीस. तुला माझी किती काळजी वाटते,
हे पाहून मला किती बर वाटल होत.
दवाखान्यात तू झोपलीस, तेव्हा मी तुझ्या पोटात खेळत होते. तुझ्या पोटावर काहीतरी लावून डॉक्टर जेव्हा तपासात होते,
तेव्हा मला खोडसाळपण करण्याची खूप इच्छा झाली होती. मी पोटातल्या पोटात पटापट फिरत राहिले. म्हणून डॉक्टर म्हणाले,
"मुल खूप हालचाल करत आहे, त्यामुळे काही समजत नाही."
थोड्या वेळाने ते म्हणाले, की मुलगी आहे. त्यानंतर एकदम शांतता पसरली. मग तो पप्पा नावाचा माणूस म्हणाला,........
"सर, अबोर्शन करा..."
डॉक्टर म्हणाले "उद्या सकाळी या."
मी पोटामध्ये खिदळत होते.
दुसर्या दिवशी सकाळी देवाची पूजा करताना आई तू म्हणालीस, हे माँ, मला नीटपणे जाऊन सुखरूप घरी येऊ दे."
मला वाटल, की तुझी तब्येत बिघडली असावी, मी पण पाणावलेल्या डोळ्यांनी त्या मोठ्या आईला म्हणाले,
की माझ्या आईला लवकर बर कर....
नंतर.....नंतरच तुला माहीतच आहे....
आई, का ग मारलस मला? आई, तुला बघायचं होत ग डोळेभरून.
मी तुला पाहिल्यानंतर मला मारून टाकलं असतस तरी चालल असत मला.
आई मला पुन्हा एकदा तुझ्या गर्भात जागा दे. मला हे जग बघायचं आहे. मलाही शाळेत जायचं आहे.
राजाभाईसारखा " हेप्पी बर्थ डे" करायचा आहे. हसत खिदळत तुझ्यामागे धावायचं आहे.
आई, फक्त एकदाच मला कुशीत घेऊन माझे लाड कर ना ग....आणि फक्त एकदाच माझ्या कानाशी म्हण....
'झोप ग माझ्या लाडक्या बाळा, तुझी आई आहे ना जवळ...मग कशाला घाबरतेस....'
............ ....आई एकदाच...........फक्त एकदाच.........
(मनाला स्पर्शून गेलेले आईला लिहिलेले एक पत्र..)
उरिया भाषेतील लेखक...श्रीकांत पारिजा यांनी एकदा एक हत्या झालेला स्त्री गर्भ पाहिला. त्या क्षणी त्यांचा पोटात ढवळून आलं. काय करावं ते सुचेना.
त्यानंतरचे कित्येक दिवस त्यांच्या मनातून ते दृश्य आणि त्या अकाली फेकून दिलेल्या चिमुकलीविषयीचे विचार पुसले जात नव्हते. मग त्यांनी लेखणी उचलली आणि
त्या आईलाच एक पत्र लिहिलं......उरिया भाषेत प्रसिद्ध झालेल्या त्या पत्राचा अनुवाद केला आहे कटक येथे राहणाऱ्या "राधा जोगळेकर" यांनी.
( सकाळ च्या सप्तरंग पुरवणीतून आज हे पत्र इथे पोस्ट करतांना फक्त हीच विनंती आहे कि हे पत्र कॉपी करून शक्य तितक्या लोकांपर्यंत email करून पोचवा....
हे वाचून एक जोडप्याचे जरी विचार बदलले तरी "सार्थक" झाले असे मी समजेन.....हे पत्र पोस्ट करायची हि जागा आहे का नाही मला माहित नाही...चुकल्यास क्षमा
असावी.
आणि पुन्हा एकदा हे पत्र शक्य तितक्या लोकांपर्यंत पोचवा हि विनंती. )
आई, असं का ग केलंस?
का ग, तुला माझी थोडीशीही आठवण येत नाही का? तू असं का केलंस?
मी तुला पाहण्यासाठी किती आशा लावून बसले होते; पण तू मला मारूनच टाकलस.
तुला माहित आहे का आई, मी फक्त तुलाच ओळखत होते. आणखी कोणाचा स्पर्शही नव्हता झाला मला.
माझ्या आयुष्यातल्या त्या चार महिन्यात मी जे काही अनुभवलं, ते फक्त तुझ्याचमुळे ग.
आई तुला आठवत का? माझा भाऊ राजा जेव्हा रडायचा, तेव्हा तू त्याला समजवायचीस, कि रडू नकोस.
आता तुला थोड्याच दिवसात तुझ्याशी खेळायला आणखी एक भाऊ येईल.
