तिने कित्ती सुंदर दिसावं........

तिने कित्ती सुंदर दिसावं..
जसं गुलाबाचं फूल उमलावं..
कोणाच्याही नजरेत भरावं..
तासन तास पाहत रहावं..!!!!

तिने कित्ती गोड बोलावं..
ऐकणाऱ्याने विरघळून जावं..
हरवूनच जावं ..
सोबत तिच्या..!!!!

तिने कित्ती साधं रहावं ..
त्यातही रूप तिचं खुलावं..
कोणीही फिदा व्हाव ..
अदांवर तिच्या..!!!!

तिचं उदास होणं..
कसं हृदयाला भिडावं..
कोणालाही वाईट वाटावं..
अश्रूंनी तिच्या..!!!!

तिचं हसणं ..
कोणालाही सुखवावं..
कोणीही घसरून पडावं..
गालावरल्या खळीत तिच्या..!!!!

तिच्या नजरेने मलाच शोधावं..
अचानक नजरेने नजरेला भिडावं ..
मग तिने लगेच दुसरीकडे पहावं..
लाजेने चूर चूर व्हावं..!!!!

ती समोर असताना ...
मी सारं काही विसरावं..
तिने इश्य करत लाजावं..
मी 'हाय हाय' करत घायाळ व्हावं ..!!!!

तिने फक्त माझंच रहावं..
मीही फक्त तिच्यासाठीच जगावं..
साथ देऊ जन्मोजन्मी ..
विरहाचं दुख कधीही न यावं..
कधीही न अनुभवावं..!!!!

बाप

बापावर एक कविता लिहतो
माझ्या मनात विचार आला
माझाच बाप नजरेसमोर
कधी नव्हे तो मी धरला
माझा बापच नेहमी मला
माझा कट्टर शत्रु वाटला
म्हणून त्याच्या स्तुतीत एकही
शब्द कधी सहज नाही लिहला
माझा बापच इतरांच्याही
बापांचाही एक आदर्श ठरला
बाप असावा तसाच माझा
बाप नजरेत माझ्या झाला
बाप फक्त बाप सदाच असतो
म्हणून आपण कमी लेखला
आई पुढेच महानतेला
त्याच्या आपण कमी तोलला
बापच सदैव उपेक्षित तो
साहित्यातही कसा राहिला
झालेळ्यांना बाप कदाचित
बापच अजुन नाही कळला

आयुष्य सुंदर आहे

आयुष्य सुंदर आहे
मित्रा,
खरंच आयुष्य सुंदर आहे

सुर्य जेव्हा आकाशात
तळपत असतो रागाने ,
इवलसं फ़ुल सांगतं त्याला
"पहा पण प्रेमाने !"

ढग जेव्हा दु:खी होतात
आणि बरसू लागतात धारा!
ढगाच्या दु:खावर तेव्हा
फ़ुंकर घालतो वारा !

चंद्र एकटाच पडतो आकाशात
दर्दभरी गात गाणी !
चांदण्या चमकत सोबत करतात
उत्साहाची भरुन वाणी!!

पानं, फ़ुलं, झाडं सारी
तुझ्यासाठीचं गात आहेत,
ओढे, नद्या, नाले, सागर
तुझ्यासाठीच वहात आहेत !

खरंच आयुष्य सुंदर आहे,
बघ जरा डोळे उघडून !
बघ एकदा तरीही
आनंदाचं गाणं गाऊन !!

मी जसा आहे, तसा आहे

सिंह भासे मी कुणा केंव्हा
श्वानही बोले कुणी केंव्हा
बोलती कोणी ससा आहे
मी जसा आहे, तसा आहे

जे कुणा बोलायचे बोलो
जे कुणा वाटायचे वाटो
(मोकळा त्यांचा घसा आहे!)
मी जसा आहे, तसा आहे

रोखली माझी मुळे त्यांनी
तोडल्या फांद्या जरी त्यांनी
अंबरी माझा ठसा आहे!
मी जसा आहे, तसा आहे

कोष मी फोडेन दंभाचा
गर्भ मी जाणेन सत्याचा
घेतला हाती वसा आहे
मी जसा आहे, तसा आहे
खरंच आयुष्य सुंदर आहे..!!!!! ...............

