तिच्या काजळ नेत्रांची
नाही उगवली रात्र
तिच्या अधि-या ओठांनी
नाही बहकले गात्र
तिच्या स्वप्नांचे रुपेरी
नाही मेघ पालवले
जागेपणीच्या उन्हात
कसे रडू कोसळले.
तिच्या कुशीतला चंद्र
कुठे ढगाआड गेला
अर्धा सोडूनिया डाव,
कसा अर्ध्यात भागला.
तिच्या मिठीतले सुख
आता छातीत रुतते
डोळ्यांमधले पाणी
डोळ्यांमधेच सुकते…!
आयुष्यात प्रेम करायचय मला …
दूर कुठेतरी समुद्रकिनारी
हातात हात घालुन बसायचय मला,
आकाशातील तारकांकडे बघताना
भविष्याचे हितगुज करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला …
माझ्या मांडीत डोक ठेऊन
तिला झोपी गेलेल पहायचय मला,
तिच्या शांत चेहेऱ्याकडे पहाताना
स्वतःशी स्मित करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला …
तिच्यासोबत थोड दुष्टपणे वागुन
तिला रागाने लालबुंद करायचय मला
तिची आसवें पुसता पुसता पटकन मिठीत घ्यायचय तिला
आयुष्यात प्रेम करायचय मला …
आयुष्यातील तिचा हिमालय
तिच्या बरोबरीने चढायचाय मला
शिखरावर पोहोचताना माझ्या सोबतीच आनंद
तिच्या डोळ्यातुन व्यक्त झालेला अनुभवायचाय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला …
ति माझ्यापासुन दुर जात असताना
विरहाच्या कल्पनेने खिन्न व्हायचय मला
ति नसल्यामुळे होणाऱ्या वेदनांना
डोळ्यावाटे मुक्त करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला …
तिच्यसोबतचे माझे आयुष्य
झऱ्याप्रमाणे अवखळ जगायचय मला
पुन्हा जन्मेन तर जिच्यासाठी
तिचा चेहेरा पहात जायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला …
कधी कधी....
वाटतं कधी कधी मलाही
मन मोकळं करावं
बंधनाचे पाश तोडून
लांब कुठे उडून जावं…….
वाटतं कधी कधी मलाही
कोणावर प्रेम करावं
समोरच्याला सगळं देऊन
आपण मात्र रीतं व्हावं……….
वाटतं कधी कधी मलाही
कोणालातरी जिंकावं
लटका राग,गालावर हसू
आणि डोळ्यातच त्या हरवावं……..
वाटतं कधी कधी मलाही
कळी सारखं खुलावं
फुलाच्या त्या सुगंधाने
मन कोणाचं मोहरावं………
वाटतं कधी कधी मलाही
येत्या पावसात भिजावं
थेंबांच्या त्या साक्षीनेच
कुणीतरी आपलं वाटावं………
वाईट तुला वाटणार नाही ना?
वाईट तुला वाटणार नाही ना?
मी प्रेम केलं तुझ्यावर तर, वाईट तुला वाटणार नाही ना?
झालो वेडा तुझ्याचसाठी तर, वाईट तुला वाटणार नाही ना?
जाणीव तुझ्या मनाची, आहे मजला तरीही;
कास प्रेमाची धरली तर, वाईट तुला वाटणार नाही ना?
माझ्या भावनेचीही कधी, करुन बघ तू किंमत;
अनमोल जर ती ठरली तर, वाईट तुला वाटणार नाही ना?
राहूदे प्रारब्ध, क्षणभर तरी बाजुला;
आस तुझीच धरली तर, वाईट तुला वाटणार नाही ना?
तुझ्या आयुष्याचा निर्णय, सर्वस्वी तुझाच आहे;
पण वाट तुझी मी पाहीली तर, वाईट तुला वाटणार नाही ना?
मी प्रेम केलं तुझ्यावर तर, वाईट तुला वाटणार नाही ना?
झालो वेडा तुझ्याचसाठी तर, वाईट तुला वाटणार नाही ना?
जाणीव तुझ्या मनाची, आहे मजला तरीही;
कास प्रेमाची धरली तर, वाईट तुला वाटणार नाही ना?
माझ्या भावनेचीही कधी, करुन बघ तू किंमत;
अनमोल जर ती ठरली तर, वाईट तुला वाटणार नाही ना?