तेव्हा मी तुझ्या पोटात खळखळून हसायचे आणि म्हणायचे, 'आई भाऊ नाही.
राजाभाईची छोटी बहिण येणार आहे.
तू राजाभाईला कुशीत घेऊन झोपी जायचीस; पण मला मात्र रात्रभर झोप यायची नाही.
भाईबरोबर दंगामस्ती करण्याची, खेळण्याची मला खूप इच्छा व्हायची. मग पोटात असूनही मी त्याला
हळूच पायाने ढकलून द्यायचे. तोही झोपेतून जागा झाल्यावर तुझ्या पोटाला हाताने ढकलत असे. मला लागायचं.
तरीही खूप आनंद व्हायचा. का माहिती आहे? कारण बहिण-भावातल्या खेळाची मजा वेगळीच असते!
कधीतरी भाईला बर नसायचं, तेव्हा तू म्हणायचीस, 'हे माँ, माझ्या मुलांना सुखी ठेव.
ते ऐकून माझ्या लहान लहान डोळ्यात पाणी दाटून येई. वाटे, माझी आई किती चांगली आहे.
मुलांवर तिची किती माया आहे. तुझ्यामुळे मला समजल, कि आणखी एक मोठी आई, "माँ" आहे,
जी माझ्या आईला शक्ती देते. सामर्थ्य देते.
माझे हे चार महिने फक्त तुझा विचार करण्यात गेले. मनात सतत एकाच विचार असायचा, तुला बघण्याचा!
एकदा तू राजाभाईला म्हणत होतीस. माझ्या बाळा तुझ्यासाठी दहा महिने मी त्रास सोसल्यावर तुझा जन्म झाला.
मोठा झालास, की आईचं नाव उज्वल कर, वगैरे वगैरे.....
त्या दिवशी मला रडूच आलं. तू राजाभाईचे लाड करत होतीस म्हणून नाही, तर माझ्या आईला बघण्यासाठी मला अजून
सहा महिने वाट पहावी लागेल म्हणून.....
मग एक दिवशी तू आणि ते पप्पा नावाचे कोणीतरी डॉक्टरांकडे जाण्यासाठी बाहेर पडलात.
रस्त्यांमध्ये असताना मला खूप जोरात धक्का बसला. आतल्या आत बराच मार बसला. मग तू पप्पांना
गाडी हळू हळू चालवायला सांगितलस. बाळाला त्रास होईल म्हणालीस. तुला माझी किती काळजी वाटते,
हे पाहून मला किती बर वाटल होत.
दवाखान्यात तू झोपलीस, तेव्हा मी तुझ्या पोटात खेळत होते. तुझ्या पोटावर काहीतरी लावून डॉक्टर जेव्हा तपासात होते,
तेव्हा मला खोडसाळपण करण्याची खूप इच्छा झाली होती. मी पोटातल्या पोटात पटापट फिरत राहिले. म्हणून डॉक्टर म्हणाले,
"मुल खूप हालचाल करत आहे, त्यामुळे काही समजत नाही."
थोड्या वेळाने ते म्हणाले, की मुलगी आहे. त्यानंतर एकदम शांतता पसरली. मग तो पप्पा नावाचा माणूस म्हणाला,........
"सर, अबोर्शन करा..."
डॉक्टर म्हणाले "उद्या सकाळी या."
मी पोटामध्ये खिदळत होते.
दुसर्या दिवशी सकाळी देवाची पूजा करताना आई तू म्हणालीस, हे माँ, मला नीटपणे जाऊन सुखरूप घरी येऊ दे."
मला वाटल, की तुझी तब्येत बिघडली असावी, मी पण पाणावलेल्या डोळ्यांनी त्या मोठ्या आईला म्हणाले,
की माझ्या आईला लवकर बर कर....
नंतर.....नंतरच तुला माहीतच आहे....
आई, का ग मारलस मला? आई, तुला बघायचं होत ग डोळेभरून.
मी तुला पाहिल्यानंतर मला मारून टाकलं असतस तरी चालल असत मला.
आई मला पुन्हा एकदा तुझ्या गर्भात जागा दे. मला हे जग बघायचं आहे. मलाही शाळेत जायचं आहे.
राजाभाईसारखा " हेप्पी बर्थ डे" करायचा आहे. हसत खिदळत तुझ्यामागे धावायचं आहे.
आई, फक्त एकदाच मला कुशीत घेऊन माझे लाड कर ना ग....आणि फक्त एकदाच माझ्या कानाशी म्हण....
'झोप ग माझ्या लाडक्या बाळा, तुझी आई आहे ना जवळ...मग कशाला घाबरतेस....'