ती आली online की.....

सारंच Zing Zang होतं
ती आली online की
माझा पीसी Hang होतो
मनात कससंच होवून
सारंच Zing Zang होतं

कितीही Alt+Ctrl+Delete केले
तरी Task manager येत नाही
हैराण होतो Refresh करून
Restart चं नावच घेत नाही

Hard disk चा वेग वाढतो
कसले कसले आवाज काढतो
writer सारखा eject होतो
Pen drive पण reject होतो

काय सांगू तुम्हाला
सारी system fail होते
Virus घुसतो अचानक
त्याची आपली रेलचेल होते

काय म्हणता तुम्ही,
मी online येणे बंद करायचं....?
अहो मग मी.....
तिच्या शिवाय कसं जगायचं....??

अहो Hang च होतोय ना
काय फरक पडतो.....?
तिच्यामुळेच तर माझ्या
PC चा ह्रदय धडधडतो

chatting काही होत नाही
वाटतं आपलंच Ram कमी होतं
मनात कससंच होवून
सारंच Zing Zang होतं.........सारंच Zing Zang होतं.......!!

जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते…………

जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते
मन चांदण्यात न्हावुन निघते
आशेच्या पावासाळी सरीने
डोळ्यातले स्वप्न मग चिंब भिजते
माझ्या मनातल्या कोरया कॅनवास वर
तुझं चित्र मग आपोआपच उमटते

जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते
जणु श्रावणातली पहीली सर बरसते
तुझ्या आठवणींच्या सरीने
कोमेजलेल्या या मनाच्या रोपाला
मग नवी पालवी फ़ुटते
रात्रीच्या गर्द काळोखी आभाळातली
शांत चांदणी जणु पुन्हा चमकते
माझी नजर मग
त्या चांदण्यातही तुलाच शोधिते

कधी कधी तर वाटते की जाऊदे
तु नाही तर तुझी आठवण तरी येते
कमीत कमी माझं उदास मन थोडंतरी हसते

स्वप्न आणि सत्य

एकदा स्वप्न आणि सत्य यांचे जोरदार भांडण झाले. विषय होता भविष्य घडविण्यात सर्वाधिक सहभाग कोणाचा. दोघे ही खुप भांडले, झगडले पण निर्णय काही होईना. शेवटी या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ते आपल्या मानसपित्याकडे- ब्र्म्हदेवाकडे गेले. ब्र्म्हदेवाने त्यांना सांगितले, "ज्या कोणाचे हात आभाळाला टेकतील आणि तरीही ज्याचे पाय जमिनीवर आसतील, त्याचा भविष्या घडविण्यात निर्णायक सहभाग असतो". दोघेही परत आले. स्वप्नाने आधी प्रयत्न केला. एकच उडीत त्याचे हात आभाळाला टेकले, पण त्याचे पाय जमिनीपसुन केंव्हाच उचलले गेले होते. सत्याने नंतर प्रयत्न केला. त्याचे पाय कायम जमिनीवर होते, पण त्याचे हात आभाळापर्यंत कधीच पोचु शकले नाहीत. दोघांनीही खुप प्रयत्न केले, पण दोघांपैकी कोणीच यशस्वी होउ शकले नाही. थकुन परत एकदा ते ब्रम्हदेवाकडे गेले, आणि या वेळेस ब्रम्हदेवाने त्यांना सांगितले, "भविष्य घडविण्यात सत्य, आणि स्वप्न या दोघांचाही सहभाग तितकाच मोलाचा असअतो. खर्‍या अर्थाने यशस्वी भविष्य घडवायचे असेल, तर स्वप्नाला सत्याच्या खांद्यावर उभे रहयला हवे!."