राहूदे प्रारब्ध, क्षणभर तरी बाजुला;
आस तुझीच धरली तर, वाईट तुला वाटणार नाही ना?
तुझ्या आयुष्याचा निर्णय, सर्वस्वी तुझाच आहे;
पण वाट तुझी मी पाहीली तर, वाईट तुला वाटणार नाही ना?
मी तूझा कोण आहे?
सगळीच नाती जगाच्या
नजरेतून पहायची नसतात
मग त्यात आपलं असं
काहीच उरत नाही
तुझं नी माझं नातं
ही असंच आहे
स्नेहाच्या नाजूक
धाग्यात गुंफ़लेलं
या नात्याला तू
नावात गुंतवू नकोस
कारण इथंवरच
नाती संपत नसतात
मी तूझा कोण आहे?
या प्रश्नाला जरी
उत्तर नसलं तरी
तू माझी आहेस
इतकंच पुरेसं नाही का? —–
टपरी
टपरी
सन्ध्याकाळची वेळ, सगळे जमायचो,
काँलेज सुटलेकी इकडेच यायचो,
वरती छत नाही, फ़टक्या भीन्ति, दोन चार तुटक्या बाकडी,
अश्या तुटक्या फ़ुटक्या विसाव्याच्या जागेला अम्ही ‘टपरी’ म्हणायचो.
पास, नापास तर कधि अभ्यासाला न्याय,
शेरो शयरी टवाळक्या तर कधी प्रेमचे अध्याय,
ह्या सगळ्या गोष्टिऩ्वर एकच उपाय,
सिगारेट का धुआ और उधार की चाय.
मुव्हि, नाटक, पिकनिकचे तर प्ल्यान बनवीले डिस्कोथेकचे,
कधि बर्थडे बम्प्चे तर अस्वाद घेतले कधि केकचे,
इथेच पराक्रम केलेत आम्ही पोरगी पटविण्याचे,
तर भान्डणात नकाशेही बदलीविलेत अनेकान्चे.
उन्हाळे, पावसळे,हिवाळे गेले,
आणी टपरी प्रेम आमचे वाढतच गेले,
पण एक दिवस टपरी सोडावी लागेल,
या विचाराने मन रडू लागले.
वेळ बदलला काळ बदलला, मीत्रान्चा आता साथ सुटला,
मनात इथली फ़क्त आठवण आहे,
आम्ही नसलो तरी काय झाले,
टपरी अजुणही तशीच सदाबहार आहे.
सन्ध्याकाळची वेळ, सगळे जमायचो,
काँलेज सुटलेकी इकडेच यायचो,
वरती छत नाही, फ़टक्या भीन्ति, दोन चार तुटक्या बाकडी,
अश्या तुटक्या फ़ुटक्या विसाव्याच्या जागेला अम्ही ‘टपरी’ म्हणायचो.
पास, नापास तर कधि अभ्यासाला न्याय,
शेरो शयरी टवाळक्या तर कधी प्रेमचे अध्याय,
ह्या सगळ्या गोष्टिऩ्वर एकच उपाय,
सिगारेट का धुआ और उधार की चाय.
मुव्हि, नाटक, पिकनिकचे तर प्ल्यान बनवीले डिस्कोथेकचे,
कधि बर्थडे बम्प्चे तर अस्वाद घेतले कधि केकचे,
इथेच पराक्रम केलेत आम्ही पोरगी पटविण्याचे,
तर भान्डणात नकाशेही बदलीविलेत अनेकान्चे.
उन्हाळे, पावसळे,हिवाळे गेले,
आणी टपरी प्रेम आमचे वाढतच गेले,
पण एक दिवस टपरी सोडावी लागेल,
या विचाराने मन रडू लागले.
वेळ बदलला काळ बदलला, मीत्रान्चा आता साथ सुटला,
मनात इथली फ़क्त आठवण आहे,
आम्ही नसलो तरी काय झाले,
टपरी अजुणही तशीच सदाबहार आहे.
प्रेमाला उपमा नाही
प्रेमाला उपमा नाही
कारण उपम्याला रवा नाही,
रव्याला गहू नाही,
गव्हाला पाणी नाही,
पाण्याला पंप नाही,
पंपाला पैसे नाही,
पैश्याला नोकरी नाही,
नोकरीला डिग्री नाही,
डिग्रीला शिक्षण नाही,
शिक्षणाला कॉलेज नाही,
कॉलेजला पोरी नाही,
पोरींशीवाय प्रेम नाही,
म्हणून प्रेमाला उपमा नाही.