............ ....आई एकदाच...........फक्त एकदाच.........
महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय
महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय
महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय , जय जय राष्ट्र महान
महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय , माझे राष्ट्र महान
कोटी कोटी प्राणांत उसळतो एक तुझा अभिमान
बलिदाने इतिहास रंगला तुझाच पानोपान
तूच ठेविले स्वातंत्र्याचे फडकत उंच निशाण
तू संतांची , मतिमंतांची , बलवंतांची खाण
तूच ठेविला कर्मयोगमय जागृत यज्ञ महान
मातीच्या चित्रात ओतले विजयवंत तू प्राण
मराठमोळी वाणी वर्णी वेदांताचे ज्ञान
पंढरीत नांदले अखंडित भक्तीचे जयगान
ब्रीद न सुटले झुंझारांचे रणी होता निर्वाण
वज्रापुढती अभंग ठरले तुझेच ना पाषाण !
काळालाही जिंकून गेले इथले प्रज्ञावान
मानवतेचे समतेचे तू एकच आशास्थान
पराक्रमावर तुझ्या विसंबे अखंड हिंदुस्थान
* कवी - चकोर आजगावकर * संगीतकार - श्रीनिवास खळे
* मूळ गायक -शाहीर साबळे व समूह
महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय , जय जय राष्ट्र महान
महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय , माझे राष्ट्र महान
कोटी कोटी प्राणांत उसळतो एक तुझा अभिमान
बलिदाने इतिहास रंगला तुझाच पानोपान
तूच ठेविले स्वातंत्र्याचे फडकत उंच निशाण
तू संतांची , मतिमंतांची , बलवंतांची खाण
तूच ठेविला कर्मयोगमय जागृत यज्ञ महान
मातीच्या चित्रात ओतले विजयवंत तू प्राण
मराठमोळी वाणी वर्णी वेदांताचे ज्ञान
पंढरीत नांदले अखंडित भक्तीचे जयगान
ब्रीद न सुटले झुंझारांचे रणी होता निर्वाण
वज्रापुढती अभंग ठरले तुझेच ना पाषाण !
काळालाही जिंकून गेले इथले प्रज्ञावान
मानवतेचे समतेचे तू एकच आशास्थान
पराक्रमावर तुझ्या विसंबे अखंड हिंदुस्थान
* कवी - चकोर आजगावकर * संगीतकार - श्रीनिवास खळे
* मूळ गायक -शाहीर साबळे व समूह
कट्टा ...
आमचा कट्टा म्हणजे
आमचा जिवकी प्राण
तिथे गेलो कि विसरतो
दिवसभरचा त्राण!!
कट्ट्यावर बसून आम्ही
चव्हाट्या मारत बसतो
पोरीना पाहण्याशिवाय
आम्हाला दुसरा धंदा नसतो!!
दिसलीच छान दिसणारी
नझर सगळ्यांची तिकडेच वळणार
ती जास्तोपर्यंत २ मिनिट
वातावरणात एकदम शांतता पसरणार!!
एकमेकांना चिडवण्यातच
आमची संध्याकाळ होते
पार्टीच नाव काढताच
पैशाची जमवाजमव होऊ लागते!!
कुठे लफडा व्हायची खोटी
कट्ट्यावर सगळी पोर हझर
फटकवयाचा ठरवलं तर
ठेवलीच त्याच्यावर नझर!!
मग तर कुणाच्या बापालापण
आम्ही जुमानत नाही
आमदाराच्या पार्टीऑफिसची पण
मग मुलाहिजा बाळगत नाही!!
कसलीपण मदत असो
आम्ही मिळून करत असतो
पैशाची अडचण, शब्दांचा आधार
एकमेकांना पुरवत असतो!!
गणेशोत्सव असो वा होळी
कट्ट्याशिवाय पान गळत नाही
कसल्यापण एरियातला भाई असो
आमच्या सेक्टर मध्ये वळत नाही!!
तरी आमचेच पालक कट्ट्याला
शिव्या घालत बसतात
गेलो थोडा वेळ तरी
आमच्या नावाने खडे फोडतात!!
आमचा जिवकी प्राण
तिथे गेलो कि विसरतो
दिवसभरचा त्राण!!
कट्ट्यावर बसून आम्ही
चव्हाट्या मारत बसतो
पोरीना पाहण्याशिवाय
आम्हाला दुसरा धंदा नसतो!!
दिसलीच छान दिसणारी
नझर सगळ्यांची तिकडेच वळणार
ती जास्तोपर्यंत २ मिनिट
वातावरणात एकदम शांतता पसरणार!!
