तिने कित्ती सुंदर दिसावं..
जसं गुलाबाचं फूल उमलावं..
कोणाच्याही नजरेत भरावं..
तासन तास पाहत रहावं..!!!!
तिने कित्ती गोड बोलावं..
ऐकणाऱ्याने विरघळून जावं..
हरवूनच जावं ..
सोबत तिच्या..!!!!
तिने कित्ती साधं रहावं ..
त्यातही रूप तिचं खुलावं..
कोणीही फिदा व्हाव ..
अदांवर तिच्या..!!!!
तिचं उदास होणं..
कसं हृदयाला भिडावं..
कोणालाही वाईट वाटावं..
अश्रूंनी तिच्या..!!!!
तिचं हसणं ..
कोणालाही सुखवावं..
कोणीही घसरून पडावं..
गालावरल्या खळीत तिच्या..!!!!
तिच्या नजरेने मलाच शोधावं..
अचानक नजरेने नजरेला भिडावं ..
मग तिने लगेच दुसरीकडे पहावं..
लाजेने चूर चूर व्हावं..!!!!
ती समोर असताना ...
मी सारं काही विसरावं..
तिने इश्य करत लाजावं..
मी 'हाय हाय' करत घायाळ व्हावं ..!!!!
तिने फक्त माझंच रहावं..
मीही फक्त तिच्यासाठीच जगावं..
साथ देऊ जन्मोजन्मी ..
विरहाचं दुख कधीही न यावं..
कधीही न अनुभवावं..!!!!
आयुष्य म्हणजे ....
आयुष्य म्हणजे कटकट..
जगण्यासाठी रोज कामाच्या ओझ्याखाली मराव लागतं
सुखाचा मोती मिळवायला दु:खाच्या सागरात बुडावं लागतं
आयुष्य म्हणजे वणवा....
इथे वेदनांना घेउन जळावं लागत
पोटाच्या आगीसाठी वणवण पळावं लागतं
आयुष्य म्हणजे अंधार...
इथे काळोखात बुडाव लागतं
परस्परांच्या बुद्धीप्रकाशाने इच्छित स्थळ शोधाव लागतं
आयुष्य म्हणजे पाऊस....
आप्तांची रखरखता पुसण्यासाठी मुक्तपणे कोसळाव लागतं
कष्टांच्या खाच खळग्यातुन वाहत सुखसागराला मिळाव लागतं
पण ...आयुष्य हे असेच का ?
मला वाटते .. आयुष्य म्हणजे तान्हुल्याचे हास्य
जिथे स्वत:ही मुक्त कंठाने हसता येत.
आपण अनुभवताना दुसर्यालाही सुख देता येतं.
जगण्यासाठी रोज कामाच्या ओझ्याखाली मराव लागतं
सुखाचा मोती मिळवायला दु:खाच्या सागरात बुडावं लागतं
आयुष्य म्हणजे वणवा....
इथे वेदनांना घेउन जळावं लागत
पोटाच्या आगीसाठी वणवण पळावं लागतं
आयुष्य म्हणजे अंधार...
इथे काळोखात बुडाव लागतं
परस्परांच्या बुद्धीप्रकाशाने इच्छित स्थळ शोधाव लागतं
आयुष्य म्हणजे पाऊस....
आप्तांची रखरखता पुसण्यासाठी मुक्तपणे कोसळाव लागतं
कष्टांच्या खाच खळग्यातुन वाहत सुखसागराला मिळाव लागतं
पण ...आयुष्य हे असेच का ?
मला वाटते .. आयुष्य म्हणजे तान्हुल्याचे हास्य
जिथे स्वत:ही मुक्त कंठाने हसता येत.
आपण अनुभवताना दुसर्यालाही सुख देता येतं.
कुणीतरी सोबत असावं ...
कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं
माझ्याच विचारांनी दिवसाची सुरवात करणारं,
कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं
होता विरह थोडातरी काळजी घे स्वतःची म्हणणारं
हे सारं बोलताना नकळतपणे दोन आसु गाळणारं
कुणीतरी असावं माझ्या परतीच्या वाटेवर डोळे लावुन बसणारं
काहीही झालंतरी माझा फोन कट न करणारं
आणि बोलणे कुणालाही समजणारही नाही इतक्या सहजतेने बोलणारं
कुणीतरी असावं अश्या माझ्याशी तासंतास गप्पा मारणारं
दिवसभरं माझ्या फोनची आतुरतेने वाट पाहणारं
फोन आल्यावर माझ्यावरं लटके लटके रागवणारं
कुणीतरी असावं मी समजावल्यावर मात्र नचुकता सॉरी म्हणणारं
सुट्टीच्या दिवशी भेटायला यायला सांगणारं
थोडासा तरी उशीर झाला येण्यासाठी तर येरझारया घालणारं
कुणीतरी असावं सोबत आतुरतेने माझी वाटं पाहणारं
माझ्या डोळ्यांतील भाव बोलले नाही तरी जाणणारं
एखाध्या नाजुक भावक्षणी डोळ्यातुन पाणी गाळणारं
माझ्याच विचारांनी दिवसाची सुरवात करणारं,
कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं
होता विरह थोडातरी काळजी घे स्वतःची म्हणणारं
हे सारं बोलताना नकळतपणे दोन आसु गाळणारं
कुणीतरी असावं माझ्या परतीच्या वाटेवर डोळे लावुन बसणारं
काहीही झालंतरी माझा फोन कट न करणारं
आणि बोलणे कुणालाही समजणारही नाही इतक्या सहजतेने बोलणारं
कुणीतरी असावं अश्या माझ्याशी तासंतास गप्पा मारणारं
दिवसभरं माझ्या फोनची आतुरतेने वाट पाहणारं
फोन आल्यावर माझ्यावरं लटके लटके रागवणारं
कुणीतरी असावं मी समजावल्यावर मात्र नचुकता सॉरी म्हणणारं
सुट्टीच्या दिवशी भेटायला यायला सांगणारं
थोडासा तरी उशीर झाला येण्यासाठी तर येरझारया घालणारं
कुणीतरी असावं सोबत आतुरतेने माझी वाटं पाहणारं
माझ्या डोळ्यांतील भाव बोलले नाही तरी जाणणारं
एखाध्या नाजुक भावक्षणी डोळ्यातुन पाणी गाळणारं
औंदा लगीन ....
कवापासनं घरची मागं माह्या लागल्यात…
अतातरी दोनाच, चार कर की म्हणत्यात..
गड्यानॉ, आसल काय बी करायच न्हाय…
नस्त्या झेंगाटात आडकायचं मला न्हाय..
………………………………औंदा लगीन करायच न्हाय.
कुठं राव त्या बायकांच्या नादी लागता…
रोज रोजची कटकट न वटवट, आयला…
ह्ये कर, त्ये आन् रोज मग मरान हाय…
ह्याला बघ,त्याला ने रोजचं ग्रहान हाय…
………………………म्हणून औंदा लगीन करायच न्हाय.
म्या महनतो, भाजी न भाकरी जळाली…
तरी..म्हणावं लागतं काय मस्तच हाय…
मोकळा फिरता येणार न्हाय..नि गावच्या
पोरीकडं बी दिलखुलास बघता येणार न्हाय…
……………………..म्हणूनच औंदा लगीन करायच न्हाय.
बस का, यावर थोडा च भगणाराय सगळं..
त्यानंतरच ‘लचांड’ मग मागचकी लगतय…
बा ह्ये घे,बा त्ये घे एकत आन् करत करत
म्हातरपण पण मग हळूहळू सराय लागतय…
…………..आन् मग म्हणूनच औंदा लगीन करायच न्हाय.
झाकच की, मामाच्या शालीशीच लगीन ठरतय..
बघताय काय आसं? तिच्यात माहा जीव हाय..
वर ज्ये काय म्हनालय़,.. त्ये इसारा की राव….
माणूस बी चुकतोच की कधी, का खाताय भाव?
…………………इचार करतोय औंदा लगीन करावं की काय?
नाय, तसं न्हाय…तिचं नखरं सोशीन म्हणतो….
