नुकतीच आमची भेट झाली...!

नुकतीच आमची भेट झाली...!

मनातील शेवटची ईछा पुर्ण झाली
खुप सुदर दिसत होती ती आज
वर्णन तरी करु तिच मी
जे कधी मला जमलच नाही.

आज नेमकी तिने तेच विचारल
मी आज कशी दिसते?
सागु तरी काय आता तिला,
हा विचार करता-करताच वेळ निघुन गेला.

पुन्हा समोर असताना काही बोलू शकलो नाही
तिने आजही तेव्हढा वेळ मला दिलाच नाही
नतर खुप काही सुचल,
पण एकायला ती मात्र थाबलीच नाही

करु तरी काय माझ्या या मनाला?

मन आता मात्र त्रास देऊ लागले
सारख समोर तीला घेऊन आठवू लागले
पुन्हा जुण्या आठवणी आठवून,
ते ढसा-ढसा रडू लागले

विसरलो होतो तूला,
मग का भेट्लीस मला.
आता तूच साग,
कस समजाऊ माझ्या वेड्या मनाला?

तु नसताना कसे पाहु एकट्याला
तु नसताना कसे समजाऊ या मनाला
आता तरी नको जाऊस दुर
मझ्यासाठी नव्हे, माझ्या मनासाठी तरी,
समजव तुझ्या कठोर मनाला.

निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू।

निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू।

निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू।
अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।।

परोपकाराचीया राशी। उदंड घडती जयाशी।
तयाचे गुण महत्त्वासी। तुळणा कैची ? ।।

यशवंत कीतिर्वंत। सार्मथ्यवंत वरदवंद।
पुण्यवंत नीतिवंत। जाणता राजा।।

आचारशीळ विचारशीळ। दानशीळ धर्मशीळ।
सर्वज्ञपणें सुशीळ। सकळा ठाई।।

या भूमंडळाचे ठायी। धर्म रक्षी ऐसा नाही।
महाराष्ट्र धर्म राहिला काही। तुम्हांकरिता।।

कित्येक दुष्ट संहारिले। कित्येकास धाक सुटले।
कित्येकास आश्रय जाले। शिवकल्याणराजा।।

- समर्थ रामदास

गाडी सुटली

गाडी सुटली, रुमाल हलले, क्षणात डोळे टचकन् ओले
गाडी सुटली, पडले चेहरे, क्षण साधाया हसरे झाले
गाडी सुटली, हातामधुनी हात कापरा तरी सुटेना
अंतरातली ओली माया तुटूदे म्हटले तरी तुटेना
का रे इतका लळा लावुनी नंतर मग ही गाडी सुटते
डोळ्यांदेखत सरकत जाते आठवणींचा ठिपका होते
गाडी गेली फलाटावरी नि:श्वासांचा कचरा झाला
गाडी गेली डोळ्यामधल्या निर्धाराचा पारा फुटला

हे भलते अवघड असते... हे भलते अवघड असते...
कुणी प्रचंड आवडणारे... ते दूर दूर जाताना...
डोळ्यांच्या देखत आणि नाहीसे लांब होताना...
डोळ्यातील अडवून पाणी... हुंदका रोखुनी कंठी...
तुम्ही केविलवाणे हसता अन् तुम्हास नियती हसते...

तरी असतो पकडायाचा... हातात रुमाल गुलाबी...
वार्यावर फडकवताना... पाह्यची चालती गाडी...
ती खिडकीतून बघणारी अन् स्वतः मधे रमलेली...
गजरा माळावा इतुके... ती सहज अलविदा म्हणते...

तुम्ही म्हणता मनास आता, हा तोडायाचा सेतू...
इतक्यात म्हणे ती - माझ्या कधी गावा येशील का तू?
ती सहजच म्हणुनी जाते... मग सहजच हळवी होते...
गजर्यातील दोन कळ्या अन् हलकेच ओंजळीत देते...

कळते की गेली वेळ... ना आता सुटणे गाठ...
आपुल्याच मनातील स्वप्ने... घेऊन मिटावी मूठ...
ही मूठ उघडण्यापूर्वी... चल निघुया पाऊल म्हणते...
पण पाऊल निघण्यापूर्वी... गाडीच अचानक निघते...

परतीच्या वाटेवरती गुदमरून जड पायांनी...
ओठावर शीळ दिवाणी... बेफिकीर पण थरथरती...
पण क्षण क्षण वाढत असते... अंतर हे तुमच्यामधले...
मित्रांशी हसतानाही... हे दु:ख चरचरत असते...

हे भलते अवघड असते.

माझी आठवण कधीतरी येईल तुला ...

माझी आठवण कधीतरी येईल तुला
जुन्या आठवणीत मग तू शोधशील मला.....

कुणालातरी माझी आठवण सांगताना तू हसशील
पण त्या आठवणीत मला पाहताच तू रडशील.....

आठवेल तुला समुद्र किनारी आपल्या दोघांच फिरण
तुझ्या थरथरत्या स्पर्शात मी स्वता हरवून जान.....

तू माझा हातात हात घेउन अनेक स्वप्न सजवन
माझ्या डोळ्यात पाणी येताच मला हसवण.....

आठवेल तुला आपल्या प्रेमातला तो जुना पाउस
एकाच छत्रीत पाउसात भिजणारी ती आपली हाउस.....

ओल्या चिंब तुझ्या स्पर्शात अंगावर येणारे शहारे
काळ्या गर्द वातावरणात मोहरून गेलेले ते अंग सारे.....

माझी आठवण येताच मी जवळ असल्याच तुला भासेल
तुझ्या डोळ्यातून निघालेला अश्रुचा प्रतेक थेंब मी असेल.....

तू एकटी बसल्यावर आठवेल तुला प्रतेक क्षण
त्या क्षणांमधे दिसेल तुला माझ तडफडणार मन.....

माझी आठवण कधीतरी येईल तुला
व्याकुळ होउन तुझ मन शोधेल मला.....

माझी आठवण कधीतरी येईल तुला ....
माझी आठवण कधीतरी येईल तुला ....