एकमेकांना चिडवण्यातच
आमची संध्याकाळ होते
पार्टीच नाव काढताच
पैशाची जमवाजमव होऊ लागते!!
कुठे लफडा व्हायची खोटी
कट्ट्यावर सगळी पोर हझर
फटकवयाचा ठरवलं तर
ठेवलीच त्याच्यावर नझर!!
मग तर कुणाच्या बापालापण
आम्ही जुमानत नाही
आमदाराच्या पार्टीऑफिसची पण
मग मुलाहिजा बाळगत नाही!!
कसलीपण मदत असो
आम्ही मिळून करत असतो
पैशाची अडचण, शब्दांचा आधार
एकमेकांना पुरवत असतो!!
गणेशोत्सव असो वा होळी
कट्ट्याशिवाय पान गळत नाही
कसल्यापण एरियातला भाई असो
आमच्या सेक्टर मध्ये वळत नाही!!
तरी आमचेच पालक कट्ट्याला
शिव्या घालत बसतात
गेलो थोडा वेळ तरी
आमच्या नावाने खडे फोडतात!!
मैत्री ..
जीवन म्हणजे अलुच्या पानावरील दवबिंदु
टिकला तर मोती नाहीतर माती
तुझ जीवन नेहमी मोती असू दे
आणि हा मोती सदैव आपल्या
आठवनिच्या आणि मैत्रीच्या शिम्प्ल्यात वसु दे.....
रक्ताची नाती जन्माने मिळतात
मानलेली नाती मनाने जुळतात
पण नाती नसतानाही जे बांध जुळतात
त्या बंधाना "मैत्री" म्हणतात
पावसातून जेवढा ओलावा मिळत नाही
तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो
मैत्रिमधल्या सावलीचा अर्थ
कधीतरी उन्हातुन गेल्यावर कळतो
माणुस सर्वश्रेष्ठ प्राणी आहे;
परन्तु तो गवताहून दुर्बल आहे
आपण सारेच भंगलेल्या मूर्तीचे अवशेष आहोत
तरी परस्पर विश्वासाच्या चिवट धाग्यांनी
मैत्रीचे जरतारी वस्त्र विणले आहे
एखादा धागा जरी जरासा उसवला तर
जगण्यातील स्वारस्य निघून जाते....
टिकला तर मोती नाहीतर माती
तुझ जीवन नेहमी मोती असू दे
आणि हा मोती सदैव आपल्या
आठवनिच्या आणि मैत्रीच्या शिम्प्ल्यात वसु दे.....
रक्ताची नाती जन्माने मिळतात
मानलेली नाती मनाने जुळतात
पण नाती नसतानाही जे बांध जुळतात
त्या बंधाना "मैत्री" म्हणतात
पावसातून जेवढा ओलावा मिळत नाही
तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो
मैत्रिमधल्या सावलीचा अर्थ
कधीतरी उन्हातुन गेल्यावर कळतो
माणुस सर्वश्रेष्ठ प्राणी आहे;
परन्तु तो गवताहून दुर्बल आहे
आपण सारेच भंगलेल्या मूर्तीचे अवशेष आहोत
तरी परस्पर विश्वासाच्या चिवट धाग्यांनी
मैत्रीचे जरतारी वस्त्र विणले आहे
एखादा धागा जरी जरासा उसवला तर
जगण्यातील स्वारस्य निघून जाते....
मंगल देशा , पवित्रा देशा , महाराष्ट्र देशा
मंगल देशा , पवित्रा देशा , महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
राकट देशा , कणखर देशा , दगडांच्या देशा
नाजुक देशा , कोमल देशा , फुलांच्याहि देशा
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा
भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा
शाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा
ध्येय जे तुझ्या अंतरी , निशाणावरी , नाचते करी ;
जोडी इह पर लोकांसी , व्यवहारा परमार्थासी ,
वैभवासि , वैराग्यासी
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥१॥
अपार सिंधुच्या भव्य बांधवा , महाराष्ट्र देशा
सह्याद्रीच्या सख्या , जिवलगा , महाराष्ट्र देशा
पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा
गोदा , कृष्णा , भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा
तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची
मंगल वसती जनस्थानिंची श्रीरघुनाथांची
ध्येय जे तुझ्या अंतरी ..... ॥२॥
कवी -गोविंदाग्रज
संगीतकार - वसंत देसाई
मूळ गायक - जयवंत कुलकर्णी व समूह
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
राकट देशा , कणखर देशा , दगडांच्या देशा
नाजुक देशा , कोमल देशा , फुलांच्याहि देशा
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा
भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा
शाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा
ध्येय जे तुझ्या अंतरी , निशाणावरी , नाचते करी ;
जोडी इह पर लोकांसी , व्यवहारा परमार्थासी ,
वैभवासि , वैराग्यासी
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥१॥
अपार सिंधुच्या भव्य बांधवा , महाराष्ट्र देशा
सह्याद्रीच्या सख्या , जिवलगा , महाराष्ट्र देशा
पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा
गोदा , कृष्णा , भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा
तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची
मंगल वसती जनस्थानिंची श्रीरघुनाथांची
ध्येय जे तुझ्या अंतरी ..... ॥२॥
कवी -गोविंदाग्रज
संगीतकार - वसंत देसाई
मूळ गायक - जयवंत कुलकर्णी व समूह
वाढदिवस….