कारण उपम्याला रवा नाही,
रव्याला गहू नाही,
गव्हाला पाणी नाही,
पाण्याला पंप नाही,
पंपाला पैसे नाही,
पैश्याला नोकरी नाही,
नोकरीला डिग्री नाही,
डिग्रीला शिक्षण नाही,
शिक्षणाला कॉलेज नाही,
कॉलेजला पोरी नाही,
पोरींशीवाय प्रेम नाही,
म्हणून प्रेमाला उपमा नाही.
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही…..
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही…..
मित्रांची नावे ई-मेल आय.डी. असतात,
भेटायच्या जागा चाट-रूम असतात,
कट्ट्यावर कोणी आता भेटतच नाही,
दिलखुलास शिवी कानी पडतच नाही,
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही…
दिसले कि हाय, जाताना बाय
पण समोर असताना प्रश्नचिन्ह, कि बोलायच काय,
अशी खोटी जवळीक मी कधी साधतच नाही,
मुखवट्याआड चेहरा कधी लपवत नाही
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही…
आज इथे उद्या तिथे…कोणासाठी कोणी थांबणार नाही
कोणीतरी साथ द्यावी हा माझा अट्टहास पण नाही,
पण इथुन तिथे जाताना कोणी निरोप तरी देइल कि नाही,
जाताना आपण, कोणी एक अश्रु तरी ढाळेल कि नाही,
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही….
शब्दच हल्ली अर्थ विसरतात,
संवेदनाच हल्ली बधीर होतात,
भावनाच हल्ली बोथट होतात,
अगदी थोडी माणसचं हि कविता शेवटपर्यत वाचतात,
म्हणुन………………..
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही….
मित्रांची नावे ई-मेल आय.डी. असतात,
भेटायच्या जागा चाट-रूम असतात,
कट्ट्यावर कोणी आता भेटतच नाही,
दिलखुलास शिवी कानी पडतच नाही,
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही…
दिसले कि हाय, जाताना बाय
पण समोर असताना प्रश्नचिन्ह, कि बोलायच काय,
अशी खोटी जवळीक मी कधी साधतच नाही,
मुखवट्याआड चेहरा कधी लपवत नाही
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही…
आज इथे उद्या तिथे…कोणासाठी कोणी थांबणार नाही
कोणीतरी साथ द्यावी हा माझा अट्टहास पण नाही,
पण इथुन तिथे जाताना कोणी निरोप तरी देइल कि नाही,
जाताना आपण, कोणी एक अश्रु तरी ढाळेल कि नाही,
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही….
शब्दच हल्ली अर्थ विसरतात,
संवेदनाच हल्ली बधीर होतात,
भावनाच हल्ली बोथट होतात,
अगदी थोडी माणसचं हि कविता शेवटपर्यत वाचतात,
म्हणुन………………..
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही….
बरस मेघा
बरस मेघा
आज खुप बरस
फक्त तुझ्यासाठी बरस
तुझ मन मोकळ करण्यासाठी बरस
लोकांना काय नुसती तुझ्या पाण्याची आस
तुझ्या मनाचा नाही रे त्यांना आसभास
बरस मेघा
आज खुप बरस
अवेळी येऊन बरस
माझ्यासाठी बरस
मलाही तुझ्यासंगे बरसायच आहे
तुझ्या अश्रुंमध्ये माझ्या अश्रुंना लपवायच आहे
बरस मेघा
आज खुप बरस
तुझे अश्रु संपतील इतका बरस
मलाही माझ्या अश्रुंना तुझ्या अश्रुंबरोबर संपवायच आहे
आता पुन्हा कधी अवेळी न तुला बरसायच आहे
आज खुप बरस
फक्त तुझ्यासाठी बरस
तुझ मन मोकळ करण्यासाठी बरस
लोकांना काय नुसती तुझ्या पाण्याची आस
तुझ्या मनाचा नाही रे त्यांना आसभास
बरस मेघा
आज खुप बरस
अवेळी येऊन बरस
माझ्यासाठी बरस
मलाही तुझ्यासंगे बरसायच आहे
तुझ्या अश्रुंमध्ये माझ्या अश्रुंना लपवायच आहे
बरस मेघा
आज खुप बरस
तुझे अश्रु संपतील इतका बरस
मलाही माझ्या अश्रुंना तुझ्या अश्रुंबरोबर संपवायच आहे
आता पुन्हा कधी अवेळी न तुला बरसायच आहे
कारण आता माझ standard वाढु लागलय…
एक रुपयाचा विचार करणार मन
आता हजार रुपयेही उडवु लागलय
छोट्या दुकानात घुटमळणार् पाऊल
आता ए.सी शोरूम कडे वळु लागलय्….