जळकी भाकरी डोळेझाकून घशाखाली उतरवतो….
गावच्या पोरिमधी…. नाहीतरी ठेवलयच काय?
म्हातारपनाला आपलीच पोरं असणार की न्हाय?
….जाऊ द्या सगळेच म्हनत्यात, तर औंदा लगीन करणार हाय..
अतातरी दोनाच, चार कर की म्हणत्यात..
गड्यानॉ, आसल काय बी करायच न्हाय…
नस्त्या झेंगाटात आडकायचं मला न्हाय..
………………………………औंदा लगीन करायच न्हाय.
कुठं राव त्या बायकांच्या नादी लागता…
रोज रोजची कटकट न वटवट, आयला…
ह्ये कर, त्ये आन् रोज मग मरान हाय…
ह्याला बघ,त्याला ने रोजचं ग्रहान हाय…
………………………म्हणून औंदा लगीन करायच न्हाय.
म्या महनतो, भाजी न भाकरी जळाली…
तरी..म्हणावं लागतं काय मस्तच हाय…
मोकळा फिरता येणार न्हाय..नि गावच्या
पोरीकडं बी दिलखुलास बघता येणार न्हाय…
……………………..म्हणूनच औंदा लगीन करायच न्हाय.
बस का, यावर थोडा च भगणाराय सगळं..
त्यानंतरच ‘लचांड’ मग मागचकी लगतय…
बा ह्ये घे,बा त्ये घे एकत आन् करत करत
म्हातरपण पण मग हळूहळू सराय लागतय…
…………..आन् मग म्हणूनच औंदा लगीन करायच न्हाय.
झाकच की, मामाच्या शालीशीच लगीन ठरतय..
बघताय काय आसं? तिच्यात माहा जीव हाय..
वर ज्ये काय म्हनालय़,.. त्ये इसारा की राव….
माणूस बी चुकतोच की कधी, का खाताय भाव?
…………………इचार करतोय औंदा लगीन करावं की काय?
नाय, तसं न्हाय…तिचं नखरं सोशीन म्हणतो….
जळकी भाकरी डोळेझाकून घशाखाली उतरवतो….
गावच्या पोरिमधी…. नाहीतरी ठेवलयच काय?
म्हातारपनाला आपलीच पोरं असणार की न्हाय?
….जाऊ द्या सगळेच म्हनत्यात, तर औंदा लगीन करणार हाय..
तू नसतांना ......
तू नसतांना पाऊस का येतो?
क्षणभर मनभर ओलावा देतो
रिमझीम बरसत श्रावण मन होते
मी चींब सयीवर चींब ऋतू होतो..
तू नसतांना पारंबी झुलली
तुझी आठवे क्षणात सरसरली
झुलले पारंबीवर मन वेडे
असा झुला हा कुणास सावरतो?
तू नसतांना...
काल किनारा खोल पुन्हा गेला
तू नसतांना सागर ओसरला
जरी संपल्या लाटा ह्र्दयाच्या
तरी आतुनी उगाच खळखळतो..
तू नसतांना....
तू नसतांना आलेल्या धारा
उगाच मजला छळणारा वारा
तू असतांना कधी न जाणवल्या
तरीच का हा सूड असा घेतो..
तू नसतांना....
क्षणभर मनभर ओलावा देतो
रिमझीम बरसत श्रावण मन होते
मी चींब सयीवर चींब ऋतू होतो..
तू नसतांना पारंबी झुलली
तुझी आठवे क्षणात सरसरली
झुलले पारंबीवर मन वेडे
असा झुला हा कुणास सावरतो?
तू नसतांना...
काल किनारा खोल पुन्हा गेला
तू नसतांना सागर ओसरला
जरी संपल्या लाटा ह्र्दयाच्या
तरी आतुनी उगाच खळखळतो..
तू नसतांना....
तू नसतांना आलेल्या धारा
उगाच मजला छळणारा वारा
तू असतांना कधी न जाणवल्या
तरीच का हा सूड असा घेतो..
तू नसतांना....
Subscribe to:
Posts (Atom)