वाढदिवसांची कैक अर्थानं उपयूक्तता असते
ज्याचा जास्त साजरा झाला तितका माणूस
अधिक वर्ष जगला असं गणित सांगते
सुर्यप्रदक्षिणेच्या सहलीचा पहिला दिवस,
तसं म्हणायला ३६५ दिवसांची वारी असते
आतापर्यंत सरलेल्या संपूर्ण आयूष्याचा
ताळेबंद जमाखर्च मांडण्यातच रात्र सरते
नकळत निसटलेले सुख-दुःखाचे क्षण
वेचता वेचता अगदी पुरेवाट होत असते
आयूष्याचा प्याला अर्धा रिकामा म्हणावा
कि भरलेला अशी संभ्रमावस्था असते.
जीवनाची पोथी खूप वाचून झालेली असते
आता थोडीशीच राहिली, विचार मनी येताच
दोन्हीही डोळ्यांची कडा ओली झालेली असते
आपल्या नजरेत आणखी वयं वाढलेले असते
नियती मात्र राहिलेली वर्ष कमी करत असते
एखाद्या चोरासारखी हळूच डेरेदार वृक्षाची
एकेक बहरलेली फ़ांदी तोडून नेत असते
आयूष्याच्या ग्रंथाला कडू-गोड अनुभवांचे
आणखी एक सोनेरी पान जोडलेले असते
विनाकारण मग पोक्तपणाची भावना बळावत असते
ललाटीचे प्राक्तन जसे आनंदावरचे विरजण असते
अशावेळी आजच्या वयाला दोनानं भागायचे असते
म्हणजे एकाच वेळी दोन लहान मुलं अन एका मोठ्या
व्यक्तीसारखं बिनदिक्कत वागायला काहीच अडचण नसते
हात सुटले तरी मैत्रीची कास सोडायची नसते.
गेलंच सोडून कूणी, हृदय अवजड करायचे नसते ———–
ज्याचा जास्त साजरा झाला तितका माणूस
अधिक वर्ष जगला असं गणित सांगते
सुर्यप्रदक्षिणेच्या सहलीचा पहिला दिवस,
तसं म्हणायला ३६५ दिवसांची वारी असते
आतापर्यंत सरलेल्या संपूर्ण आयूष्याचा
ताळेबंद जमाखर्च मांडण्यातच रात्र सरते
नकळत निसटलेले सुख-दुःखाचे क्षण
वेचता वेचता अगदी पुरेवाट होत असते
आयूष्याचा प्याला अर्धा रिकामा म्हणावा
कि भरलेला अशी संभ्रमावस्था असते.
जीवनाची पोथी खूप वाचून झालेली असते
आता थोडीशीच राहिली, विचार मनी येताच
दोन्हीही डोळ्यांची कडा ओली झालेली असते
आपल्या नजरेत आणखी वयं वाढलेले असते
नियती मात्र राहिलेली वर्ष कमी करत असते
एखाद्या चोरासारखी हळूच डेरेदार वृक्षाची
एकेक बहरलेली फ़ांदी तोडून नेत असते
आयूष्याच्या ग्रंथाला कडू-गोड अनुभवांचे
आणखी एक सोनेरी पान जोडलेले असते
विनाकारण मग पोक्तपणाची भावना बळावत असते
ललाटीचे प्राक्तन जसे आनंदावरचे विरजण असते
अशावेळी आजच्या वयाला दोनानं भागायचे असते
म्हणजे एकाच वेळी दोन लहान मुलं अन एका मोठ्या
व्यक्तीसारखं बिनदिक्कत वागायला काहीच अडचण नसते
हात सुटले तरी मैत्रीची कास सोडायची नसते.