कारण
आता माझ standard वाढु लागलय…
पाणीपुरीचा आस्वाद घेणार मन
आता McDonald’s चा pizza खाऊ लागलय्
कसाटा खाण्याऱ्या जीभेवर हल्ली
महागड Ice-cream विरघळु लागलय….
कारण
आता माझ standard वाढु लागलय…
“वन रूम kitchen”मध्ये राहणार मन
आता प्रशस्त flatसाठी धडपडु लागलय्
लोकलच्या गर्दित धक्का खाता खाता
आता Mercedes-Benz मधुन स्वारी करु लागलय्….
कारण
आता माझ standard वाढु लागलय…
जे मिळेल त्यात समाधान् मानणार मन
आता थोडं choosy बनु लागलय
स्वप्नात बघितलेल्या दुनियेला खऱ्याआर्थाने
आता प्रत्यक्षाच स्वरुप् येऊ लागलाय्….
कारण
आता माझ standard वाढु लागलय…
तसं तर् गरीबी आणि श्रीमंतीने
समानतेनेच घरी पाणी भरलय..
पण श्रीमंतिपेक्षा गरिबीमुळे जीवनाला
कसं जगायच हे कळलयं…
म्हनुणच ….
कदाचित मनाप्रमाणे अंगातलही बळ वाढलय….
कारण …..
आता माझ standard वाढु लागलय…
आता हजार रुपयेही उडवु लागलय
छोट्या दुकानात घुटमळणार् पाऊल
आता ए.सी शोरूम कडे वळु लागलय्….
कारण
आता माझ standard वाढु लागलय…
पाणीपुरीचा आस्वाद घेणार मन
आता McDonald’s चा pizza खाऊ लागलय्
कसाटा खाण्याऱ्या जीभेवर हल्ली
महागड Ice-cream विरघळु लागलय….
कारण
आता माझ standard वाढु लागलय…
“वन रूम kitchen”मध्ये राहणार मन
आता प्रशस्त flatसाठी धडपडु लागलय्
लोकलच्या गर्दित धक्का खाता खाता
आता Mercedes-Benz मधुन स्वारी करु लागलय्….
कारण
आता माझ standard वाढु लागलय…
जे मिळेल त्यात समाधान् मानणार मन
आता थोडं choosy बनु लागलय
स्वप्नात बघितलेल्या दुनियेला खऱ्याआर्थाने
आता प्रत्यक्षाच स्वरुप् येऊ लागलाय्….
कारण
आता माझ standard वाढु लागलय…
तसं तर् गरीबी आणि श्रीमंतीने
समानतेनेच घरी पाणी भरलय..
पण श्रीमंतिपेक्षा गरिबीमुळे जीवनाला
कसं जगायच हे कळलयं…
म्हनुणच ….
कदाचित मनाप्रमाणे अंगातलही बळ वाढलय….
कारण …..
आता माझ standard वाढु लागलय…
जमलंच नाही ..!
जमलंच नाही ..!
आपल्यालाही आवडलं असतं…
रोज संध्याकाळी तिला चौपाटीवर फिरवायला ,
तिच्या निळ्या डोळ्यांत स्वतःला हरवायला ,
वाळूत बंगला बांधता बांधता..
आलं असतं मनातलं सांगता..
पण जाऊ दे जमलंच नाही ..!
आपल्यालाही आवडलं असतं..
कधीतरी तिच्यासोबत बागेमध्ये जायला ,
एकच कॅडबरी दोघांमधे वाटून खायला ,
कधी खोडी काढली असती..
आणखी गोडी वाढली असती..
पण जाऊ दे जमलंच नाही ..!
