एका महिन्यानंतर …….

आज पुन्हा मी कवितेंच्या
देशात येत आहे
झाले गेले विसरुन झाले
पुन्हा इथे परतत आहे

झाले गेले खुप झाले
पुन्हा त्यावर विचार नाही
आता ठरवलंय मी आयुष्यात
मागे वळुन पहायचे नाही

राखेतुन हा फिनिक्स पक्षी
जोमाने उभा राहणार आहे
पहिल्यापेक्षा अधिक प्रभावीपणे
कागदावर लेखणी चालवणार आहे

कुणी कुणाचे नसते
हेच खरे आहे
जिथे अश्रुंनाही किंमत नसते
तिथे त्यांना ढाळण्याची काय गरज आहे

अश्रुंचे खेळ बंद करुन
आता जोमाने चालण्याची गरज आहे
कारण नवे क्षितीज खुणावतंय
मला तिथवर पोहोचायचे आहे

2 comments:

Unknown said...

very good poem
by-umesh


Unknown said...

very good poem