गेलंच सोडून कूणी, हृदय अवजड करायचे नसते ———–
बहु असोत सुंदर संपन्न की महा
बहु असोत सुंदर संपन्न की महा
बहु असोत सुंदर संपन्न की महा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ॥ धृ ॥
गगनभेदी गिरिविण अणू न च जिथे उणे
आकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे
अटकेवर जेथील तुरंगी जल पिणे
तेथ अडे काय जलाशया ना दावीणे
पौरुष्यासी अटक गमे जेथ दुःसहा ॥ १ ॥
विलम वैराग्य एक जागी नारती ??
जरी पटका भगवा झेंडाही डोलती
धर्म राजकारण एक समवेत चालती
शक्ति युक्ति एकवटुनी कार्य साधती
पसरे या कीर्ति अशी विस्मया वहा ॥ २ ॥
गीत मराठ्यांचे श्रवणी , मुखी असो
स्फूर्ति रिती धृति ही देत अंतरी ठसो
वचनी लेखनी ही मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो
देह पडॊ सकारणी ही असे स्पृहा ॥ ३ ॥
कवि - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
संगीत - शंकरराव व्यास
बहु असोत सुंदर संपन्न की महा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ॥ धृ ॥
गगनभेदी गिरिविण अणू न च जिथे उणे
आकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे
अटकेवर जेथील तुरंगी जल पिणे
तेथ अडे काय जलाशया ना दावीणे
पौरुष्यासी अटक गमे जेथ दुःसहा ॥ १ ॥
विलम वैराग्य एक जागी नारती ??
जरी पटका भगवा झेंडाही डोलती
धर्म राजकारण एक समवेत चालती
शक्ति युक्ति एकवटुनी कार्य साधती
पसरे या कीर्ति अशी विस्मया वहा ॥ २ ॥
गीत मराठ्यांचे श्रवणी , मुखी असो
स्फूर्ति रिती धृति ही देत अंतरी ठसो
वचनी लेखनी ही मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो
देह पडॊ सकारणी ही असे स्पृहा ॥ ३ ॥
कवि - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
संगीत - शंकरराव व्यास
दुःख
मलाच माहित नसलेल एक दुःख
मनात आहे साठून,
बरेचदा मी विचार करतो कि नक्की हे
उगवत तरी कोठून,
मग एक नवा खेळ होतो सुरु,
मी म्हणतो मनाला
"चल ह्या चोराचा पाठलाग करु"
मागे मागे मी आणि पुढे पुढे मन धावत,
शेवटी काही वेगळ नाही
तुझ्याच दाराशी जाउन थांबत...
मनात आहे साठून,
बरेचदा मी विचार करतो कि नक्की हे
उगवत तरी कोठून,
मग एक नवा खेळ होतो सुरु,
मी म्हणतो मनाला
"चल ह्या चोराचा पाठलाग करु"
मागे मागे मी आणि पुढे पुढे मन धावत,
शेवटी काही वेगळ नाही
तुझ्याच दाराशी जाउन थांबत...
शेवटची निघून जाताना
तू निघून चाललीयेस कायमची हे कळल्यावर
अचानक लक्षात येतंय
तुझ्यावर लिहिणार होतो मी एक प्रेमकविता
तुझ्या नुस्त्या आसपास असण्यादिसण्यानेच जणू
आपोआप उमटत जातील ओळी कुठल्यातरी कागदावर
इतके माझे डोळे तुझे झाले होते
पण मधल्या काळात या शहराने
कुठलं तरी ट्रॅफिक जॅम , कुठलं तरी प्रदूषण ,
कुठला तरी कल्लोळ सोडला होता आपल्या दोघांमधे आता
तुला शेवटचं पाहताना बघ कशी स्लोमोशन झालीये गदीर्
तुझ्या हसण्याच्या उंच पुलावरून दिसतायत मला खाली
तरंगत चाललेली हजारो माणसं
डोक्यावर चंपाचमेलीमोगरागुलाब उगवलेली
साऱ्या मोटारी उडू लागल्यात फुलपाखरं होऊन
स्कुटरी गुणगुणू लागल्यात भुंग्यांसारख्या
सायकली चाल्ताहेत आपोआप
कुणीतरी अदृश्य माणूस नुक्ताच सायकल शिकल्यासारख्या
रस्त्याच्या फांद्यांना रिक्शा लटकल्यात मधमाशांच्या पोळ्यांसारख्या
रेल्वेगाड्या यार्डातल्या वारुळांतून
कात टाकून बाहेर पडल्यात लखलख
आपण धावत सुटलो आहोत एका वेगळ्याच प्रवासाला
हे ठाऊक असल्यागत बसेस थांबून राहिल्यात सिग्नल्सवर
आपलीच वाट पाहात
आपण कफल्लक झालो आहोत पुरते हे कळल्यासारखे
वाटेवरचे सारे भिकारी
उधळत सुटलेत ओंजळींनी हवेत त्यांचे सारे सुटे पैसे
आणि नाण्यांच्या त्या अलगद पावसातून
आपण निघालो आहोत एकमेकांना बिलगून
बेफिकिरीच्या एकाच छत्रीखालून
आपल्याला खात्रीच आहे
जणू कंडक्टर आपल्याला सोडेल फुकट कुठवरही
आणि आता निर्वाणीच्या या क्षणी
तू भिजून उभी आहेस माझ्यात चिंब
आणि माझ्या डोळ्यात तुझंच प्रतिबिंब
एकमेकांचा हात सोडून
आपण आयुष्याच्या या सर्वात उंच कड्यावर उभे आहोत
झोकून द्यायला संपवायला सगळंच तुझ्यामाझ्यातलं
पण
एक तुझ्या लक्षात येतंय का... ?