आपल्यालाही आवडलं असतं…
तिचा हात हळुवारपणे आपल्या हातात घ्यायला ,
लता-रफ़ी, किशोर-आशा ड्युएट गाणं गायला ,
सूर कदाचित जुळले असते..
तिला मनातले कळले असते..
पण जाऊ दे जमलंच नाही ..!
आपल्यालाही आवडलं असतं…
निघताच निघता तिला बावरलेलं पाहायला ,
मला तिची ,तिला माझी शपथ वाहायला ,
माझे अश्रू माझ्या डोळ्यांत लपले असते..
तिचे मात्र दवासारखे जपले असते..
पण जाऊ दे जमलंच नाही ..!
आपल्यालाही आवडलं असतं…
रोज संध्याकाळी तिला चौपाटीवर फिरवायला ,
तिच्या निळ्या डोळ्यांत स्वतःला हरवायला ,
वाळूत बंगला बांधता बांधता..
आलं असतं मनातलं सांगता..
पण जाऊ दे जमलंच नाही ..!
आपल्यालाही आवडलं असतं..
कधीतरी तिच्यासोबत बागेमध्ये जायला ,
एकच कॅडबरी दोघांमधे वाटून खायला ,
कधी खोडी काढली असती..
आणखी गोडी वाढली असती..
पण जाऊ दे जमलंच नाही ..!
आपल्यालाही आवडलं असतं…
तिचा हात हळुवारपणे आपल्या हातात घ्यायला ,
लता-रफ़ी, किशोर-आशा ड्युएट गाणं गायला ,
सूर कदाचित जुळले असते..
तिला मनातले कळले असते..
पण जाऊ दे जमलंच नाही ..!
आपल्यालाही आवडलं असतं…
निघताच निघता तिला बावरलेलं पाहायला ,
मला तिची ,तिला माझी शपथ वाहायला ,
माझे अश्रू माझ्या डोळ्यांत लपले असते..
तिचे मात्र दवासारखे जपले असते..
पण जाऊ दे जमलंच नाही ..!
वेडात मराठे वीर दौडले सात
आपले सेनापति प्रतापराव गुजर याचा एका लढाईत पराभव झालेला असल्याचे महाराजांना समजले आणि रागाच्या भरात त्यांनी प्रतापराव गुजरास पत्र पाठवले.कवितेची सुरुवात शिवाजी महाराजांनी लिहीलेल्या पत्रापासुन झाली आहे. ते पत्र वाचताच प्रताप्राव गुजर यांनी रागाने आपल्या सात साथीदारांसह अब्दुल करीम बहलोल खान याच्या प्रचंड सैन्यावर हल्ला केला. यात ते सातही वीर शहीद झाले. )
(”खरा इतिहास थोडा वेगळा आहे. इछुकांनी माहिती स्वतंत्रपणे घ्यावी”)
“श्रुति धन्य जाहल्या श्रवुनि आपुली वार्ता ,
रण सोडुन सेनासागर आमुचे पळता,
अबलाहि घरोघर खर्या लाजतिल आता,
भर दिवसा आम्हां दिसू लागली रात ”
वेडात मराठे वीर दौडले सात….
ते कठोर अक्शर एक एक त्यातील,
जाळीत चालले कणखर ताठर दील,
“माघारी वळणे नाही मराठी शील,
विसरला महाशय काय लावीत जात?”
वेडात मराठे वीर दौडले सात….
वर भिवई चढली दात दाबती ओठ,
छातीवर तुटली पटबंधाची गाठ,
डोळ्यात उठे काहूर ओलवे काठ,
म्यानातुन उसळे तलवारीची पात,
वेडात मराठे वीर दौडले सात….
“जरि काल दाविलि प्रभु गनिमांना पाठ,
जरि काल विसरलो जरा मराठी जात,
हा असा धावतो आज अरि-शिबिरात,
तव मानकरी हा घेवुन शीर करात”
वेडात मराठे वीर दौडले सात….
ते फ़िरता बाजुस डोळे, किंचित ओले,
सरदार सहा सरसावुन उठले शेले,
रिकिबीत टाकले पाय झेलले भाले,
उसळले धुळीचे मेघ सात निमिशात
वेडात मराठे वीर दौडले सात….
आश्चर्यमुग्ध टाकुन मागुती सेना,
अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना,
छवणीत शिरले थेट भेट गनिमांना,
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात
वेडात मराठे वीर दौडले सात….