झोकून देण्याआधीच
आपण ' पुन्हा ' तरंगायला लागलो आहोत
- सौमित्र
अचानक लक्षात येतंय
तुझ्यावर लिहिणार होतो मी एक प्रेमकविता
तुझ्या नुस्त्या आसपास असण्यादिसण्यानेच जणू
आपोआप उमटत जातील ओळी कुठल्यातरी कागदावर
इतके माझे डोळे तुझे झाले होते
पण मधल्या काळात या शहराने
कुठलं तरी ट्रॅफिक जॅम , कुठलं तरी प्रदूषण ,
कुठला तरी कल्लोळ सोडला होता आपल्या दोघांमधे आता
तुला शेवटचं पाहताना बघ कशी स्लोमोशन झालीये गदीर्
तुझ्या हसण्याच्या उंच पुलावरून दिसतायत मला खाली
तरंगत चाललेली हजारो माणसं
डोक्यावर चंपाचमेलीमोगरागुलाब उगवलेली
साऱ्या मोटारी उडू लागल्यात फुलपाखरं होऊन
स्कुटरी गुणगुणू लागल्यात भुंग्यांसारख्या
सायकली चाल्ताहेत आपोआप
कुणीतरी अदृश्य माणूस नुक्ताच सायकल शिकल्यासारख्या
रस्त्याच्या फांद्यांना रिक्शा लटकल्यात मधमाशांच्या पोळ्यांसारख्या
रेल्वेगाड्या यार्डातल्या वारुळांतून
कात टाकून बाहेर पडल्यात लखलख
आपण धावत सुटलो आहोत एका वेगळ्याच प्रवासाला
हे ठाऊक असल्यागत बसेस थांबून राहिल्यात सिग्नल्सवर
आपलीच वाट पाहात
आपण कफल्लक झालो आहोत पुरते हे कळल्यासारखे
वाटेवरचे सारे भिकारी
उधळत सुटलेत ओंजळींनी हवेत त्यांचे सारे सुटे पैसे
आणि नाण्यांच्या त्या अलगद पावसातून
आपण निघालो आहोत एकमेकांना बिलगून
बेफिकिरीच्या एकाच छत्रीखालून
आपल्याला खात्रीच आहे
जणू कंडक्टर आपल्याला सोडेल फुकट कुठवरही
आणि आता निर्वाणीच्या या क्षणी
तू भिजून उभी आहेस माझ्यात चिंब
आणि माझ्या डोळ्यात तुझंच प्रतिबिंब
एकमेकांचा हात सोडून
आपण आयुष्याच्या या सर्वात उंच कड्यावर उभे आहोत
झोकून द्यायला संपवायला सगळंच तुझ्यामाझ्यातलं
पण
एक तुझ्या लक्षात येतंय का... ?
झोकून देण्याआधीच
आपण ' पुन्हा ' तरंगायला लागलो आहोत
- सौमित्र
कॉलेज
कॉलेज
Syllybus जरा जास्तच आहे
दर वर्षी वाटतो...
Chapters पाहून Passing चा
Problem मनात दाटतो...
तरी lectures चालू राहतात
डोक्यात काही घुसत नहीं....
चित्र-विचित्र figures शिवाय
Board वर काहीच दिसत नाही....
तितक्यात कुठून तरी Function ची
Date जवळ येते...
Sem मधले काही दिवस
नकळत चोरून नेते...
नंतर lecturers Extra घेउन
भरभरा शिकवत राहतात...
Problems Example Theory सांगून
Syllybus लवकर संपवू पाहतात...
पुन्हा हात चालू लागतात...
मन चालत नाही....
सरांशिवाय वर्गामध्ये
कुणीच बोलत नाही...
Lectures संपून Submission चा
सुरु होतो पुन्हा खेळ..
journal Complete करण्यामध्ये
फार फार जातो वेळ...