खालून आग, वर आग आग बाजूंनी,
समशेर उसळली सहस्त्र क्रूर ईमानी,
गर्दीत लोपले सात जीव ते मानी,
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
वेडात मराठे वीर दौडले सात….
दगडावर दिसतिल अजुनि तेथल्या टाचा,
ओढ्यात तरंगे अजुनि रंग रक्ताचा,
क्षितिजावर उठतो अजुन मेघ मातीचा,
अद्याप विराणी कुणी वार्यावर गात
वेडात मराठे वीर दौडले सात….
“श्रुति धन्य जाहल्या श्रवुनि आपुली वार्ता ,
रण सोडुन सेनासागर आमुचे पळता,
अबलाहि घरोघर खर्या लाजतिल आता,
भर दिवसा आम्हां दिसू लागली रात ”
वेडात मराठे वीर दौडले सात….
ते कठोर अक्शर एक एक त्यातील,
जाळीत चालले कणखर ताठर दील,
“माघारी वळणे नाही मराठी शील,
विसरला महाशय काय लावीत जात?”
वेडात मराठे वीर दौडले सात….
वर भिवई चढली दात दाबती ओठ,
छातीवर तुटली पटबंधाची गाठ,
डोळ्यात उठे काहूर ओलवे काठ,
म्यानातुन उसळे तलवारीची पात,
वेडात मराठे वीर दौडले सात….
“जरि काल दाविलि प्रभु गनिमांना पाठ,
जरि काल विसरलो जरा मराठी जात,
हा असा धावतो आज अरि-शिबिरात,
तव मानकरी हा घेवुन शीर करात”
वेडात मराठे वीर दौडले सात….
ते फ़िरता बाजुस डोळे, किंचित ओले,
सरदार सहा सरसावुन उठले शेले,
रिकिबीत टाकले पाय झेलले भाले,
उसळले धुळीचे मेघ सात निमिशात
वेडात मराठे वीर दौडले सात….
आश्चर्यमुग्ध टाकुन मागुती सेना,
अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना,
छवणीत शिरले थेट भेट गनिमांना,
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात
वेडात मराठे वीर दौडले सात….
खालून आग, वर आग आग बाजूंनी,
समशेर उसळली सहस्त्र क्रूर ईमानी,
गर्दीत लोपले सात जीव ते मानी,
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
वेडात मराठे वीर दौडले सात….
दगडावर दिसतिल अजुनि तेथल्या टाचा,
ओढ्यात तरंगे अजुनि रंग रक्ताचा,
क्षितिजावर उठतो अजुन मेघ मातीचा,
अद्याप विराणी कुणी वार्यावर गात
वेडात मराठे वीर दौडले सात….
तु …
असा एक दिवस असेल
जिथे तु आणि मी असेन,
अशाच रम्य सांयकाळी
मी तुझ्याकडे पाहत बसेन…
तु मला सहजच विचारशील
“असा काय पाहतोयस ? ”
तुझ्याच डोळ्यातच बघत सांगेन
“मी तुझाच होउन रहातोय…”
तुलाही मग आवडेल अस
माझं तुझ्याकडे पहाणं,
तुझ्या नजरेत पहाता पहाता
तुझ्याशी एकरुप होऊन जाणं…
तुही स्व:तला सावरु शकणार नाहीस
आणि अलगद मिठीत येउन रहाशील,
ओठ तुझेही तहानलेले असतिल
प्रेमाचा प्याला सहजच घेशील…..
मी त्या दिवसाची वाट पाहीन
मला काळाची खंत नाही,
माझ्या ह्या वाट पहाण्यास
आता एक निश्चित अंत नाही….
जिथे तु आणि मी असेन,
अशाच रम्य सांयकाळी
मी तुझ्याकडे पाहत बसेन…
तु मला सहजच विचारशील
“असा काय पाहतोयस ? ”
तुझ्याच डोळ्यातच बघत सांगेन
“मी तुझाच होउन रहातोय…”
तुलाही मग आवडेल अस
माझं तुझ्याकडे पहाणं,
तुझ्या नजरेत पहाता पहाता
तुझ्याशी एकरुप होऊन जाणं…
तुही स्व:तला सावरु शकणार नाहीस
आणि अलगद मिठीत येउन रहाशील,
ओठ तुझेही तहानलेले असतिल
प्रेमाचा प्याला सहजच घेशील…..
मी त्या दिवसाची वाट पाहीन
मला काळाची खंत नाही,
माझ्या ह्या वाट पहाण्यास
आता एक निश्चित अंत नाही….
आठवणींचं पिंपळपान…
गाव माझा जुना माझी वाट पाहात आहे
दुरवरच्या शहराचा तो थाट पहात आहे ।
दुरदुर हिरवी पहाटे डोलणारी धरती
झुंजूमुंजू झाले की देवळामधली आरती ।
देवाची ती पुजा तो दरवळणारा धुप
अजुन जाणवतेय मला लाल दुलाईची उब ।
नदी काठचं घर,समोर टाकलेले सडे
उगाच आठवताय मला नदित फेकलेले खडे ।
घरामागचे अंगण,अंगणातले खेळ दिसताय अजुन
माझ्या सवे खेळणारी ताई चाललीय पहा सजुन ।
वेशीवरचं झाड,त्या झाडाची ती सावली
त्या झाडाखालचे देऊळ , ती लोभस गुरुमाउली ।
अजुन बोलावतोय मला ,सुरपारंब्याचा तो खेळ
अजुन भुलवतोय मला ,फुलभुंग्याचा तो मेळ ।
शाळेसाठीची दिसतेय अजुन कच्ची पाउलवाट
वाटेवरली चिंच,शेजारुन वाहणारा तो पाट ।
शाळेची पडकी अजुन तशीच उभी आहे
खिडकीतुन दिसणारया टेकडीची अजुन सुन्दर खुबी आहे ।
पावसाच्या त्या सरी,ती दबक्या मधली पोरं
सरी ओसरुन झाल्यावर धुउन निघालेल वार ।
पानावरुन ओघळनारया टपोरया थेंबाचे ते मॊती
ते वाहणारे पाणी,ती दरवळलेली माती ।
साठलेल्या पाण्यामधे गोल थेंबाची ती चाल
पत्र्यावरचा आवाज तो मधुर सुरताल ।
थंड पाण्याचा तो झरा मला सुचलेल्या ओळी
शेजारी मोकळे ते रान , त्यात शांत गाय भोळी ।
गावापासुन दुर नुसत , गर्दीच ते रान
गावमध्ये जपुन ठेवलय मी……
…………………………आठवणींच पिंपळपान ।
दुरवरच्या शहराचा तो थाट पहात आहे ।
दुरदुर हिरवी पहाटे डोलणारी धरती
झुंजूमुंजू झाले की देवळामधली आरती ।
देवाची ती पुजा तो दरवळणारा धुप
अजुन जाणवतेय मला लाल दुलाईची उब ।
नदी काठचं घर,समोर टाकलेले सडे
उगाच आठवताय मला नदित फेकलेले खडे ।
घरामागचे अंगण,अंगणातले खेळ दिसताय अजुन
माझ्या सवे खेळणारी ताई चाललीय पहा सजुन ।
वेशीवरचं झाड,त्या झाडाची ती सावली
त्या झाडाखालचे देऊळ , ती लोभस गुरुमाउली ।
अजुन बोलावतोय मला ,सुरपारंब्याचा तो खेळ
अजुन भुलवतोय मला ,फुलभुंग्याचा तो मेळ ।
शाळेसाठीची दिसतेय अजुन कच्ची पाउलवाट
वाटेवरली चिंच,शेजारुन वाहणारा तो पाट ।
शाळेची पडकी अजुन तशीच उभी आहे
खिडकीतुन दिसणारया टेकडीची अजुन सुन्दर खुबी आहे ।
पावसाच्या त्या सरी,ती दबक्या मधली पोरं
सरी ओसरुन झाल्यावर धुउन निघालेल वार ।
पानावरुन ओघळनारया टपोरया थेंबाचे ते मॊती
ते वाहणारे पाणी,ती दरवळलेली माती ।
साठलेल्या पाण्यामधे गोल थेंबाची ती चाल
पत्र्यावरचा आवाज तो मधुर सुरताल ।
थंड पाण्याचा तो झरा मला सुचलेल्या ओळी
शेजारी मोकळे ते रान , त्यात शांत गाय भोळी ।
गावापासुन दुर नुसत , गर्दीच ते रान
गावमध्ये जपुन ठेवलय मी……
…………………………आठवणींच पिंपळपान ।
Subscribe to:
Posts (Atom)