चक्क डोळ्यांसमोर Syllybus
चुटकी सरशी sampun जातो..
'PL's मध्ये वाचून सुद्धा
Paper काबर सो...सो..च जातो?????
Syllybus जरा जास्तच आहे
दर वर्षी वाटतो...
Chapters पाहून Passing चा
Problem मनात दाटतो...
तरी lectures चालू राहतात
डोक्यात काही घुसत नहीं....
चित्र-विचित्र figures शिवाय
Board वर काहीच दिसत नाही....
तितक्यात कुठून तरी Function ची
Date जवळ येते...
Sem मधले काही दिवस
नकळत चोरून नेते...
नंतर lecturers Extra घेउन
भरभरा शिकवत राहतात...
Problems Example Theory सांगून
Syllybus लवकर संपवू पाहतात...
पुन्हा हात चालू लागतात...
मन चालत नाही....
सरांशिवाय वर्गामध्ये
कुणीच बोलत नाही...
Lectures संपून Submission चा
सुरु होतो पुन्हा खेळ..
journal Complete करण्यामध्ये
फार फार जातो वेळ...
चक्क डोळ्यांसमोर Syllybus
चुटकी सरशी sampun जातो..
'PL's मध्ये वाचून सुद्धा
Paper काबर सो...सो..च जातो?????
काँलेज
काँलेज म्हणजे तरुणाइचं
गाव असत...
प्रत्येक तरुणांच्या मनात
कोरलेलं एक नाव असत...
हेच गाव कधीतरी
जाग होत..
आठवणीँच्या हिदोँळ्यावर
झेपु पाहत..
काँलेजच्या कट्यावरुन रोज
हिरवळ जायची..
ती पाहण्यासाठी पोरांची
चंगळ मग उडायची..
लायब्ररीमध्ये अभ्यास करायची
फक्त एक ट्रीक होती..
शांततेत नजर मिळवीण्याची ती
एक टेकनीक होती..
Phy. चे सर शिकवायचे
Law न्युटनचे..
इकडे मुलांचे
खेळ.., फुल्ली गोट्यांचे...!
केमिट्रीच्या प्राकटीकलला
मुलीँचाच Basis...
कोण करतय मग
Qualitative analesis...!
I.T शिकवायला एक
मिस होती..
सर म्हणायचे आमच्या
काँलेजमध्ये तीच एक पिस होती..
ENG. च्या मँडमची होती
वेगळीच अदा..
आणि PHY. शिक्षक तीच्या
भुगोलावर फिदा...
वर्गात असली 40 कार्टी
तरी हजेरी 80 ची लागयची..
मित्रांची मित्रता यातुनच
तर दिसुन यायची..!
EXAM hall l ची सेटिँग
आम्हीच करायचो..
त्यातुनच तर मार्काँची,
बेरीज आम्ही करायचो...
काँलेच्या आठवणिँना
शब्द अपुरे पडतात..
पण त्याच आठवणीँनी
आता.., डोळे मात्र पाणवतात...!
गाव असत...
प्रत्येक तरुणांच्या मनात
कोरलेलं एक नाव असत...
हेच गाव कधीतरी
जाग होत..
आठवणीँच्या हिदोँळ्यावर
झेपु पाहत..
काँलेजच्या कट्यावरुन रोज
हिरवळ जायची..
ती पाहण्यासाठी पोरांची
चंगळ मग उडायची..
लायब्ररीमध्ये अभ्यास करायची
फक्त एक ट्रीक होती..
शांततेत नजर मिळवीण्याची ती
एक टेकनीक होती..
Phy. चे सर शिकवायचे
Law न्युटनचे..
इकडे मुलांचे
खेळ.., फुल्ली गोट्यांचे...!
केमिट्रीच्या प्राकटीकलला
मुलीँचाच Basis...
कोण करतय मग
Qualitative analesis...!
I.T शिकवायला एक
मिस होती..
सर म्हणायचे आमच्या
काँलेजमध्ये तीच एक पिस होती..
ENG. च्या मँडमची होती
वेगळीच अदा..
आणि PHY. शिक्षक तीच्या
भुगोलावर फिदा...
वर्गात असली 40 कार्टी
तरी हजेरी 80 ची लागयची..
मित्रांची मित्रता यातुनच
तर दिसुन यायची..!
EXAM hall l ची सेटिँग
आम्हीच करायचो..
त्यातुनच तर मार्काँची,
बेरीज आम्ही करायचो...
काँलेच्या आठवणिँना
शब्द अपुरे पडतात..
पण त्याच आठवणीँनी
आता.., डोळे मात्र पाणवतात...!
Subscribe to:
Posts (Atom)